शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक पुढे जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:21 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव : डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता कमीच; नागरी प्रश्न आणि विकासकामांवर परिणाम

वसई : वसई-विरार शहरामध्ये मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता; मात्र आता पुन्हा बाधित रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शहराची चिंता वाढू लागली आहे. यामुळे वसई-विरार शहर महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक डिसेंबरपर्यंत न होता आणखी काही काळ म्हणजे एप्रिल-मेपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महापालिका प्रशासन सध्या केवळ कोरोनावरच लक्ष केंद्रित करत असून विकासकामांसह नागरी प्रश्नांवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे नागरिक तसेच राजकीय पक्षांत नाराजी आहे. त्यामुळे कधी एकदा प्रशासक कालावधी संपतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींमार्फत कारभार सुरू होत नाही, तोपर्यंत वसई-विरार पालिकेच्या कारभाराची सूत्रे आयुक्त तथा प्रशासक अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या गंगाथरन डी. यांच्याच हाती असणार आहेत.वसई-विरार महापालिकेची मुदत दि. २८ जून २०२० रोजी संपत असताना त्यास मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी सत्ताधारी वर्गाने मागणी केली होती, मात्र राज्य शासनाने ती फेटाळून लावत दोन महिने आधीच आयुक्त व प्रशासकाची नियुक्ती केली. शिवसेना नेते, नगरविकास मंत्र्यांनी बविआला ‘दे धक्का’ देण्यासाठी पालिकेचे आयुक्त म्हणून गंगाथरन डी. यांची नियुक्ती केली गेली आणि काही दिवसातच त्यांनाच प्रशासकही नेमले.दरम्यान, पालिकेच्या मुख्यालयात प्रारूप रचनांवर हरकती व सूचनांसंदर्भात सुनावणी घेण्यात आली. यात १७ पैकी एकच हरकत मान्य करत ती निवडणूक आयोगापुढे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.शहरात रुग्णसंख्या २२ हजारांच्या पुढे, ४४४ जणांचा मृत्यूवसई-विरार महापालिकेवरील प्रशासक-राज डिसेंबरमध्ये संपत असल्याने कदाचित जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२१ मध्ये महापालिकेची निवडणूक होण्याचे संकेत मिळत असले तरी पालिका हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ती पुढे ढकलली जाण्याचे संकेत मिळत आहेत.आतापर्यंत कोरोनाबधितांचा आकडा २२ हजारांच्या पुढे गेला आहे, तर ४४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा पादुर्भाव पाहता पुढील वर्षी जानेवारी महिन्यात निवडणुका होतील की नाही याबाबत साशंकता आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारीऐवजी आणखी चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे मत वसईतील राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार