शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

ऑईलअभावी २०१ रोहित्र धुळखात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 12:46 IST

Washim MSEDCL News सिलिकान ऑईलच उपलब्ध नसल्याने दुरुस्ती होऊनही ते शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले २०१ रोहित्र ऑईलविना गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडले आहेत. शेतकरी हे रोहित्र मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु रोहित्रासाठी आवश्यक सिलिकान ऑईलच उपलब्ध नसल्याने दुरुस्ती होऊनही ते शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत.शेतकºयांना सिंचनासाठी सुरळीत वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणने जिल्ह्यातील जवळपास प्रत्येकच शिवारात कृषी फिडरवर रोहित्र बसविले आहेत. तथापि, यातील शेकडो रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकºयांना सुरळीत वीज पुरवठाच होऊ शकत नाही. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाभरात नादुरुस्त झालेले २०१ रोहित्र महावितरणने दुरुस्तीसाठी शेतकºयांच्या शेतातून काढून आणले. त्याबाबतचा अहवालही वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला आणि रोहित्रांची दुरुस्तीही करण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. जे. तायडे यांनी दिली आहे. तथापि, या रोहित्रात टाकण्यासाठी आवश्यक आॅईलच उपलब्ध नसल्याने ते दुरुस्त होऊनही शेतकºयांच्या शेतात बसविल्या गेले नाहीत. त्यात १०० केव्हीएचे ५०, ६३ केव्हीएचे ४५, तर १०६ एसयूडीएस (लहान रोहित्र) रोहित्रांचा समावेश आहे. यामुळे खरीपातील कापूस पिकासह ऊस, पपई, केळी, हळद ही बहुविध पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. शिवाय यंदाचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यात आले आहेत. या रोहित्रांसाठी २५ हजार लिटर आॅईलची मागणी वरिष्ठस्तरावर केली आहे; परंतु ऑईल उपलब्ध नसल्याने ते लावता येत नाहीत. दोन चार दिवसांत आॅईल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.-आर. जे. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण वाशिमआमच्या शिवारातील रोहित्र २ महिन्यांपूर्वी नादुरुस्त झाले. त्यामुळे कापूस, ऊस, हळद, आदी पिके धोक्यात आली आहेत. तसेच मुबलक पाणी असतानाही रोहित्राअभावी रब्बी हंगामाची पेरणी अशक्य आहे.-लक्ष्मण इंगळे,शेतकरी, उमरा (शम), ता. वाशिम

 

टॅग्स :washimवाशिम