शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘त्या’ युवकांची १५०० किमी सायकलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 10:19 IST

बिहार राज्यातील पाटणा येथील हितेश नामक युवकासह चार जण औरंगाबाद येथे कामाला गेले होते.

- शंकर वाघ लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबाद येथील रोजगार गेल्याने, मूळचे बिहार राज्यातील पाटणा येथील चार ते पाच युवक सायकलने परत बिहारकडे निघाले. १५ मे रोजी मेहकर ते मालेगाव मार्गावरील कुकसा फाटा येथे या युवकांनी नाश्ता, पाणी केल्यानंतर पुन्हा सायकलने पुढचा मार्ग धरला.मेहकर ते मालेगाव या मार्गाने दररोज मुंबई, पूणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना येथे विविध कंपन्यातील शेकडो मजूर, कामगार मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतत आहेत. रेल्वे, एसटी बसेसची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे मालवाहू वाहनातुन तसेच काही जण सायकलने आपापल्या गावी परतत आहेत. बिहार राज्यातील पाटणा येथील हितेश नामक युवकासह चार जण औरंगाबाद येथे कामाला गेले होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्योगधंदे बंद असल्याने या युवकांचा रोजगारही गेला. गावी परत जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांनी औरंगाबाद येथे सायकल घेउन या सायकलने १५०० किमी अंतर असलेल्या पाटणाकडे आगेकुच चालविली आहे. एवढी आपत्ती कधी पाहिली नाही, असे ते म्हणाले.आॅटोने गाठले पुसदपुसद येथील प्रकाश गोपा जाधव यांनी आपबिती कथन केली. बहिणीच्या कुटुंबासोबत मुंबई येथे बिल्डर कंपनीत सेक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये ते पाच वषार्पासून काम करीत होते. त्यांच्या कुटुंबात एकूण सात सदस्य आहे. त्यांनी मुंबईतच आपली घरे थाटली होती. मात्र कोरोनाने जगभरात घातलेल्या थैमानामुळे देशातही लॉकडाउन करण्यात आले. यामुळे रोजगार गेल्याने आम्ही मालवाहू आॅटोमधून पुसदकडे जात असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन