शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

विक्रमगड तालुक्यात जि.प. शिक्षण विभागाचा ‘पांगुळगाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:50 IST

शेकडोपदे रिक्त, ताण वाढला; विद्यार्थ्यांना धड वाचताही येत नसल्याची तक्रार

- राहुल वाडेकरविक्रमगड : जि.प.च्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची १५० पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहात आहे. त्यामुळे एक अथवा दोन शिक्षकांना अनेक वर्गाना शिकवावे लागत आहे. शिवाय शासनाच्या योजना आणि इतर कामे करावी लागत असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावर परिणाम झाला आहे.तालुक्यात जिल्हा परीषद शाळे अंतर्गत व इतर आश्रम शाळेत एकूण १६ हजार ६७२ विद्यार्थीशिक्षण घेत आहेत. असे असताना विक्रमगड पंचायत समिती याच्या शिक्षण विभागात एकूण ७९७ पदे मंजुर असुन त्या पैकी ६२९ पदे भरण्यात आली आहेत तर १६८ पदे रिक्त आहेत. या मध्ये विस्तार अधिकारी वर्ग - २ मधील ४ पदे मंजुर असुन ३ पदे रीक्त आहेत. विस्तार अधिकारी वर्ग - ३ मधील ३ पदे मंजुर असून २ पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखाची १६ पदे मंजुर असुन २ पदे रिक्त आहेत. मुख्यध्यापकाची ३६ पदे मंजुर असून ११ पदे रिक्त आहेत. पदविधर शिक्षकाची १५० पदे मंजुर असून ७९ पदे रिक्त आहेत. तर सहशिक्षकाची ५८६ पदे मंजुर असून ७१ पदे रीक्त आहेत. अशी तालुक्यातील शिक्षण विभागा अंतर्गत ७९७ पदा पैकी १६८ पदे रीक्त आहेत.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत चौथी ते सातवीच्या अनेक विद्यार्थ्यांना गुणाकार, भागाकार व इंग्रजीत स्पेलिंगचे पाहिजे तसे ज्ञान मिळत नसल्याने त्याचा शैक्षणिक पाया कमकुवत असल्याचा आरोप पालकांन कडून होत आहे. आदिवासी तालुका असल्याने शासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. फक्त शाळा दुरुस्तीवर ठेकेदाराच्या फायदयासाठी लाखो रुपये खर्च केला जात असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पदवीधर शिक्षकाची ७९ तर सहशिक्षकाची ७१ अशी १५० पदे रिक्त आहेत. या परिस्थितीमुळे एक किंवा दोन शिक्षकांना दोन ते तीन वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. रिक्त पदांमुळे तालुक्यातील शैक्षणिक दर्जा ढासळत चालला आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतून नाव काढून पालक खासगी शाळांना पसंती देत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात खासगी शाळांचा वरचष्मा आहे. त्याची फी परवडणारी नसतांनाही पालक आर्थिक अडचण सोसून ती विनातक्रार भरत आहेत.पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्या संदर्भात वरीष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यावहार केला आहे.- भगवान मोकाशी, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, विक्रमगडविक्र मगड तालुक्यात शिक्षणाची स्थिती भयावह आहे. रिक्त पदामुळे एका शिक्षकाला दोन ते तीन वर्ग सांभाळावे लागत आहेत. त्यातच तालुक्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही घसरली असून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्या संदर्भात शासनाने उपाय योजना करायला हव्यात.- ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे,तालुका अध्यक्ष, विक्रमगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीpalgharपालघर