शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

वाशिम जिल्ह्यात ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:23 IST

वाशिम : ग्रामीण विकासाला चालना देणाºया ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण विकासाला चालना देणाºया ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणावी तसेच ११ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरपंच संघटनेने लावून धरली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न वाढावे आणि गाव समृद्ध व्हावे यासाठी शासनातर्फे ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध अकरा कामे मोहिम स्वरुपात घेऊन राबविणे आवश्यक आहे. वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ कामे प्राधान्याने राबविण्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत. या ११ कलमी कार्यक्रमांत सिंचन विहिरी, शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, ग्रामभवन, गावांतर्गत रस्ते, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, समृद्ध गाव तलाव व इतर जलसंधारणाची कामे, वृक्ष लागवड व संगोपन आणि ग्राम सबलीकरणाच्या समृद्ध ग्राम योजनांचा समावेश आहे. ग्रामीण विकासाला मोठा हातभार लावणाºया महत्वाकांक्षी अशा ११ कलमी कार्यक्रमाची अमंलबजावणी करावी, अशी मागणी सरपंच संघटनेने वारंवार केली आहे. विविध टप्प्यात आंदोलनदेखील करण्यात आले. मात्र, अद्याप या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली नाही, असे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खरिप हंगाम आटोपल्याने आणि रब्बी हंगामात फारसा रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांना कामे मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी तसेच विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच संघटनेचे दीपक खडसे यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना