शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

‘समृद्धी’साठी वाशिम जिल्ह्यातील ११८२ हेक्टर जमीन संपादित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:07 IST

कारंजा तालुक्यातील दोनद बुद्रूक या गावातून वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची सुरुवात होणार असून, रिसोड तालुक्यातील केनवड येथे संपणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १ हजार १८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. याकरिता ५९३ कोटी ५५ लाख रुपये मोबदला वितरीत करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांशी सांगड घालून मृद व जलसंधारणाची कामेही केली जात आहेत.राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ५५ गावांतून जात असून, जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर ९७.२३३ किलोमीटर असणार आहे. कारंजा तालुक्यातील दोनद बुद्रूक या गावातून वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची सुरुवात होणार असून, रिसोड तालुक्यातील केनवड येथे संपणार आहे. या महामार्गावर कारंजा तालुक्यातील २३ मंगरुळपीर तालुक्यातील १०, मालेगाव तालुक्यातील २१ आणि रिसोड तालुक्यातील एक गाव येणार आहे. या महामार्गासाठी संबंधित गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यास दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला आणि आज रोजी जिल्ह्यातील १ हजार १८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमीनीसाठी शेतकऱ्यांना ५९३ कोटी ५५ लाख रुपये मोबदला वितरीत करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांशी सांगड घालून मृद व जलसंधारणाची कामेही केली जात आहेत. त्यामुळे शेतकºयांना दुहेरी फायदा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या संदर्भात १५ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात माहिती दिली. समृद्धी महामार्गासाठी पहिल्या टप्प्यात ८९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून लँड पुलिंग योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील जमिनींची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील गावे समृद्धी महामार्ग पॅकेज दोन अंतर्गत येत असल्याने जमिनींची वेगात खरेदी करणे आवश्यक होते. ही प्रक्रिया अनेक अडथळ्यानंतर सुरू झाली आणि या महामार्गाच्या कामाला सुरुवातही झाली.सुरुवातीला वाशिम जिल्ह्यात लँण्डपुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकºयांचा प्रचंड विरोध होता; परंतु मार्च २०१७ च्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शेतकºयांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि मिळणाºया मोबदल्याबाबत बहुतांश शेतकºयांनी समाधानही व्यक्त केले.

मोबदल्याबाबत काही शेतकरी निराशवाशिम जिल्ह्यात लँण्डपुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकºयांचा प्रचंड विरोध होता; परंतु मार्च २०१७ च्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शेतकºयांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि मिळणाºया मोबदल्याबाबत बहुतांश शेतकºयांनी समाधानही व्यक्त केले. तथापि, अद्याप विविध कारणांमुळे काही शेतकºयांचा मोबदला प्रलंबित असतानाच या मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पार पडल्यानंतरही शासनाकडून मिळालेल्या मोबदल्याबाबत काही शेतकरी निराश आहेत. त्यामुळेच काही शेतकºयांनी या महिन्याच्या सुरुवातीपर्यंतही जमिनीचा ताबा सोडला नव्हता.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग