शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

महाबीजच्या बियाण्यात आढळली ३५ टक्के भेसळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:13 IST

पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: येथील गोपाल आरेकर या शेतकऱ्याने यंदा महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर त्यात दोन प्रकारची झाडे उगवली होती. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी ‘सोयाबीन बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाने दखल घेत १५ सप्टेंबर रोजी या पिकाची पाहणी केली. या संदर्भातील अहवाल तयार झाला असून, पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.इंझोरी येथील शेतकरी गोपाल आरेकर यांनी कारंजा येथील एका कृषीसेवा केंद्रातून महाबीजच्या एका सोयाबीन वाणाचे ७ बॅग बियाणे खरेदी केले. त्यापैकी ३ बॅग बियाणे त्यांनी स्वत:च्या मालकीच्या १.२१ हेक्टर क्षेत्रात, तर उर्वरित ४ बॅग बियाणे त्यांचे वडिल हरीदास आरेकर यांच्या १.६२ हेक्टर क्षेत्रात पेरले होते. हे बियाणे चांगल्या प्रकारे उगवले; परंतु पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर वेगवेगळ्या झाडांना दोन प्रकारच्या शेंगा लागल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे बियाण्यांत भेसळ असल्याचे आणि उत्पादनात घट येणार असल्याचे त्यांना दिसले.त्यांनी याबाबत पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार केली. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले.त्याची दखल घेत मानोरा पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी डिगांबर मकासरे, कृषी शास्त्रज्ञ राजेश डवरे, मानोरा तालुका कृषी अधिकारी व्ही. के. घोडेकर, महाबिजचे प्रतिनिधी एम. एस. धांडे, मंडळ कृषी अधिकारी जी. व्ही. जयताळे, कृषी पर्यवेक्षक एम. एन. मनवर, कृषी सहायक मनोज जयस्वाल आदिंनी पाहणी केली. त्यावेळी बियाण्यांत ३५ टक्के भेसळ असल्याचे आढळून आले. या संदर्भातील अहवाल संबंधित शेतकºयाला त्यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज