शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

प्रकल्पग्रस्तांच्या मुलांची नावे होणार हजेरीपटावरून कमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 06:39 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल (एईसीएस)मध्ये शिक्षण घेत असलेल्या अक्करपट्टी व पोफरणच्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मुलांची फी ३१ मार्चपर्यंत न भरल्यास हजेरीपटावरून त्यांची नावे कमी करणार असल्याचे पत्र शाळेतून देण्यात आले आहे.

- पंकज राऊतबोईसर - तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल (एईसीएस)मध्ये शिक्षण घेत असलेल्या अक्करपट्टी व पोफरणच्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मुलांची फी ३१ मार्चपर्यंत न भरल्यास हजेरीपटावरून त्यांची नावे कमी करणार असल्याचे पत्र शाळेतून देण्यात आले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त ३१ मार्चला शाळेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याच्या विचारात आहेत. मात्र या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.तारापूर अणुऊर्जा प्रकल्प तीन व चारच्या उभारणीसाठी अक्करपट्टी व पोफरण या दोन गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेताना त्यावेळी अधिकाऱ्यांनी तुम्हाला अणुऊर्जा केंद्रात कायमस्वरूपी नोकरी तर तुमच्या मुलांना भविष्यात ॲटोमिक एनर्जी स्कूलमध्ये मोफत शिक्षण मिळेल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रकल्पग्रस्तांनी राहती घरे आणि सोन्यासारख्या शेतजमिनी दिल्या. मात्र ही दोन्ही आश्वासने पाळली न गेल्याने प्रकल्पग्रस्तांची घोर निराशा झाली आहे. एईसीएस शाळेमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या ठराविक मुलांनाच प्रवेश दिला जातो, तर कायमस्वरूपी नोकरी, मोफत शिक्षण सर्व सुविधा अशी अनेक आश्वासने देऊन आमची फसवणूकच अणुऊर्जा प्रशासनाने केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करीत आहेत. फीबद्दल प्रकल्पग्रस्त पालकांनी आवाज उठवून निवेदने दिली, बैठका घेतल्या, त्यावेळी लोकप्रतिनिधींसमोर प्रकल्प अधिकारी फीमाफीचे बोलतात, मात्र दुसरीकडे शाळेतर्फे जर तुम्ही फी भरली नाही तर मुलांची नावे काढून टाकण्यात येतील. ९ वी, १०वीच्या मुलांचे रजिस्ट्रेशन होणार नाही, अशा प्रकारच्या बाबी सांगून पालकांना जेरीस आणले जात असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. जऱ आपल्या मुला-मुलींना शाळेतून काढून टाकले तर मधील शाळेसमोर आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमधून व्यक्त होत आहे. देशाच्या विकासासाठी आम्ही आमच्या दोन्ही गावांचे बलिदान देऊन पारंपरिक व्यवसायावर नांगर फिरवला असताना आमचे योग्य पुनर्वसन केले नाही. कायमस्वरूपी नोकरीऐवजी कंत्राटी काम आणि बेरोजगारीचे जिणे प्रकल्पग्रस्त जगत आहेत. निदान आमच्या मुलांची फी ही विशेष बाब म्हणून भरावी अथवा माफ करू शकत नाही का? तसेच आमचे बलिदान कवडीमोल होते का? असा सवाल प्रकल्पग्रस्त विचारत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र