शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

वसईत शेतकरी सन्मान निधी योजनेच काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 05:31 IST

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. वसई तालुक्यात त्याच्या अंमलबजावणीस आरंभ झाला आहे.

पारोळ : शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. वसई तालुक्यात त्याच्या अंमलबजावणीस आरंभ झाला आहे. त्याअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रती शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य लवकर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली. शेतक-यांसाठी असलेली कल्याणकारी योजनेची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, यासाठी तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांची एक विशेष बैठक घेऊन त्यांना या योजनेची माहिती दिली व त्याची गाव पातळीवर माहिती देऊन तात्काळ अंमलबजावणी करुन शेतकºयांना लाभ पोहचिवण्याच्या सूचनाही दिल्यात. योजनेअंतर्गत प्रत्येक गावनिहाय खातेदार शेतक-यांची संगणीकृत यादी करण्यात येणार आहे. तसेच वनहक्क कायद्याअंतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबांचाही या योजनेत समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या कुटुंबाचे विविध ठिकाणचे मिळून लागवडी योग्य एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना ही योजना लागू आहे. खातेदारांचे कुटुंबनिहाय वर्गीकरण केल्यानंतर ज्या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी योग्य एकूण धारण क्षेत्र दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबाची यादी तयार करण्यात येणार असून १ फेब्रूवारी २०१९ रोजी असलेले धारण क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. या यादीत पात्र खातेदारांचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, आयएफसी कोडसह बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आदी माहिती संकलित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत संवैधानिक पद धारण करणारे तसेच आजी, माजी राज्यसभा सदस्य, माजी खासदार, आजी राज्यमंत्री, माजीमंत्री विधानसभा, आजी माजी आमदार, महानगर पालिकेचे आजी माजी महापौर, विधान परीषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी, स्वायत्त संस्थाचे अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारक व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, चार्टर्ड आकाऊटंट सनदी लेखापाल, आर्किटेक्ट इत्यादी क्षेत्रातीलव्यक्ती लाभ मिळण्यासाठी पात्र असणार नाहीत.यांना मिळणार नाही लाभयोजनेचा लाभ आजी-माजी आमदार, मंत्री, माजी महापौर, आजी-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांचे कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक निवृत्तीवेतन धारक व्यक्ती अपात्र आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी