शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पश्चिम वऱ्हाडातील अभयारण्यासाठी १.३१ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 14:24 IST

वाशिम: राज्य शासनाने निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत विविध अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पात विकास कामे करण्यासाठी ५.६३ कोटी रुपयांचा निधी २८ मार्च रोजी मंजूर केला.

ठळक मुद्दे निसर्ग पर्यटन केंद्रांत विविध विकास कामे करून सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने ५ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट वन्यजीव अभयारण्यासाठी १ कोटी २१ लाख ४५७.बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यासाठी ४९ लाख ६६४, तर वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यासाठी १० लाख २६०५ रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

वाशिम: राज्य शासनाने निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत विविध अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पात विकास कामे करण्यासाठी ५.६३ कोटी रुपयांचा निधी २८ मार्च रोजी मंजूर के ला असून, यामध्ये पश्चिम वऱ्हाडातील अकोट वन्यजीव अभयारण्य आणि वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यासाठी मंजूर केलेल्या १.३१ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. अटी आणि निकषाच्या अधीन राहून निसर्ग पर्यटन विकासाची कामे या निधीतून करण्यात येणार आहेत.निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांत पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून वन्यजीव पर्यटनाकडे त्यांना आकर्षित करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. या अंतर्गत राज्यभरातील वन्यजीव अभयारण्य, पक्षी अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या निसर्ग पर्यटन केंद्रांत विविध विकास कामे करून सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने ५ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्यातील अकोट वन्यजीव अभयारण्यासाठी १ कोटी २१ लाख ४५७, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यासाठी ४९ लाख ६६४, तर वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यासाठी १० लाख २६०५ रुपयांच्या निधीचा समावेश आहे. यामुळे संबंधित अभयारण्यात निसर्ग पर्यटनाच्या विकासासाठी विविध योजना राबविणे शक्य होणार आहे. सदर निधीचा वापर अटी आणि निकषांच्या अधीन राहून करावयाचा आहे. दरम्यान, अमरावती विभागातील टिपेश्वर अभयारण्य, सीपना वन्यजीव आणि गुगामल वन्यजीव या अभयारण्यातही निसर्ग पर्यटनासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अमरावती विभागात येत्या काही वर्षांत निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमKatepurna Forestकाटेपूर्णा अभयारण्यwildlifeवन्यजीव