शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात

By सुनील काकडे | Updated: January 15, 2024 18:21 IST

‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी

वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार ८९६ लाभार्थींपैकी ११ हजार १२० लाभार्थींनी अद्यापपर्यंत ई-केवायसी आणि आधार सिडींग केलेली नाही. संपृक्तता अर्थात ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी होवूनही या लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले आहे. यामुळे कृषी विभागही संभ्रमात सापडला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्थसहाय्यासाठी पात्र ठरलेल्या १ लाख ८२ हजार ८९६ लाभार्थींना प्रत्येकवेळी आधार सिडींग आणि ई-केवायसी करावी लागते. मात्र, १५ डिसेंबर २०२३ अखेर १७ हजार ८१ लाभार्थींकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कृषी विभागाकडून १५ जानेवारी २०२४ पर्यंत गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात आली.

सन्मान निधीचा १६ वा हप्ता मिळण्यापुर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा उद्देश बाळगण्यात आला. २२ डिसेंबरपर्यंत विविध कारणांमुळे योजनेच्या १५ व्या हप्त्यापासून वंचित असलेल्या लाभार्थींचा शोध घेऊन त्यांची ई-केवायसी, आधार सिंडिग पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, युद्धस्तरावर मोहीम राबवून ५ हजार ९६१ लाभार्थींचा शोध घेण्यात आला. मात्र, ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले असून कृषी विभागही यामुळे संभ्रमात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.९० टक्के लाभार्थी मयत झाल्याची दाट शक्यताविविध स्वरूपातील कारणांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हप्त्यापासून १५ डिसेंबर २०२३ अखेर १७ हजार ८१ लाभार्थी वंचित होते. त्यांची शोधमोहीम कृषी विभागाने हाती घेवून ५ हजार ९६१ लाभार्थींचा शोध घेतला; मात्र उर्वरित ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले असून त्यातील ९० टक्के लाभार्थी मयत झाल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.एक नजर आकडेवारीएकूण पात्र लाभार्थी- १,८२,८९६१५वा हप्ता मिळालेले- १,५६,९४३१५ डिसेंबरअखेर वंचित - १७,०८१शोध लागलेले शेतकरी - ५,९६१शोध न लागलेले शेतकरी- ११,१२०ई-केवायसी प्रलंबित असलेले लाभार्थी - ५७९०आधार सिडींग बाकी असलेले लाभार्थी - ५३३०प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी केली जात आहे. आधार सिंडिग नसलेले, ई-केवायसी न केलेले, नवीन लाभार्थी शोध मोहिम आदी कामे याअंतर्गत केली जात आहेत. मात्र, ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले आहे. त्यातील ९० टक्के लाभार्थी मयत झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.- आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी