शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वाशिम जिल्ह्यात कपाशीचे ३० हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 19:22 IST

वाशिम : कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले. 

ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले. यावर्षी शेतक-यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी बोंडअळीने हल्ला चढवून कापूस उत्पादक शेतक-यांच्या नाकीनऊ आणले. बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे (सर्वेक्षण) करण्याचे आदेश शासनाने कृषी विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने आता सर्वेक्षण पूर्ण केले. वाशिम जिल्ह्यात ३० हजार ९२१ हेक्टरवर ११९३७ शेतकºयांनी कपाशीची लागवड केली होती. सुरुवातीला अपु-या पावसामुळे अडचणीत आलेल्या कपाशीच्या पिकाला परतीच्या पावसाने चांगलाच आधार दिला; परंतु ही कपाशी वेचणीवर येत असतानाच त्यावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला. बोंडअळीग्रस्त क्षेत्राचा सर्व्हे करण्याचे आदेश कृषी विभागाला प्राप्त झाल्यानंतर, शेतकºयांसह गावांतील पंचांना घेऊन तलाठी आणि कृषी सहाय्यक, कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी कपाशीच्या शेतात भेटी देऊन पंचनामे केले. मानोरा तालुक्यात १३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण केले असता जिरायती भागातील १०२३ हेक्टर, तर बागायती भागातील १२२७८ हेक्टर क्षेत्रातील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे आढळले. मंगरुळपीर तालुक्यात १८७६ हेक्टरपैकी संपूर्ण क्षेत्र जिरायतीच असून, या सर्व क्षेत्रातील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला, त्याशिवाय रिसोड तालुक्यात ५२३ हेक्टर जिरायती आणि वाशिम तालुक्यातील ६५२ हेक्टर क्षेत्रातील जिरायती भागातील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला. मालेगाव तालुक्यात पेरणी केलेल्या १६५८.९ हेक्टर क्षेत्रापैकी जिरायती भागातील ९८.३३, तर बागायती क्षेत्रातील १५६०.६ हेक्टर क्षेत्रातील कपाशीला बोंडअळीचा फ टका बसला. कारंजा तालुक्यात सर्वाधिक १५६८२ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली असून, यापैकी जिरायती भागातील ७५२३.६१ हेक्टर कपाशीला बोंडअळीचा फटका बसला, असे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. सर्वेक्षणाचा हा अहवाल येत्या सोमवार किंवा मंगळवारी शासनाकडे पाठविला जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण अधिकारी डी.आर. साठे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस