शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

१.७८ लाख शेतकर्‍यांना पीक विम्याचा आधार!

By admin | Updated: June 12, 2016 02:52 IST

वाशिम जिल्ह्यासाठी ६९ कोटी ४८ लाख रुपये मंजूर : अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा

दादाराव गायकवाड /वाशिममागील ३ वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना पीक विम्याचा आधार मिळणार असून, राज्य शासनाच्यचा पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ८५३ शेतकर्‍यांना मागील खरीप हंगामासाठी ६९ कोटी ४८ लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे. मागील वर्षी अर्थात २0१५ च्या खरीप हंगामात पावसाच्या हुलकावणीमुळे तब्बल एक महिना उशिरा पेरणी झाली. अनियमित पावसामुळे व उशिरा झालेल्या पेरणीमुळे होणार्‍या पीक नुकसानीची भरपाई मिळावी, याकरिता जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. या योजनेचा विमा काढण्याची मुदत सुरुवातीला ३१ जुलैपर्यत होती. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्‍यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्याला प्राधान्य दिले. जिल्ह्यातील ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांनी २ लाख ११ हजार ९३0 हेक्टर क्षेत्रासाठी ३९२ कोटी ५१ लाख रुपयांचा पीक विमा उतरविला होता. या विम्यासाठी २0 कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम विमा हप्ता म्हणून भरण्यात आली होती. आता ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांपैकी त्यापैकी सुमारे १ लाख ७८ हजार ८५३ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले असून, विम्यापोटी त्यांना ६९ कोटी ४८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मागील खरीप हंगामातील विम्यापोटी ही रक्कम मिळणार आहे. पीक विम्याची रक्कम मिळाल्याने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना आगामी खरीप पेरणीसाठी बियाणे-खत खरेदीसाठी मदत होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादनात होणारी घट पाहता, अनेक शेतकरी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचा पीक विमा उतरवितात. तूर, मूग, उडिद, सोयाबीन, कापूस या खरिपातील पिकांसाठी जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधून ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला. यापैकी १ लाख ७८ हजार ८५३ शेतकर्‍यांचाच पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे १ लाख २२ हजार ३३८ शेतकर्‍यांना पीक विम्याच्या मोबदल्यात कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सद्यस्थितीत स्पष्ट होत आहे. पीक विमा देताना गत पाच वर्षातील उंबरठा उत्पन्न आणि मंडळनिहाय निकषांमुळे १ लाखाहून अधिक शेतकर्‍यांना फटका बसला. यापुढे शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यामुळे संबंधित योजनेबाबत शेतकर्‍यांना पूर्ण मार्गदर्शन करण्याची गरज आहे.