शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

साखरा पुलाचे काम अद्याप अपूर्ण; प्रवाशांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:08 IST

रखडलेल्या पुलाच्या कामामुळे नागरिक त्रस्त

- हुसेन मेमनजव्हार : संततधार पावसामुळे जव्हार - विक्र मगड - पालघर मार्गावरील साखरा पूल रोजच पाण्याखाली जात असल्याने जव्हार मोखाडा आणि खोडाळा तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा ठाणे, मुंबईला जाण्यासाठी बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. तीन वर्षांपासून या पुलाच्या अपूर्ण आणि रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.आजतागायत या पुलाचे काम अपूर्ण आहे. ठेकेदाराच्या कामांच्या दिरंगाईमुळे पावसाळ्यात वाहन चालकांवर निष्कारण त्रास सहन करण्याची वेळ येते आहे. पूल पाण्याखाली जात असल्याने वाहन चालकांना पुलाच्या काठावर बसून पुलावरील पाणी कमी होण्याची तासन्तास वाट पहावी लागत आहे.या नदीवरील पुलाचे काम आर.के.सावंत, नाशिक यांना देण्यात आले. मात्र, तीन वर्षे उलटली तरी हे काम पूर्ण झालेले नाही. सध्या तरी जुनाट आणि धोकादायक पूलावरून वाहतूक सुरु आहे. या जुन्या पुलाची उंची कमी असल्याने तासभर पाऊस राहिला की, हा जुनाट पूल लगेच पाण्याखाली जातो.या साखरा पुलाचे काम लवकरच व्हावे म्हणून येथील ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्र ारी केल्या आहेत. मात्र हा जव्हार - विक्र मगड आणि पालघर रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्याचे सार्वजनिक बांधकाम सांगत आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरित झाला नसल्याचे सांगत रखडलेल्या साखरा पुलाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. मग, या साखरा पुलाचे काम पूर्ण होईल तरी कसे असा सवाल नागरिकांना पडला आहे.पूल पाण्याखाली विद्यार्थ्यांना फटकासाखरा गावातील साखरा आश्रम शाळा आणि ऐना आश्रम शाळा या दोन्ही आश्रम शाळा या साखरा पुलाच्या जव्हारच्या बाजूने असल्याने साखरा गावातील आणि त्या परिसरातील विद्यार्थ्यांनाही शाळेला दांडी मारावी लागते आहे.आश्रम शाळेचे काही कर्मचारी साखरा गावात राहत असल्याने त्यांचाही खोळंबा होतो. दोन्ही आश्रम शाळेतील आजारी विद्यार्थ्यांना त्या बाजूने साखरा येथे घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.साखरे पुलावरील खड्डे बुजवलेविक्रमगड : सातत्याने पडणाºया पावसात विक्रमगड - जव्हार मार्गावरील साखरे गावाजवळील जुन्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता वाहनांसाठी सुरक्षित करण्यासाठी या गावातील तरूणांनी श्रमदानातून सोमवारी हे खड्डे दगड, माती टाकून बुजवले आणि रस्ता वाहनांसाठी सुरू केला. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढला व पुलावरून पाणी गेले तर पुन्हा खड्डे पडतील.चारोटीमार्गे पालघर गाठावे लागतेसाखरा येथील जुनाट पूल पाण्याखाली तर नवीन पुलाचे काम चार वर्षांपासून संथगतीने सुरू असून अपूर्ण आहे. त्यामुळे जुनाट पूल सतत पाण्याखाली असल्याने या जव्हार, मोखाडा आणि खोडाळा या तालुक्यातील वाहन चालकांना जव्हार चारोटी मार्गे लांबचा पल्ला मारून मुंबई - अहमदाबादहायवे मार्गे पालघर, ठाणे, मुंबई गाठावे लागते. या लांबच्या फेºयामुळे चालक नाराज आहेत.जव्हार - विक्र मगड - पालघर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झालेला नाही. अजूनही तो बांधकाम विभागाकडेच आहे. त्यामुळे त्या रखडलेल्या पुलाच्या कामाचे सांगता येणार नाही.- निलेश महाजन, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग.साखरा पुलाचे रखडलेले काम लवकरच व्हावे यासाठी आम्ही अनेकदा ग्रामसभेत ठराव घेऊन तक्र ार केली आहे. तरीही या रखडलेल्या पुलाचे काम अपूर्ण आहे. यामुळे परिसरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि चालकांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.- कांता भुसारा, साखरा ग्रा.सदस्य.