शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

मेढे पुलाचे काम केव्हा सुरू होणार; नारळ वाढवून झाले वर्ष, नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:46 IST

कुठे अडले घोडे?

पारोळ : तानसा नदीवरील मेढे पुलाच्या कामाचा नारळ गेल्यावर्षी वाढवला असतानाही अद्याप काम सुरू झालेले नाही. यंदा तरी कामाचा मुहूर्त लागेल का, हे पुलाचे काम केव्हा सुरू होणार, असे एक ना अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत.

मेढे ते मेढे फाटा दरम्यान तानसा नदीवरील या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. त्यामुळे पलीकडे असलेल्या आडणे, आंबोडे, मेढे, वडघर, कळभोन, लेंडी या गावांचा संपर्क तुटतो. दोन तीन दिवस या पुलावर पाणी असल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल होतात. मुलांना शाळेतही जाता येत नाही.

एवढेच नव्हे तर पूल पाण्याखाली गेल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेता न आल्याने अनेकांचे जीवही गेले आहेत. यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली. पण या पुलाची उंची वाढवण्याऐवजी येथे नवीन पूल मंजूर करण्यात आला. गेल्या सरकारमधील पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा नारळ वाढवण्यात आला. पण, काम सुरू झालेले नाही.

पूल पाण्याखाली जात असल्याने पावसाळ्यात आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतो. पण, येथे आता नवीन पूल होणार आणि आमची समस्या सुटणार असे वाटत असतानाच अजूनही कामाचा शुभारंभ होत नसल्याने पुलाच्या कामाबाबत शंका निर्माण झाली आहे.- प्रसाद पाटील, नागरीकतानसा नदीवरील नवीन पूल मंजूर झाला असून पुलाचा आराखडा तयार होत असल्याने कामाला उशीर होत आहे. पण पुढील महिन्यात पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यंदा पुलाचे खांब उभे करण्याचा प्रयत्न करू.- पी. चव्हाण, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र