शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अबब! सोयाबीनच्या एका झाडाला १५० शेंगा; शेतकरी गटाच्या परिश्रमाची फलश्रुती

By दादाराव गायकवाड | Updated: September 6, 2022 13:50 IST

मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य पीक बनले आहे.

वाशिम - जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पेरणीच्या पद्धतीत बदल केले आहेत. त्याचे चांगले परिणाम आता दिसत असून, चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पेरलेल्या सोयाबीन पिकातील प्रत्येक झाडाला सरासरी १४० ते १५० शेंगा लागल्या आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांना सोयाबीनचे भरघोस उत्पादन होणार असल्याचे दिसून येते.

मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य पीक बनले आहे. या पिकाच्या शेंगा आता परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. यंदाच्या हंगामात पेरणीच्या पद्धतीत शेतकऱ्यांनी बदल केला. काहींनी सरीवरंबा पद्धती, काहींनी पट्टा पद्धतीचा अवलंब केला. यासाठी टोकण यंत्र आणि बीबीएफ यंत्राचा आधार घेतला. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ झाली आहे. चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी बचत गटातील २५ शेतकऱ्यांनी पट्टा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाच्या झाडांना सरासरी १४० ते १५० शेंगा लागल्या आहेत.

३० एकरात सरसकट एकच वाण

चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी गटाने पारपंरिक पद्धती डावलून यंदा पट्टा पद्धतीने पेरणी करण्यासाठी सरसकट एकाच वाणाचा वापर केला. या शेतकऱ्यांंनी ३० एकर क्षेत्रात सोयाबीनचे जेएस ९३०५ हे वाण वापरले. अधिक उत्पादनासाठी हे वाण ओळखले जातेच शिवाय या वाणावर किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव थोडा कमी आढळतो.

यंदाच्या हंगामात आम्ही पाणी फाऊंडेशनकडून आयोजित सोयाबीन शेतीशाळेतील मार्गदर्शनाच्या आधारे एक गट एक वाण, तसेच पट्टा पेरणी पद्धतीचा अवलंब करून जेएस ९३०५ हे वाण वापरले. याचा फायदा झाला. एका झाडाला सरासरी १४० ते १५० पेक्षा अधिक शेंगा लागल्या आहेत.

- श्याम भगत, सदस्य , अर्णवी शेतकरी गट, चिंचाळा (मंगरुळपीर) 

टॅग्स :washimवाशिम