शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी वाशिम जिल्ह्यातील ११८२ हेक्टर जमीन संपादित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:07 IST

कारंजा तालुक्यातील दोनद बुद्रूक या गावातून वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची सुरुवात होणार असून, रिसोड तालुक्यातील केनवड येथे संपणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १ हजार १८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. याकरिता ५९३ कोटी ५५ लाख रुपये मोबदला वितरीत करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांशी सांगड घालून मृद व जलसंधारणाची कामेही केली जात आहेत.राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ५५ गावांतून जात असून, जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर ९७.२३३ किलोमीटर असणार आहे. कारंजा तालुक्यातील दोनद बुद्रूक या गावातून वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची सुरुवात होणार असून, रिसोड तालुक्यातील केनवड येथे संपणार आहे. या महामार्गावर कारंजा तालुक्यातील २३ मंगरुळपीर तालुक्यातील १०, मालेगाव तालुक्यातील २१ आणि रिसोड तालुक्यातील एक गाव येणार आहे. या महामार्गासाठी संबंधित गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यास दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला आणि आज रोजी जिल्ह्यातील १ हजार १८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमीनीसाठी शेतकऱ्यांना ५९३ कोटी ५५ लाख रुपये मोबदला वितरीत करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांशी सांगड घालून मृद व जलसंधारणाची कामेही केली जात आहेत. त्यामुळे शेतकºयांना दुहेरी फायदा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या संदर्भात १५ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात माहिती दिली. समृद्धी महामार्गासाठी पहिल्या टप्प्यात ८९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून लँड पुलिंग योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील जमिनींची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील गावे समृद्धी महामार्ग पॅकेज दोन अंतर्गत येत असल्याने जमिनींची वेगात खरेदी करणे आवश्यक होते. ही प्रक्रिया अनेक अडथळ्यानंतर सुरू झाली आणि या महामार्गाच्या कामाला सुरुवातही झाली.सुरुवातीला वाशिम जिल्ह्यात लँण्डपुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकºयांचा प्रचंड विरोध होता; परंतु मार्च २०१७ च्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शेतकºयांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि मिळणाºया मोबदल्याबाबत बहुतांश शेतकºयांनी समाधानही व्यक्त केले.

मोबदल्याबाबत काही शेतकरी निराशवाशिम जिल्ह्यात लँण्डपुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकºयांचा प्रचंड विरोध होता; परंतु मार्च २०१७ च्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शेतकºयांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि मिळणाºया मोबदल्याबाबत बहुतांश शेतकºयांनी समाधानही व्यक्त केले. तथापि, अद्याप विविध कारणांमुळे काही शेतकºयांचा मोबदला प्रलंबित असतानाच या मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पार पडल्यानंतरही शासनाकडून मिळालेल्या मोबदल्याबाबत काही शेतकरी निराश आहेत. त्यामुळेच काही शेतकºयांनी या महिन्याच्या सुरुवातीपर्यंतही जमिनीचा ताबा सोडला नव्हता.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग