शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

अबब! सोयाबीनच्या एका झाडाला १५० शेंगा; शेतकरी गटाच्या परिश्रमाची फलश्रुती

By दादाराव गायकवाड | Updated: September 6, 2022 13:50 IST

मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य पीक बनले आहे.

वाशिम - जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पेरणीच्या पद्धतीत बदल केले आहेत. त्याचे चांगले परिणाम आता दिसत असून, चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पेरलेल्या सोयाबीन पिकातील प्रत्येक झाडाला सरासरी १४० ते १५० शेंगा लागल्या आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांना सोयाबीनचे भरघोस उत्पादन होणार असल्याचे दिसून येते.

मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य पीक बनले आहे. या पिकाच्या शेंगा आता परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. यंदाच्या हंगामात पेरणीच्या पद्धतीत शेतकऱ्यांनी बदल केला. काहींनी सरीवरंबा पद्धती, काहींनी पट्टा पद्धतीचा अवलंब केला. यासाठी टोकण यंत्र आणि बीबीएफ यंत्राचा आधार घेतला. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ झाली आहे. चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी बचत गटातील २५ शेतकऱ्यांनी पट्टा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाच्या झाडांना सरासरी १४० ते १५० शेंगा लागल्या आहेत.

३० एकरात सरसकट एकच वाण

चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी गटाने पारपंरिक पद्धती डावलून यंदा पट्टा पद्धतीने पेरणी करण्यासाठी सरसकट एकाच वाणाचा वापर केला. या शेतकऱ्यांंनी ३० एकर क्षेत्रात सोयाबीनचे जेएस ९३०५ हे वाण वापरले. अधिक उत्पादनासाठी हे वाण ओळखले जातेच शिवाय या वाणावर किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव थोडा कमी आढळतो.

यंदाच्या हंगामात आम्ही पाणी फाऊंडेशनकडून आयोजित सोयाबीन शेतीशाळेतील मार्गदर्शनाच्या आधारे एक गट एक वाण, तसेच पट्टा पेरणी पद्धतीचा अवलंब करून जेएस ९३०५ हे वाण वापरले. याचा फायदा झाला. एका झाडाला सरासरी १४० ते १५० पेक्षा अधिक शेंगा लागल्या आहेत.

- श्याम भगत, सदस्य , अर्णवी शेतकरी गट, चिंचाळा (मंगरुळपीर) 

टॅग्स :washimवाशिम