शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्ह्यातील आठ पुलांसाठी १३.५२ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:57 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पहिल्या टन्प्यात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बांधकामासाठी भरीव निधी मंजूर झाला होता. त्यातून रस्त्यांची कामे पूर्ण झाली; ...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पहिल्या टन्प्यात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बांधकामासाठी भरीव निधी मंजूर झाला होता. त्यातून रस्त्यांची कामे पूर्ण झाली; परंतु जोपर्यंत रस्त्यांवर पुलांची कामे होत नाहीत, तोपर्यंत विशेष फायदा होणार नव्हता. त्यानुषंगाने जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींनी मंत्रालयीन स्तरावर हा प्रश्न लावून धरला. त्याची अखेर दखल घेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या एडीबी टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यातील आठ पुलांच्या बांधकामांसाठी लागणारा १३ कोटी ५२ लाख ६२ हजारांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्ष ठाकरे यांनी दिली.

...........................

या रस्त्यांवरील पुलांची कामे लागणार मार्गी

जिल्ह्यातील वाघोली खु.-अडोळी या रस्त्यावरील पुलासाठी ७३.८१ लाख, वाघोली बु.-अडोळी ८७.७९ लाख, मुठ्ठा-शिरपूर २२०.०५ लाख, प्रजिमा १९ ते शेगी भडकुंभा-दाभडी-कुंभी-वसंतवाडी ते जिल्हा सीमेवरील पुलाकरिता २०२.१२ लाख प्रजिमा १९ ते शेगी भडकुंभा-दाभडी-कुंभी-वसंतवाडी सीमेवरील पुलाकरिता ४०५.१३ लाख, साखरडोह ते सिंगडोह रस्त्यावरील पुलासाठी २०६.९१ लाख, गिरोली ते खेर्डा रस्त्यावरील पुलाकरिता १४९.७३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुलांची ही कामे आता मार्गी लागणार आहेत.