शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

साखरा पुलाचे काम अद्याप अपूर्ण; प्रवाशांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:08 IST

रखडलेल्या पुलाच्या कामामुळे नागरिक त्रस्त

- हुसेन मेमनजव्हार : संततधार पावसामुळे जव्हार - विक्र मगड - पालघर मार्गावरील साखरा पूल रोजच पाण्याखाली जात असल्याने जव्हार मोखाडा आणि खोडाळा तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा ठाणे, मुंबईला जाण्यासाठी बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. तीन वर्षांपासून या पुलाच्या अपूर्ण आणि रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.आजतागायत या पुलाचे काम अपूर्ण आहे. ठेकेदाराच्या कामांच्या दिरंगाईमुळे पावसाळ्यात वाहन चालकांवर निष्कारण त्रास सहन करण्याची वेळ येते आहे. पूल पाण्याखाली जात असल्याने वाहन चालकांना पुलाच्या काठावर बसून पुलावरील पाणी कमी होण्याची तासन्तास वाट पहावी लागत आहे.या नदीवरील पुलाचे काम आर.के.सावंत, नाशिक यांना देण्यात आले. मात्र, तीन वर्षे उलटली तरी हे काम पूर्ण झालेले नाही. सध्या तरी जुनाट आणि धोकादायक पूलावरून वाहतूक सुरु आहे. या जुन्या पुलाची उंची कमी असल्याने तासभर पाऊस राहिला की, हा जुनाट पूल लगेच पाण्याखाली जातो.या साखरा पुलाचे काम लवकरच व्हावे म्हणून येथील ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्र ारी केल्या आहेत. मात्र हा जव्हार - विक्र मगड आणि पालघर रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्याचे सार्वजनिक बांधकाम सांगत आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरित झाला नसल्याचे सांगत रखडलेल्या साखरा पुलाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. मग, या साखरा पुलाचे काम पूर्ण होईल तरी कसे असा सवाल नागरिकांना पडला आहे.पूल पाण्याखाली विद्यार्थ्यांना फटकासाखरा गावातील साखरा आश्रम शाळा आणि ऐना आश्रम शाळा या दोन्ही आश्रम शाळा या साखरा पुलाच्या जव्हारच्या बाजूने असल्याने साखरा गावातील आणि त्या परिसरातील विद्यार्थ्यांनाही शाळेला दांडी मारावी लागते आहे.आश्रम शाळेचे काही कर्मचारी साखरा गावात राहत असल्याने त्यांचाही खोळंबा होतो. दोन्ही आश्रम शाळेतील आजारी विद्यार्थ्यांना त्या बाजूने साखरा येथे घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.साखरे पुलावरील खड्डे बुजवलेविक्रमगड : सातत्याने पडणाºया पावसात विक्रमगड - जव्हार मार्गावरील साखरे गावाजवळील जुन्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता वाहनांसाठी सुरक्षित करण्यासाठी या गावातील तरूणांनी श्रमदानातून सोमवारी हे खड्डे दगड, माती टाकून बुजवले आणि रस्ता वाहनांसाठी सुरू केला. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढला व पुलावरून पाणी गेले तर पुन्हा खड्डे पडतील.चारोटीमार्गे पालघर गाठावे लागतेसाखरा येथील जुनाट पूल पाण्याखाली तर नवीन पुलाचे काम चार वर्षांपासून संथगतीने सुरू असून अपूर्ण आहे. त्यामुळे जुनाट पूल सतत पाण्याखाली असल्याने या जव्हार, मोखाडा आणि खोडाळा या तालुक्यातील वाहन चालकांना जव्हार चारोटी मार्गे लांबचा पल्ला मारून मुंबई - अहमदाबादहायवे मार्गे पालघर, ठाणे, मुंबई गाठावे लागते. या लांबच्या फेºयामुळे चालक नाराज आहेत.जव्हार - विक्र मगड - पालघर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झालेला नाही. अजूनही तो बांधकाम विभागाकडेच आहे. त्यामुळे त्या रखडलेल्या पुलाच्या कामाचे सांगता येणार नाही.- निलेश महाजन, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग.साखरा पुलाचे रखडलेले काम लवकरच व्हावे यासाठी आम्ही अनेकदा ग्रामसभेत ठराव घेऊन तक्र ार केली आहे. तरीही या रखडलेल्या पुलाचे काम अपूर्ण आहे. यामुळे परिसरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि चालकांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.- कांता भुसारा, साखरा ग्रा.सदस्य.