शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाशिम जिल्ह्यातील टंचाईग्रस्त २५ गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 17:34 IST

वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.  

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित आहे. उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले.अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.  

वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने वाशिम जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.  

गतवर्षी पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही तसेच पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्प आणि भूजल पातळीतही समाधानकारक वाढ होऊ शकली नव्हती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक गावांत पाणीेटंचाई निर्माण झाली. पाणीटंचाईग्रस्त गावांत उपाययोजनेचा एक भाग म्हणून विहिर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, तात्पुरती नळ योजना यासंदर्भात दिरंगाई करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. तथापि, पाणीटंचाईचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरच काही दिवस धूळखात पडत असल्याने संबंधित गावांत टँकर सुरू झाले नाहीत. विहिर अधिग्रहण करण्याचा वेग मात्र त्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यात एकूण ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित आहे. विहिर अधिग्रहीत केल्यानंतर तेथे ‘अधिग्रहित विहिर’ असा फलक लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसात प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे वाशिम तालुकाध्यक्ष दीपक खडसे यांनी बुधवारी केली. टँकरचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याची मागणीही खडसे यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी