शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

वसईहून सुटणार महिला स्पेशल, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 02:34 IST

सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे.

वसई  - सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे. २५ डिसेंबरपासून हा निर्णय अंमलात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.वसई रोड येथून सकाळी वाजून ९.५७ मिनिटांनी महिलांसाठी विशेष लोकल सोडण्यात येत होती. नोकरी करणाऱ्या महिलांसह, वयोवृद्ध, आजारी आणि गर्भवती महिलांसाठी ऐन गर्दीच्या वेळेत या लोकलमुळे मोठा दिलासा मिळत होता. नायगांव, भार्इंदर स्थानकातील महिलांनाही ही लोकल सोयीची ठरत होती. परंतु१ आॅक्टोबरपासून पश्चिम रेल्वेने बदललेल्या लोकलच्या वेळापत्रकात वसई रोडवरून सुटणारी विशेष महिला लोकल रद्द करून ती विरारहून सोडण्याचा निर्णय घेतला होता . वसई रोड येथून प्रवास करणाºया महिला प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याचे कारण रेल्वेकडून देण्यात आले. याबाबत रेल्वेकडून पाहणी करण्यात आली होती. त्याशिवाय भार्इंदरवरून सुटणारी महिला लोकलही अशाच पद्धतीने विरारहून सोडण्यात येत आहे. रेल्वेच्या या निर्णयाविरोधात वसई रोड- नायगांव, मीरा-भार्इंदरहून प्रवास करणार्या महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.वसई, नायगांव, भार्इंदर आणि मीरा रोड येथून प्रवास करणाºया महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वेने काढलेला निष्कर्ष चुकीचा असून महिला विशेष लोकल पुन्हा वसई वरून सोडण्यात यावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली. लोकल विरार व नालासोपारा येथूनच भरून येऊ लागल्याने वसई तसेच नायगांव येथील महिलांना लोकलमध्ये चढणे त्रासदायक होऊ लागले.याबाबत मध्यंतरी वसईतील महिलांच्या शिष्टमंडळाने आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली होती. आ. क्षितिज ठाकूर यांनी त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत चर्चाही केली होती. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या समस्येवर तोडगा काढला असून महिला लोकलची संख्या दोनने वाढवण्यात आली आहे. त्यानुसार २५ डिसेंबरपासून वसईहून पूर्वीप्रमाणेच सकाळी महिला विशेष लोकल सुटणार आहे.विविध संघटना व पक्षांच्या मोर्चेबांधणीला यशमहिलांच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांची भेट घेत महिला लोकल ट्रेन रद्द करू नये म्हणून सर्वप्रथम निवेदन सादर केले होते. ही लोकल रद्द करू नये म्हणून सह्यांची मोहिमही हाती घेण्यात आली होती. रेल्वे प्रवासी अँड. मृदुला खेडेकर यांच्या शिष्टमंडळाने आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांची विरार येथे भेट घेत याबाबत रेल्वेच्या वरिष्ठांशी चर्चा करावी म्हणून विनंती केली होती.त्यानंतर आमदार क्षितिज ठाकूर यांनी त्वरित हालचाल करून अप्पर महासंचालक राहुल जैन यांना पत्र पाठवून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती. तसेच, शिवसेनेकडूनही विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. ‘मी वसई कर’ अभियानानेही सह्यांची मोहीम हाती घेत ही लोकल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते.रेल्वेने महिला स्पेशल लोकलसाठी केलेला सर्वे चुकीचा केला होता. वसई रोड व पुढील स्थानकावरून प्रवास करणाºया महिलांना ही वसई लोकल रद्द केली तर मोठा त्रासाला सामोरे जावे लागले होते.- अँड. मृदुला खेडेकर, महिला स्पेशललोकल प्रवासी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbai Localमुंबई लोकल