शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त!

By admin | Updated: January 29, 2017 02:45 IST

‘जलयुक्त शिवार’चा सकारात्मक परिणाम; गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी.

सुनील काकडे वाशिम, दि. २८ जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे जिल्ह्यातील २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त होणार आहेत. या योजनेच्या सकारात्मक परिणामामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी झाला आहे. 'पाणी अडवा-पाणी जिरवा', या संकल्पनेचा मूळ उद्देश डोळ्यासमोर सन २0१९ पर्यंत संपूर्ण राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने २0१५-१६ या सत्रापासून राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्यावर्षी जिल्ह्यातील २00 गावांचा यामध्ये समावेश झाला होता. वाशिम तालुक्यातील २६, रिसोड २७, मालेगाव २५, मानोरा ६१, मंगरूळपीर २७ आणि कारंजा तालुक्यातील ३४ गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. २0१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली होती. जलयुक्त शिवारच्या या कामांमुळे अनेक प्रकल्प, हातपंप, विहीरी आदि जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाईच्या उपाययोजनांवरील तरतूद देखील निम्म्यांपेक्षा कमी झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. गतवर्षी ५६१ गावांमध्ये होती पाणीटंचाई!गतवर्षी जिल्ह्यातील ७९८ गावांपैकी ५६१ गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर झाली होती. त्यानुसार, ५.६८ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करून ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. यंदा मात्र २९५ गावांचाच पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात समावेश आहे. यासाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षी ५६१ गावांमध्ये ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या. विहिरींमधील गाळ काढून खोलीकरण, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्णत्वास नेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, सिंचन विहिर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिर खोदकाम, कुपनलिका खोदकाम यासह इतर महत्वाकांक्षी कामे झाली. - गतवर्षी शासन-प्रशासनाचे प्रयत्न तथा लोकसहभागातून युद्धस्तरावर झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे २५0 पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईच्या संकटातून मुक्ती मिळाली आहे. या सर्वेक्षणातूनच यंदाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत २९५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. - शैलेष हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम