शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

वाशिम जिल्ह्यात २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त!

By admin | Updated: January 29, 2017 02:45 IST

‘जलयुक्त शिवार’चा सकारात्मक परिणाम; गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी.

सुनील काकडे वाशिम, दि. २८ जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे जिल्ह्यातील २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त होणार आहेत. या योजनेच्या सकारात्मक परिणामामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी झाला आहे. 'पाणी अडवा-पाणी जिरवा', या संकल्पनेचा मूळ उद्देश डोळ्यासमोर सन २0१९ पर्यंत संपूर्ण राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने २0१५-१६ या सत्रापासून राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्यावर्षी जिल्ह्यातील २00 गावांचा यामध्ये समावेश झाला होता. वाशिम तालुक्यातील २६, रिसोड २७, मालेगाव २५, मानोरा ६१, मंगरूळपीर २७ आणि कारंजा तालुक्यातील ३४ गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. २0१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली होती. जलयुक्त शिवारच्या या कामांमुळे अनेक प्रकल्प, हातपंप, विहीरी आदि जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाईच्या उपाययोजनांवरील तरतूद देखील निम्म्यांपेक्षा कमी झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. गतवर्षी ५६१ गावांमध्ये होती पाणीटंचाई!गतवर्षी जिल्ह्यातील ७९८ गावांपैकी ५६१ गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर झाली होती. त्यानुसार, ५.६८ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करून ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. यंदा मात्र २९५ गावांचाच पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात समावेश आहे. यासाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षी ५६१ गावांमध्ये ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या. विहिरींमधील गाळ काढून खोलीकरण, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्णत्वास नेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, सिंचन विहिर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिर खोदकाम, कुपनलिका खोदकाम यासह इतर महत्वाकांक्षी कामे झाली. - गतवर्षी शासन-प्रशासनाचे प्रयत्न तथा लोकसहभागातून युद्धस्तरावर झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे २५0 पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईच्या संकटातून मुक्ती मिळाली आहे. या सर्वेक्षणातूनच यंदाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत २९५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. - शैलेष हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम