शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत - ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 03:37 IST

काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर प्रखर टीका : स्थानिक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

बोईसर : काँग्रेसने जाहिर केलेल्या जाहिरनाम्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी प्रखर टीका करून आपण कोणाच्या हातात देश देणार आहोत असा प्रश्न विचारून स्थानिक समस्या प्राधान्याने सोडविणयात येतील असे आश्वासन दिले त्यांनी मनोरपासून नागझरी, बोईसर मार्गे पाचमार्ग, चिंचणी डहाणू असा दौर करून ठिकठिकाणी जनतेशी संवाद साधला.

लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणूकी तील शिवसेना -भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांचा हा दौरा आयोजित केला होता या वेळी सेना भाजपाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रत्येक भागातील नागरिकांशी संवाद साधतांना त्यांनी तारापूर अणुउर्जा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त व बाधित कामगारांचा प्रश्न, पालघर जिल्ह्यात सुसज्ज हॉस्पिटल, चौपदरी रस्ता, दांडी-नवापूर पूल इत्यादी समस्या बरोबरच वाढवण बंदराबाबत शिवसेना जनतेसोबत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. या प्रचार दौऱ्यात हिंदूत्वासाठी युती करणे गरजेचे होते म्हणून युती केल्याचे सांगितले. तर वाढवण बंदराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी १९९८ साली वृत्तपत्रांत आलेल्या बातम्याची कात्रणे लोकांना दाखवून त्यावेळी नागरीकांनी विरोध केला म्हणून आम्ही हे बंदर रद्द केले. तसेच तेव्हापासून आताही स्थानिकांचा विरोध असेल तर वाढवण बंदर होऊ देणार नाही. असे ते म्हणाले.शिवसेना व भाजपाच्या दोघांच्या मनात भगवा आहे. २०१४ साली च्या निवडणूकीतही देश भगवामय झाला होता असे ठाकरे यांनी सांगून गाविताना भरघोस मतानी निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.जीवघेणा विकास नको!विकास हवा आहे परंतु असा जीवघेणा विकास नको आम्ही नाणार रिफायनरीला स्थानिकानी विरोध केल्यानंतर ती रद्द करण्यास आम्ही सरकारला भाग पाडले आहे असे उध्दव ठाकरे यांनी जनसमुहाला सांगत पुन्हा एकदा वाढवण बंदराबाबत विरोधाची भुमिका असल्याचे सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे