शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

पैनगंगेच्या पुरामुळे तुटला १० गावांचा संपर्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:46 IST

पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव या धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव या धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडले जात असून यामुळे नदीला शनिवारी व रविवारी मोठा पूर आला. त्याने वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील १० गावांचा संपर्क तुटला. तसेच शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुड्याही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वाशिम जिल्ह्यात अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत आहे. अवकाळी स्वरूपातील या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबिन, तूर, कपाशी या पिकांची प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. याशिवाय फळबागांनाही जबर फटका बसला आहे. यामुळे जिल्हाभरातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरते संकटात सापडले आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण आणि बाधीत पिकांचे पंचनामे करण्याचे काम महसूल, कृषी विभागासह प्रशासनातील अन्य यंत्रणांकडून केले जात आहे. अशातच वाशिम जिल्ह्याला लागून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातही धुवाँधार पाऊस होऊन पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव ही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने त्याचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आल्याने शनिवारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहिली. यामुळे नदी काठावर वसलेल्या रिसोड तालुक्यातील वाकद, गोहोगाव, महागाव, बाळखेड, सरपखेड, पेनबोरी, धोडप बु., धोडप खु., देगाव, रिठद यासह अन्य काही गावांमधील शेतशिवारांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेतांमध्ये शेतकऱ्यांनी रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्या वाहून गेल्या. यासह शेकडो हेक्टर शेतजमिनीवरील सुपीक माती वाहून गेली. पुरामुळे शनिवारी दिवसभर आणि रविवारी सायंकाळपर्यंत दहा गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क पुर्णत: तुटला होता. रात्रीच्या सुमारास पुराचे पाणी ओसरल्यानंतर विस्कळित झालेले जनजीवन पुर्वपदावर आले; मात्र तोवर शेतशिवारांमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी अधिकच हतबल झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील धरणांमधून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरात शेतांमध्ये उभी असलेली तूर आणि हळद या पिकांना जबर फटका बसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात असतानाच आता पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामेही करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी बाधीत शेतकºयांमधून जोर धरत आहे.अवकाळी पावसामुळे बाधीत झाली ८०२ गावे; २११ गावांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण!जिल्ह्यात गत काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ८०२ गावे बाधीत होऊन सोयाबिन, तूर, कपाशी या पिकांसोबतच फळबागा व काहीठिकाणी फुलपिक व भाजीपाला पिकांची जबर हानी झाली. दरम्यान, प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीची पाऊले उचलत ३ नोव्हेंबरपर्यंत २११ गावांमधील ५७ हजार ७३८ शेतकºयांच्या शेतातील नुकसानाच्या पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. त्याच्या याद्या ४० ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध देखील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमriverनदीfloodपूर