शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात नालासोपारा बुडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:12 IST

नागरिक धास्तावले : रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईस महापालिकेचा नकार

विरार : नालासोपाऱ्यात बेकायदा बांधकामांमुळे पाण्याचा निचरा होण्यास मार्गच न उरल्यामुळे गेल्या वर्षी नालासोपाºयामध्ये पावसाळ्यात पूरसदृश स्थिती उद्भवली होती. यात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई करण्यास महापालिकेने नकार दिल्यामुळे यंदाही नालासोपारा बुडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिक धास्तावले असून त्यांनी नालेसफाईचा आग्रह धरला आहे.

गेल्या वर्षी घरांमध्ये पाणी शिरल्याने नालासोपारावासीयांची दैना उडाली होती. तसेच आरोग्याच्याही समस्या उद्भवल्या होत्या. त्यामुळे यावर्षी शहरातील नालेसफाई योग्यरीत्या आणि वेळेवर व्हावी, यासाठी नागरिक सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.शहरातील राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाला पत्र देऊन निळेगाव येथील चार तलावांच्या स्वच्छतेकडे पालिकेचे लक्ष वेधले आहे. या तलावांतील सर्व पाणी सक्शन पंपाच्या साहाय्याने बाहेर काढून तलाव रिकामे केल्यास पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचून न राहता किंवा कोणाच्या घरात अथवा दुकानांमध्ये न शिरता पाण्याचा तलावांत निचरा होईल. यामुळे पूरस्थितीवर काहीसा निर्बंध येईल, असे नागरिकांनी पालिकेला सुचवले आहे. मात्र, हे तलाव रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यातील पाणी काढण्यास महापालिकेने स्पष्ट नकार दिला आहे. परिणामी, नालासोपारा शहर यंदाही पावसाच्या पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला असून यामुळे शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ५३ अंतर्गत येणाºया नालासोपारा रेल्वेस्थानक ते जिल्हा परिषद शाळा तसेच गावदेवी मंदिर ते आदिराज बिल्डिंग या परिसरात दरवर्षी पाणी तुंबते. त्याचा मोठा फटका निर्माणनगर, अपनानगर, स्नेहानगर, गावदेवी मंदिर व जिल्हा परिषद शाळा या भागांना बसतो. याकडे महापालिका दरवर्षी दुर्लक्ष करत असल्याचा येथील रहिवाशांचा आरोप आहे. याबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता या भागातील पावसाळापूर्वीची सर्व उपाययोजना केली असून गटारसफाई, व्हीप होल सफाई, क्रॉसिंग सफाई इत्यादी कामे पूर्ण केली आहेत. या परिसरात पावसाचे पाणी साचू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

पालिका प्रशासन खोटी माहिती देत आहे. आम्ही सुचवलेल्या कुठल्याही गटारांतील पालिकेने गाळ काढलेला नाही. शिवाय, रेल्वेच्या हद्दीतील तलावांमधील पाणी काढण्यासाठी रेल्वेकडून परवानगी मिळविण्याचे पालिकेने आम्हाला सांगितले आहे. आम्ही परवानगी मिळवून द्यायची, तर मग महापालिकेचा फायदा काय? असा सवाल भाजप युवा सरचिटणीस निलेश राणे यांनी केला. दरम्यान, याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना पालिका प्रशासनाची बाजू जाणण्यासाठी फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.सर्व नाले साफ करून घेऊ - महापौरच्पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. पालिकेतील अधिकारी काहीही बोलत असले, तरी संपूर्ण नालेसफाईसाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करण्यात येईल. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार