शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

३० मेपासून २८ गावे पाणी पुरवठा योजना बंद होणार!

By admin | Updated: May 25, 2017 01:45 IST

मजिप्राचे सहायक कार्यकारी अभियंता, सरपंच व सचिवांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील २८ गावांना पाणी पुरवठा करणारी २८ गावे पाणी पुरवठा योजना ३० मे पासून बंद होणार, असे पत्र महा.जीवन प्राधिकरणचे सहायक कार्यकारी अभियंता यांनी संबंधित गावाच्या सरपंच सचिवांना दिले आहे. पाणीकर थकीत असल्याने ही योजना बंद होणार आहे. यामुळे भरउन्हाळ्यात व पाणी टंचाई असताना योजना बंद झाल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत.या योजनेची देखभाल व दुरुस्ती जीवन प्राधिकरण विभागातर्फे करण्यात येत असून वाईगौळ, उमरी, तळप, कार्ली, कारखेडा, धामणी, धानोरा, विठोली, माहुली, सेवादासनगर, सावळी, पाळोदी, बेलोरा, आसोला, भुली, गादेगाव ही गावे व मानोरा शहरास नियमित पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु ग्रामीण विभागातील पाणी पुरवठाधारक ग्राहकाकडून पाणी पट्टी वसूल फारच कमी होते.सदर योजना चालविणे व दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे ही बाब पाणीपट्टीधारकाकडून प्राप्त होणाऱ्या पाणीपट्टी वसुलीवरच आधारित आहे; परंतु सन २०१६ -१७ या योजनेच्या आर्थिक ताळेबंदाचा विचार केल्यास योजनेची आकारणी ४३.३८ लाख इतकी आहे; परंतु प्रत्यक्ष पाणीपट्टी वसुली २५.४७ लाख (५८ टक्के) इतकीच असून, या योजनेवर प्रत्यक्ष खर्च १५९.३९ लक्ष इतका झाल्याने या योजनेतील एका वर्षाचा तोटा १३३.९२ लाख इतका आहे. त्यामुळे सदर योजनेतील पाणीपट्टी वसुली न झाल्याने सदर योजना बंद करावी लागणार आहे. याबाबत विभागीय कार्यालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती मानोरा यांना अवगत करण्यात आले आहे व पाणीपट्टी वसुली न झाल्यास योजना बंद करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनासुद्धा अवगत करण्यात आले; परंतु गावाकडे थकीत असलेली ९० लाख रुपये इतकी रक्कम जिल्हा परिषद स्तरावरून वर्ग करुन मजीप्रा विभागास देण्याबाबत कार्यकारी अभियंता जि.प.वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.वाशिम, गटविकास अधिकारी पं.स.मानोरा, यांना पत्राव्दारे विनंती करण्यात आली आहे; परंतु त्याबाबत अद्यापही काहीच कार्यवाही झाली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांनी ९० लाख इतकी रक्कम २५ मे २०१७ पर्यंत उपलब्ध करुन द्यावी. सदर रक्कम उपलब्ध न झाल्यास ३० मे च्या मध्यरात्रीपासून संबंधित गावाचा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, असे पत्रात नमूद केले आहे. जर ही रक्कम जि.प.ने भरली नाही तर योजना बंद होईल आणि टंचाईग्रस्त गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, तरी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांत केली जात आहे.