शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अबब! सोयाबीनच्या एका झाडाला १५० शेंगा; शेतकरी गटाच्या परिश्रमाची फलश्रुती

By दादाराव गायकवाड | Updated: September 6, 2022 13:50 IST

मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य पीक बनले आहे.

वाशिम - जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पेरणीच्या पद्धतीत बदल केले आहेत. त्याचे चांगले परिणाम आता दिसत असून, चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पेरलेल्या सोयाबीन पिकातील प्रत्येक झाडाला सरासरी १४० ते १५० शेंगा लागल्या आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांना सोयाबीनचे भरघोस उत्पादन होणार असल्याचे दिसून येते.

मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य पीक बनले आहे. या पिकाच्या शेंगा आता परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. यंदाच्या हंगामात पेरणीच्या पद्धतीत शेतकऱ्यांनी बदल केला. काहींनी सरीवरंबा पद्धती, काहींनी पट्टा पद्धतीचा अवलंब केला. यासाठी टोकण यंत्र आणि बीबीएफ यंत्राचा आधार घेतला. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ झाली आहे. चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी बचत गटातील २५ शेतकऱ्यांनी पट्टा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाच्या झाडांना सरासरी १४० ते १५० शेंगा लागल्या आहेत.

३० एकरात सरसकट एकच वाण

चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी गटाने पारपंरिक पद्धती डावलून यंदा पट्टा पद्धतीने पेरणी करण्यासाठी सरसकट एकाच वाणाचा वापर केला. या शेतकऱ्यांंनी ३० एकर क्षेत्रात सोयाबीनचे जेएस ९३०५ हे वाण वापरले. अधिक उत्पादनासाठी हे वाण ओळखले जातेच शिवाय या वाणावर किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव थोडा कमी आढळतो.

यंदाच्या हंगामात आम्ही पाणी फाऊंडेशनकडून आयोजित सोयाबीन शेतीशाळेतील मार्गदर्शनाच्या आधारे एक गट एक वाण, तसेच पट्टा पेरणी पद्धतीचा अवलंब करून जेएस ९३०५ हे वाण वापरले. याचा फायदा झाला. एका झाडाला सरासरी १४० ते १५० पेक्षा अधिक शेंगा लागल्या आहेत.

- श्याम भगत, सदस्य , अर्णवी शेतकरी गट, चिंचाळा (मंगरुळपीर) 

टॅग्स :washimवाशिम