शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात

By सुनील काकडे | Updated: January 15, 2024 18:21 IST

‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी

वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार ८९६ लाभार्थींपैकी ११ हजार १२० लाभार्थींनी अद्यापपर्यंत ई-केवायसी आणि आधार सिडींग केलेली नाही. संपृक्तता अर्थात ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी होवूनही या लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले आहे. यामुळे कृषी विभागही संभ्रमात सापडला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्थसहाय्यासाठी पात्र ठरलेल्या १ लाख ८२ हजार ८९६ लाभार्थींना प्रत्येकवेळी आधार सिडींग आणि ई-केवायसी करावी लागते. मात्र, १५ डिसेंबर २०२३ अखेर १७ हजार ८१ लाभार्थींकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कृषी विभागाकडून १५ जानेवारी २०२४ पर्यंत गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात आली.

सन्मान निधीचा १६ वा हप्ता मिळण्यापुर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा उद्देश बाळगण्यात आला. २२ डिसेंबरपर्यंत विविध कारणांमुळे योजनेच्या १५ व्या हप्त्यापासून वंचित असलेल्या लाभार्थींचा शोध घेऊन त्यांची ई-केवायसी, आधार सिंडिग पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, युद्धस्तरावर मोहीम राबवून ५ हजार ९६१ लाभार्थींचा शोध घेण्यात आला. मात्र, ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले असून कृषी विभागही यामुळे संभ्रमात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.९० टक्के लाभार्थी मयत झाल्याची दाट शक्यताविविध स्वरूपातील कारणांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हप्त्यापासून १५ डिसेंबर २०२३ अखेर १७ हजार ८१ लाभार्थी वंचित होते. त्यांची शोधमोहीम कृषी विभागाने हाती घेवून ५ हजार ९६१ लाभार्थींचा शोध घेतला; मात्र उर्वरित ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले असून त्यातील ९० टक्के लाभार्थी मयत झाल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.एक नजर आकडेवारीएकूण पात्र लाभार्थी- १,८२,८९६१५वा हप्ता मिळालेले- १,५६,९४३१५ डिसेंबरअखेर वंचित - १७,०८१शोध लागलेले शेतकरी - ५,९६१शोध न लागलेले शेतकरी- ११,१२०ई-केवायसी प्रलंबित असलेले लाभार्थी - ५७९०आधार सिडींग बाकी असलेले लाभार्थी - ५३३०प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी केली जात आहे. आधार सिंडिग नसलेले, ई-केवायसी न केलेले, नवीन लाभार्थी शोध मोहिम आदी कामे याअंतर्गत केली जात आहेत. मात्र, ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले आहे. त्यातील ९० टक्के लाभार्थी मयत झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.- आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी