शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार २६९ शेतकऱ्यांनी यापूर्वीच घेतलाय कर्जमुक्ती योजनेचा लाभ; ठरविले अपात्र

By दिनेश पठाडे | Updated: November 6, 2023 11:31 IST

योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासांठीही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. तथापि, योजनेसाठी पात्र नसतानाही अर्ज केलेले ४ हजार ८५८ शेतकरी अपात्र ठरले आहेत तर सात हजारांवर शेतकरी होल्डवर आहेत.

योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासांठीही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातून ३४ हजार १४१ शेतकऱ्यांची खाते पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी २२ हजार ३८४ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्याने त्यांना अनुदानाचा मार्ग मोकळा झाला. त्यातील आतापर्यंत २१ हजार ८७० शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी २२ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला नसल्याने ते अपात्र आहेत की, पात्र असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये होता. त्यामुळे सहकार आयुक्तांनी अपात्र आणि होल्डवर असलेल्या शेतकऱ्यांची यादी कारणांसह जिल्हा सहकार विभागाला नुकतीच पाठविली आहे. त्यामध्ये २ हजार २६९ शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतल्याने त्यांना अपात्र करण्यात आले.

सहकारी संस्थांचे पदाधिकारी १, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी ६, आयकर भरणा करणारे १ हजार ८१८ आणि शासकीय सेवेत असलेले ७१४ शेतकरी असून एकूण ४ हजार ८५८ शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्याशिवाय निकषांत न बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असून ते खातेही होल्डवर ठेवण्यात आले आहेत. त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नसल्याची चिन्हे आहेत.पात्र शेतकऱ्यांना ९०.२२ कोटी वाटपजिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी केवासयी केल्यानंतर शासनस्तरावरून थेट बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. जिल्ह्यातील २१ हजार ८७० शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी २२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. केवायसी केलेले केवळ ३३६ शेतकऱ्यांना अनुदान देणे शिल्लक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी