शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

वाशिम जिल्ह्यातील टंचाईग्रस्त २५ गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 17:34 IST

वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.  

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित आहे. उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले.अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.  

वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने वाशिम जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.  

गतवर्षी पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही तसेच पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्प आणि भूजल पातळीतही समाधानकारक वाढ होऊ शकली नव्हती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक गावांत पाणीेटंचाई निर्माण झाली. पाणीटंचाईग्रस्त गावांत उपाययोजनेचा एक भाग म्हणून विहिर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, तात्पुरती नळ योजना यासंदर्भात दिरंगाई करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. तथापि, पाणीटंचाईचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरच काही दिवस धूळखात पडत असल्याने संबंधित गावांत टँकर सुरू झाले नाहीत. विहिर अधिग्रहण करण्याचा वेग मात्र त्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यात एकूण ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित आहे. विहिर अधिग्रहीत केल्यानंतर तेथे ‘अधिग्रहित विहिर’ असा फलक लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसात प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे वाशिम तालुकाध्यक्ष दीपक खडसे यांनी बुधवारी केली. टँकरचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याची मागणीही खडसे यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी