शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:44 IST

गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असून, गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. अर्थात महिन्याला दोन शेतकरी आत्महत्याकारंजा तालुक्यात घडत असल्याचे स्पष्ट होत असून, या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी शासकीय मदतीसाठी १० पात्र, ६ अपात्र ठरल्या, तर ५ त्रुटीच्या फेºयात अडकल्याचे प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या बदलत्या चक्राचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेती करणे अवघड झाले असून, अगदी हातातोंडाशी आलेली पिकेही नैसर्गिक आपत्तीमुळे हातून जात असल्याने शेतकरी संकटात फसत चालला आहे. नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत असतानाच घराचा डोलारा कसा सांभाळायचा, हा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे दिसत आहे. त्यात एकट्या कारंजा तालुक्यात १३ जानेवारी २०१९ ते १३ नोव्हेंबर २०१९ या ११ महिन्यांच्या कालावधित २१ शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. शासनाच्या वतीने पात्र शेतकरी आत्महत्येस १ लाख रूपयांचे अनुदान दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रकरण प्रशासनाकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात येते. या प्रक्रियेंतर्गत कारंजा तालुक्यात ११ महिन्यात झालेल्या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी आतापर्यंत केवळ १० शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. ६ अपात्र ठरल्या तर ५ प्रकरणे अद्यापही त्रुटींमुळे प्रशासन दरबारी पडून आहेत. कारंजा तालुक्यात ११ महिन्यांत जय शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले त्यापैकी रामकृष्ण विठ्ठल हुमने रा. धोत्रा देशमुख, अंबादास चंद्रभान कंगाले रा. भामदेवी, जगन्नाथ गोरखाजी गाडेकर रा. येवता, गजानन कमलाकर शिंदे रा शिवनगर, नारायण गोविंदराव बिल्लेवार रा. धनज बु., रामहरी नारायण उपाध्ये रा. काजळेश्वर, रविंद्र नागोराव पाडे रा. येवता, मोहम्मद वहिद मो. शफी रा. कारंजा, रविंद्र रामदास राठोड रा. महागाव व रूपराव दिनकर शिंदे रा खेर्डा खु. या शेतकºयांच्या आत्महत्या शासकीय व प्रशासकीय निकषात पात्र ठरल्या तर ज्ञानेश्वर भिका सावळे, नितीन सुरेश भोयर, किशोर रामराव राऊत, विलास बाजीराव कापसे, संतोष यशवंत लव्हाळे व देवराव सदाशिव शेळके या ६ शेतकºयांच्या आत्महत्या निकषात न बसल्याने अपात्र ठरविण्यात आल्या. गणेश उंकडा वानखडे रा. विरगव्हाण, गजानन लुंगाजी रंगे रा. वडगाव रंगे, कुसुम सुधाकर बेलखेडे रा. बेलखेड, श्रीकृष्ण रंगराव पुंड रा. दुघोरा  व अवधुत झिंगराजी इंगळे रा. खानापूर या ५ शेतकºयांच्या आत्महत्येची प्रकरणे त्रुटीमुळे प्रशासन दरबारी प्रलंबित आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाfarmer suicideशेतकरी आत्महत्या