शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वाशिम जिल्ह्यात २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त!

By admin | Updated: January 29, 2017 02:45 IST

‘जलयुक्त शिवार’चा सकारात्मक परिणाम; गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी.

सुनील काकडे वाशिम, दि. २८ जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे जिल्ह्यातील २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त होणार आहेत. या योजनेच्या सकारात्मक परिणामामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी झाला आहे. 'पाणी अडवा-पाणी जिरवा', या संकल्पनेचा मूळ उद्देश डोळ्यासमोर सन २0१९ पर्यंत संपूर्ण राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने २0१५-१६ या सत्रापासून राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्यावर्षी जिल्ह्यातील २00 गावांचा यामध्ये समावेश झाला होता. वाशिम तालुक्यातील २६, रिसोड २७, मालेगाव २५, मानोरा ६१, मंगरूळपीर २७ आणि कारंजा तालुक्यातील ३४ गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. २0१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली होती. जलयुक्त शिवारच्या या कामांमुळे अनेक प्रकल्प, हातपंप, विहीरी आदि जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाईच्या उपाययोजनांवरील तरतूद देखील निम्म्यांपेक्षा कमी झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. गतवर्षी ५६१ गावांमध्ये होती पाणीटंचाई!गतवर्षी जिल्ह्यातील ७९८ गावांपैकी ५६१ गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर झाली होती. त्यानुसार, ५.६८ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करून ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. यंदा मात्र २९५ गावांचाच पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात समावेश आहे. यासाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षी ५६१ गावांमध्ये ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या. विहिरींमधील गाळ काढून खोलीकरण, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्णत्वास नेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, सिंचन विहिर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिर खोदकाम, कुपनलिका खोदकाम यासह इतर महत्वाकांक्षी कामे झाली. - गतवर्षी शासन-प्रशासनाचे प्रयत्न तथा लोकसहभागातून युद्धस्तरावर झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे २५0 पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईच्या संकटातून मुक्ती मिळाली आहे. या सर्वेक्षणातूनच यंदाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत २९५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. - शैलेष हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम