शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:44 IST

गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असून, गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. अर्थात महिन्याला दोन शेतकरी आत्महत्याकारंजा तालुक्यात घडत असल्याचे स्पष्ट होत असून, या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी शासकीय मदतीसाठी १० पात्र, ६ अपात्र ठरल्या, तर ५ त्रुटीच्या फेºयात अडकल्याचे प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या बदलत्या चक्राचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेती करणे अवघड झाले असून, अगदी हातातोंडाशी आलेली पिकेही नैसर्गिक आपत्तीमुळे हातून जात असल्याने शेतकरी संकटात फसत चालला आहे. नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत असतानाच घराचा डोलारा कसा सांभाळायचा, हा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे दिसत आहे. त्यात एकट्या कारंजा तालुक्यात १३ जानेवारी २०१९ ते १३ नोव्हेंबर २०१९ या ११ महिन्यांच्या कालावधित २१ शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. शासनाच्या वतीने पात्र शेतकरी आत्महत्येस १ लाख रूपयांचे अनुदान दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रकरण प्रशासनाकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात येते. या प्रक्रियेंतर्गत कारंजा तालुक्यात ११ महिन्यात झालेल्या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी आतापर्यंत केवळ १० शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. ६ अपात्र ठरल्या तर ५ प्रकरणे अद्यापही त्रुटींमुळे प्रशासन दरबारी पडून आहेत. कारंजा तालुक्यात ११ महिन्यांत जय शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले त्यापैकी रामकृष्ण विठ्ठल हुमने रा. धोत्रा देशमुख, अंबादास चंद्रभान कंगाले रा. भामदेवी, जगन्नाथ गोरखाजी गाडेकर रा. येवता, गजानन कमलाकर शिंदे रा शिवनगर, नारायण गोविंदराव बिल्लेवार रा. धनज बु., रामहरी नारायण उपाध्ये रा. काजळेश्वर, रविंद्र नागोराव पाडे रा. येवता, मोहम्मद वहिद मो. शफी रा. कारंजा, रविंद्र रामदास राठोड रा. महागाव व रूपराव दिनकर शिंदे रा खेर्डा खु. या शेतकºयांच्या आत्महत्या शासकीय व प्रशासकीय निकषात पात्र ठरल्या तर ज्ञानेश्वर भिका सावळे, नितीन सुरेश भोयर, किशोर रामराव राऊत, विलास बाजीराव कापसे, संतोष यशवंत लव्हाळे व देवराव सदाशिव शेळके या ६ शेतकºयांच्या आत्महत्या निकषात न बसल्याने अपात्र ठरविण्यात आल्या. गणेश उंकडा वानखडे रा. विरगव्हाण, गजानन लुंगाजी रंगे रा. वडगाव रंगे, कुसुम सुधाकर बेलखेडे रा. बेलखेड, श्रीकृष्ण रंगराव पुंड रा. दुघोरा  व अवधुत झिंगराजी इंगळे रा. खानापूर या ५ शेतकºयांच्या आत्महत्येची प्रकरणे त्रुटीमुळे प्रशासन दरबारी प्रलंबित आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाfarmer suicideशेतकरी आत्महत्या