शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वाशिम जिल्ह्यात ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:23 IST

वाशिम : ग्रामीण विकासाला चालना देणाºया ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण विकासाला चालना देणाºया ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणावी तसेच ११ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरपंच संघटनेने लावून धरली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न वाढावे आणि गाव समृद्ध व्हावे यासाठी शासनातर्फे ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध अकरा कामे मोहिम स्वरुपात घेऊन राबविणे आवश्यक आहे. वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ कामे प्राधान्याने राबविण्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत. या ११ कलमी कार्यक्रमांत सिंचन विहिरी, शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, ग्रामभवन, गावांतर्गत रस्ते, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, समृद्ध गाव तलाव व इतर जलसंधारणाची कामे, वृक्ष लागवड व संगोपन आणि ग्राम सबलीकरणाच्या समृद्ध ग्राम योजनांचा समावेश आहे. ग्रामीण विकासाला मोठा हातभार लावणाºया महत्वाकांक्षी अशा ११ कलमी कार्यक्रमाची अमंलबजावणी करावी, अशी मागणी सरपंच संघटनेने वारंवार केली आहे. विविध टप्प्यात आंदोलनदेखील करण्यात आले. मात्र, अद्याप या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली नाही, असे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खरिप हंगाम आटोपल्याने आणि रब्बी हंगामात फारसा रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांना कामे मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी तसेच विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच संघटनेचे दीपक खडसे यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना