शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

परिवर्तनासाठी युवक-युवतींनी व्यवस्थेचा भाग बनून सक्रिय होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:51 IST

तलासरीत पंचायत राज व्यवस्थेवर कार्यशाळा

तलासरी : पंचायत राज व्यवस्थेत नेतृत्व विकासाची मोठी संधी आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवक-युवतींनी या व्यवस्थेचा भाग बनून सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहन कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तलासरी व डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्ट आयोजित ‘पंचायत राज व्यवस्थेतील नेतृत्व गुण विकास संधी’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार विनोद निकोले यांनी केले. याप्रसंगी त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा आमदार कसा झालो. याबद्दलचे अनुभव कथन केले. पंचायत राज योजनेमुळे लोकशाही व्यवस्था कशी बळकट करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. मुक्ता दाभोळकर यांनी ग्रामसभेतून गावाचा विकास करण्यासाठी युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे अनेक दाखले देऊन पटवून दिले. तसेच स्थानिक संस्थांमध्ये युवक-युवतींनी स्वत:च्या विकासाबरोबरच गावाचा विकास करण्यासाठी सहभागी होऊन, एकूणच राष्ट्र विकास करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

साधना वैराळे यांनी डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्टच्या माध्यमातून पंचायत राज अभियान राबविण्यासाठी उभारलेल्या चळवळीचे विविध अनुभव कथन केले. प्रमोद गोवारी या कार्यकर्त्याने आपले अनुभव कथन करून सरपंचाच्या माध्यमातून पंचायत राज योजनेमुळे गावाचा कसा विकास करता येतो हे सांगितले.संस्थेचे अध्यक्ष एल.एस. कोम यांनी या वेळी आपले राजकीय अनुभव सांगून तरुणांनी सर्व योजनांची माहिती करून घेतली पाहिजे व समाजाच्या सर्व थरांतील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्र माबद्दल अभिप्राय नोंदविला आणि आम्ही नक्कीच समाजाच्या उन्नतीसाठी सर्व योजनांची माहिती करून देण्यासाठी सक्रि य राहू, अशी मते व्यक्त केली. या कार्यक्र मास सर्व प्राध्यापक, दोनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

सुरेखा दळवी यांनी आदिवासी समाजासाठी असलेला कायदा किती महत्त्वाचा आहे, हे सांगून या कायद्याची अंमलबजावणी नीट करण्यासाठी कायदा समजून घेण्यासाठी तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. हा आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी अतिशय महत्त्वाचा कायदा असल्याचे सांगितले. अल्लाउद्दीन शेख यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून विविध समित्यांचे महत्त्व सांगून रेशन व्यवस्था किती महत्त्वाची आहे. या व्यवस्थेत भ्रष्टाचार कसा होतो. तो कमी करण्यासाठी युवकांनी काय केले पाहिजे, याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. तसेच पंचायत राज अभियानासंदर्भात गीतही सादर केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र