शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात

By सुनील काकडे | Updated: January 15, 2024 18:21 IST

‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी

वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार ८९६ लाभार्थींपैकी ११ हजार १२० लाभार्थींनी अद्यापपर्यंत ई-केवायसी आणि आधार सिडींग केलेली नाही. संपृक्तता अर्थात ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी होवूनही या लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले आहे. यामुळे कृषी विभागही संभ्रमात सापडला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्थसहाय्यासाठी पात्र ठरलेल्या १ लाख ८२ हजार ८९६ लाभार्थींना प्रत्येकवेळी आधार सिडींग आणि ई-केवायसी करावी लागते. मात्र, १५ डिसेंबर २०२३ अखेर १७ हजार ८१ लाभार्थींकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कृषी विभागाकडून १५ जानेवारी २०२४ पर्यंत गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात आली.

सन्मान निधीचा १६ वा हप्ता मिळण्यापुर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा उद्देश बाळगण्यात आला. २२ डिसेंबरपर्यंत विविध कारणांमुळे योजनेच्या १५ व्या हप्त्यापासून वंचित असलेल्या लाभार्थींचा शोध घेऊन त्यांची ई-केवायसी, आधार सिंडिग पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, युद्धस्तरावर मोहीम राबवून ५ हजार ९६१ लाभार्थींचा शोध घेण्यात आला. मात्र, ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले असून कृषी विभागही यामुळे संभ्रमात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.९० टक्के लाभार्थी मयत झाल्याची दाट शक्यताविविध स्वरूपातील कारणांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हप्त्यापासून १५ डिसेंबर २०२३ अखेर १७ हजार ८१ लाभार्थी वंचित होते. त्यांची शोधमोहीम कृषी विभागाने हाती घेवून ५ हजार ९६१ लाभार्थींचा शोध घेतला; मात्र उर्वरित ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले असून त्यातील ९० टक्के लाभार्थी मयत झाल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.एक नजर आकडेवारीएकूण पात्र लाभार्थी- १,८२,८९६१५वा हप्ता मिळालेले- १,५६,९४३१५ डिसेंबरअखेर वंचित - १७,०८१शोध लागलेले शेतकरी - ५,९६१शोध न लागलेले शेतकरी- ११,१२०ई-केवायसी प्रलंबित असलेले लाभार्थी - ५७९०आधार सिडींग बाकी असलेले लाभार्थी - ५३३०प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी केली जात आहे. आधार सिंडिग नसलेले, ई-केवायसी न केलेले, नवीन लाभार्थी शोध मोहिम आदी कामे याअंतर्गत केली जात आहेत. मात्र, ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले आहे. त्यातील ९० टक्के लाभार्थी मयत झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.- आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी