शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

३० मेपासून २८ गावे पाणी पुरवठा योजना बंद होणार!

By admin | Updated: May 25, 2017 01:45 IST

मजिप्राचे सहायक कार्यकारी अभियंता, सरपंच व सचिवांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील २८ गावांना पाणी पुरवठा करणारी २८ गावे पाणी पुरवठा योजना ३० मे पासून बंद होणार, असे पत्र महा.जीवन प्राधिकरणचे सहायक कार्यकारी अभियंता यांनी संबंधित गावाच्या सरपंच सचिवांना दिले आहे. पाणीकर थकीत असल्याने ही योजना बंद होणार आहे. यामुळे भरउन्हाळ्यात व पाणी टंचाई असताना योजना बंद झाल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत.या योजनेची देखभाल व दुरुस्ती जीवन प्राधिकरण विभागातर्फे करण्यात येत असून वाईगौळ, उमरी, तळप, कार्ली, कारखेडा, धामणी, धानोरा, विठोली, माहुली, सेवादासनगर, सावळी, पाळोदी, बेलोरा, आसोला, भुली, गादेगाव ही गावे व मानोरा शहरास नियमित पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु ग्रामीण विभागातील पाणी पुरवठाधारक ग्राहकाकडून पाणी पट्टी वसूल फारच कमी होते.सदर योजना चालविणे व दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे ही बाब पाणीपट्टीधारकाकडून प्राप्त होणाऱ्या पाणीपट्टी वसुलीवरच आधारित आहे; परंतु सन २०१६ -१७ या योजनेच्या आर्थिक ताळेबंदाचा विचार केल्यास योजनेची आकारणी ४३.३८ लाख इतकी आहे; परंतु प्रत्यक्ष पाणीपट्टी वसुली २५.४७ लाख (५८ टक्के) इतकीच असून, या योजनेवर प्रत्यक्ष खर्च १५९.३९ लक्ष इतका झाल्याने या योजनेतील एका वर्षाचा तोटा १३३.९२ लाख इतका आहे. त्यामुळे सदर योजनेतील पाणीपट्टी वसुली न झाल्याने सदर योजना बंद करावी लागणार आहे. याबाबत विभागीय कार्यालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती मानोरा यांना अवगत करण्यात आले आहे व पाणीपट्टी वसुली न झाल्यास योजना बंद करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनासुद्धा अवगत करण्यात आले; परंतु गावाकडे थकीत असलेली ९० लाख रुपये इतकी रक्कम जिल्हा परिषद स्तरावरून वर्ग करुन मजीप्रा विभागास देण्याबाबत कार्यकारी अभियंता जि.प.वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.वाशिम, गटविकास अधिकारी पं.स.मानोरा, यांना पत्राव्दारे विनंती करण्यात आली आहे; परंतु त्याबाबत अद्यापही काहीच कार्यवाही झाली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांनी ९० लाख इतकी रक्कम २५ मे २०१७ पर्यंत उपलब्ध करुन द्यावी. सदर रक्कम उपलब्ध न झाल्यास ३० मे च्या मध्यरात्रीपासून संबंधित गावाचा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, असे पत्रात नमूद केले आहे. जर ही रक्कम जि.प.ने भरली नाही तर योजना बंद होईल आणि टंचाईग्रस्त गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, तरी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांत केली जात आहे.