शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

महाबीजच्या बियाण्यात आढळली ३५ टक्के भेसळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:13 IST

पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: येथील गोपाल आरेकर या शेतकऱ्याने यंदा महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर त्यात दोन प्रकारची झाडे उगवली होती. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी ‘सोयाबीन बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाने दखल घेत १५ सप्टेंबर रोजी या पिकाची पाहणी केली. या संदर्भातील अहवाल तयार झाला असून, पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.इंझोरी येथील शेतकरी गोपाल आरेकर यांनी कारंजा येथील एका कृषीसेवा केंद्रातून महाबीजच्या एका सोयाबीन वाणाचे ७ बॅग बियाणे खरेदी केले. त्यापैकी ३ बॅग बियाणे त्यांनी स्वत:च्या मालकीच्या १.२१ हेक्टर क्षेत्रात, तर उर्वरित ४ बॅग बियाणे त्यांचे वडिल हरीदास आरेकर यांच्या १.६२ हेक्टर क्षेत्रात पेरले होते. हे बियाणे चांगल्या प्रकारे उगवले; परंतु पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर वेगवेगळ्या झाडांना दोन प्रकारच्या शेंगा लागल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे बियाण्यांत भेसळ असल्याचे आणि उत्पादनात घट येणार असल्याचे त्यांना दिसले.त्यांनी याबाबत पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार केली. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले.त्याची दखल घेत मानोरा पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी डिगांबर मकासरे, कृषी शास्त्रज्ञ राजेश डवरे, मानोरा तालुका कृषी अधिकारी व्ही. के. घोडेकर, महाबिजचे प्रतिनिधी एम. एस. धांडे, मंडळ कृषी अधिकारी जी. व्ही. जयताळे, कृषी पर्यवेक्षक एम. एन. मनवर, कृषी सहायक मनोज जयस्वाल आदिंनी पाहणी केली. त्यावेळी बियाण्यांत ३५ टक्के भेसळ असल्याचे आढळून आले. या संदर्भातील अहवाल संबंधित शेतकºयाला त्यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज