शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील १३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 18:25 IST

वाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१८-१९ चा (एनएमएमएस) निकाल शनिवार, २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात वाशिम जिल्ह्यातील विविध शाळांचे १३९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१८-१९ चा (एनएमएमएस) निकाल शनिवार, २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात वाशिम जिल्ह्यातील विविध शाळांचे १३९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, २०१८-१९ ची परीक्षा नोव्हेंबर २०१८ या महिन्यात घेण्यात आली होती. त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. त्यातून १३९ विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता सिद्ध केली. संबंधित विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत प्रतीमाह एक हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार असून सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती ललीत भुरे यांनी दिली. कारंजातील विद्यार्थ्यांची यंदाही बाजी!वाशिम जिल्ह्यातील कारंजाला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तेथील जे.सी. चवरे, जे.डी. चवरे विद्यालय व कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एनएमएमएस’ परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत जे.डी. चवरे आणि कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेच्या प्रत्येकी ३१ विद्यार्थी-विद्यार्थीनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या असून जे.सी. चवरे विद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांनी यात यश संपादन केले आहे.

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती