शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:44 IST

गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असून, गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. अर्थात महिन्याला दोन शेतकरी आत्महत्याकारंजा तालुक्यात घडत असल्याचे स्पष्ट होत असून, या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी शासकीय मदतीसाठी १० पात्र, ६ अपात्र ठरल्या, तर ५ त्रुटीच्या फेºयात अडकल्याचे प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या बदलत्या चक्राचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेती करणे अवघड झाले असून, अगदी हातातोंडाशी आलेली पिकेही नैसर्गिक आपत्तीमुळे हातून जात असल्याने शेतकरी संकटात फसत चालला आहे. नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत असतानाच घराचा डोलारा कसा सांभाळायचा, हा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे दिसत आहे. त्यात एकट्या कारंजा तालुक्यात १३ जानेवारी २०१९ ते १३ नोव्हेंबर २०१९ या ११ महिन्यांच्या कालावधित २१ शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. शासनाच्या वतीने पात्र शेतकरी आत्महत्येस १ लाख रूपयांचे अनुदान दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रकरण प्रशासनाकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात येते. या प्रक्रियेंतर्गत कारंजा तालुक्यात ११ महिन्यात झालेल्या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी आतापर्यंत केवळ १० शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. ६ अपात्र ठरल्या तर ५ प्रकरणे अद्यापही त्रुटींमुळे प्रशासन दरबारी पडून आहेत. कारंजा तालुक्यात ११ महिन्यांत जय शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले त्यापैकी रामकृष्ण विठ्ठल हुमने रा. धोत्रा देशमुख, अंबादास चंद्रभान कंगाले रा. भामदेवी, जगन्नाथ गोरखाजी गाडेकर रा. येवता, गजानन कमलाकर शिंदे रा शिवनगर, नारायण गोविंदराव बिल्लेवार रा. धनज बु., रामहरी नारायण उपाध्ये रा. काजळेश्वर, रविंद्र नागोराव पाडे रा. येवता, मोहम्मद वहिद मो. शफी रा. कारंजा, रविंद्र रामदास राठोड रा. महागाव व रूपराव दिनकर शिंदे रा खेर्डा खु. या शेतकºयांच्या आत्महत्या शासकीय व प्रशासकीय निकषात पात्र ठरल्या तर ज्ञानेश्वर भिका सावळे, नितीन सुरेश भोयर, किशोर रामराव राऊत, विलास बाजीराव कापसे, संतोष यशवंत लव्हाळे व देवराव सदाशिव शेळके या ६ शेतकºयांच्या आत्महत्या निकषात न बसल्याने अपात्र ठरविण्यात आल्या. गणेश उंकडा वानखडे रा. विरगव्हाण, गजानन लुंगाजी रंगे रा. वडगाव रंगे, कुसुम सुधाकर बेलखेडे रा. बेलखेड, श्रीकृष्ण रंगराव पुंड रा. दुघोरा  व अवधुत झिंगराजी इंगळे रा. खानापूर या ५ शेतकºयांच्या आत्महत्येची प्रकरणे त्रुटीमुळे प्रशासन दरबारी प्रलंबित आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाfarmer suicideशेतकरी आत्महत्या