शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

परराज्य, महानगरात  गेलेले २२ हजार कामगार वाशिम जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:50 IST

परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे. दरम्यान, अधिकृत परवानगी घेऊन जवळपास ४ हजार कामगार, मजूर जिल्ह्यात दाखल झाले तर उर्वरीत १८ हजार मजूर, कामगार हे छुप्या मार्गाने दाखल झाल्याचे आरोग्य तपासणी मोहिमेवरून दिसून येते.जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यात प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील हजारो कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागण्यापूर्वी परजिल्हा, परराज्यात गेलेले जिल्ह्यातील २७ हजार ५०९ नागरिक जिल्ह्यात परतले होते. १० दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीतही परजिल्ह्यात अडकलेल्या मजुर, कामगारांना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार जिल्ह्यात १७ मे पर्यंत २२ हजार ४५२ कामगार, मजूर परतले असून, या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

तपासणी करताना सावधगिरीडेंजर झोनमधून येणाऱ्या मजुरांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा किटचा अभाव असल्याने कर्मचारही दक्षता घेऊनच तपासणी करीत आहेत.

सर्वांची प्रकृती ठणठणीतआरोग्य विभागातर्फे आतापर्यंत १८ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून, यापैकी तुर्तास तरी कुणाला कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या