शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वसईहून सुटणार महिला स्पेशल, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 02:34 IST

सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे.

वसई  - सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे. २५ डिसेंबरपासून हा निर्णय अंमलात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.वसई रोड येथून सकाळी वाजून ९.५७ मिनिटांनी महिलांसाठी विशेष लोकल सोडण्यात येत होती. नोकरी करणाऱ्या महिलांसह, वयोवृद्ध, आजारी आणि गर्भवती महिलांसाठी ऐन गर्दीच्या वेळेत या लोकलमुळे मोठा दिलासा मिळत होता. नायगांव, भार्इंदर स्थानकातील महिलांनाही ही लोकल सोयीची ठरत होती. परंतु१ आॅक्टोबरपासून पश्चिम रेल्वेने बदललेल्या लोकलच्या वेळापत्रकात वसई रोडवरून सुटणारी विशेष महिला लोकल रद्द करून ती विरारहून सोडण्याचा निर्णय घेतला होता . वसई रोड येथून प्रवास करणाºया महिला प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याचे कारण रेल्वेकडून देण्यात आले. याबाबत रेल्वेकडून पाहणी करण्यात आली होती. त्याशिवाय भार्इंदरवरून सुटणारी महिला लोकलही अशाच पद्धतीने विरारहून सोडण्यात येत आहे. रेल्वेच्या या निर्णयाविरोधात वसई रोड- नायगांव, मीरा-भार्इंदरहून प्रवास करणार्या महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.वसई, नायगांव, भार्इंदर आणि मीरा रोड येथून प्रवास करणाºया महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वेने काढलेला निष्कर्ष चुकीचा असून महिला विशेष लोकल पुन्हा वसई वरून सोडण्यात यावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली. लोकल विरार व नालासोपारा येथूनच भरून येऊ लागल्याने वसई तसेच नायगांव येथील महिलांना लोकलमध्ये चढणे त्रासदायक होऊ लागले.याबाबत मध्यंतरी वसईतील महिलांच्या शिष्टमंडळाने आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली होती. आ. क्षितिज ठाकूर यांनी त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत चर्चाही केली होती. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या समस्येवर तोडगा काढला असून महिला लोकलची संख्या दोनने वाढवण्यात आली आहे. त्यानुसार २५ डिसेंबरपासून वसईहून पूर्वीप्रमाणेच सकाळी महिला विशेष लोकल सुटणार आहे.विविध संघटना व पक्षांच्या मोर्चेबांधणीला यशमहिलांच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांची भेट घेत महिला लोकल ट्रेन रद्द करू नये म्हणून सर्वप्रथम निवेदन सादर केले होते. ही लोकल रद्द करू नये म्हणून सह्यांची मोहिमही हाती घेण्यात आली होती. रेल्वे प्रवासी अँड. मृदुला खेडेकर यांच्या शिष्टमंडळाने आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांची विरार येथे भेट घेत याबाबत रेल्वेच्या वरिष्ठांशी चर्चा करावी म्हणून विनंती केली होती.त्यानंतर आमदार क्षितिज ठाकूर यांनी त्वरित हालचाल करून अप्पर महासंचालक राहुल जैन यांना पत्र पाठवून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती. तसेच, शिवसेनेकडूनही विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. ‘मी वसई कर’ अभियानानेही सह्यांची मोहीम हाती घेत ही लोकल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते.रेल्वेने महिला स्पेशल लोकलसाठी केलेला सर्वे चुकीचा केला होता. वसई रोड व पुढील स्थानकावरून प्रवास करणाºया महिलांना ही वसई लोकल रद्द केली तर मोठा त्रासाला सामोरे जावे लागले होते.- अँड. मृदुला खेडेकर, महिला स्पेशललोकल प्रवासी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbai Localमुंबई लोकल