शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१.७८ लाख शेतकर्‍यांना पीक विम्याचा आधार!

By admin | Updated: June 12, 2016 02:52 IST

वाशिम जिल्ह्यासाठी ६९ कोटी ४८ लाख रुपये मंजूर : अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा

दादाराव गायकवाड /वाशिममागील ३ वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना पीक विम्याचा आधार मिळणार असून, राज्य शासनाच्यचा पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ८५३ शेतकर्‍यांना मागील खरीप हंगामासाठी ६९ कोटी ४८ लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे. मागील वर्षी अर्थात २0१५ च्या खरीप हंगामात पावसाच्या हुलकावणीमुळे तब्बल एक महिना उशिरा पेरणी झाली. अनियमित पावसामुळे व उशिरा झालेल्या पेरणीमुळे होणार्‍या पीक नुकसानीची भरपाई मिळावी, याकरिता जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. या योजनेचा विमा काढण्याची मुदत सुरुवातीला ३१ जुलैपर्यत होती. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्‍यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्याला प्राधान्य दिले. जिल्ह्यातील ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांनी २ लाख ११ हजार ९३0 हेक्टर क्षेत्रासाठी ३९२ कोटी ५१ लाख रुपयांचा पीक विमा उतरविला होता. या विम्यासाठी २0 कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम विमा हप्ता म्हणून भरण्यात आली होती. आता ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांपैकी त्यापैकी सुमारे १ लाख ७८ हजार ८५३ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले असून, विम्यापोटी त्यांना ६९ कोटी ४८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मागील खरीप हंगामातील विम्यापोटी ही रक्कम मिळणार आहे. पीक विम्याची रक्कम मिळाल्याने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना आगामी खरीप पेरणीसाठी बियाणे-खत खरेदीसाठी मदत होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादनात होणारी घट पाहता, अनेक शेतकरी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचा पीक विमा उतरवितात. तूर, मूग, उडिद, सोयाबीन, कापूस या खरिपातील पिकांसाठी जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधून ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला. यापैकी १ लाख ७८ हजार ८५३ शेतकर्‍यांचाच पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे १ लाख २२ हजार ३३८ शेतकर्‍यांना पीक विम्याच्या मोबदल्यात कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सद्यस्थितीत स्पष्ट होत आहे. पीक विमा देताना गत पाच वर्षातील उंबरठा उत्पन्न आणि मंडळनिहाय निकषांमुळे १ लाखाहून अधिक शेतकर्‍यांना फटका बसला. यापुढे शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यामुळे संबंधित योजनेबाबत शेतकर्‍यांना पूर्ण मार्गदर्शन करण्याची गरज आहे.