शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

मेढे पुलाचे काम केव्हा सुरू होणार; नारळ वाढवून झाले वर्ष, नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:46 IST

कुठे अडले घोडे?

पारोळ : तानसा नदीवरील मेढे पुलाच्या कामाचा नारळ गेल्यावर्षी वाढवला असतानाही अद्याप काम सुरू झालेले नाही. यंदा तरी कामाचा मुहूर्त लागेल का, हे पुलाचे काम केव्हा सुरू होणार, असे एक ना अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत.

मेढे ते मेढे फाटा दरम्यान तानसा नदीवरील या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. त्यामुळे पलीकडे असलेल्या आडणे, आंबोडे, मेढे, वडघर, कळभोन, लेंडी या गावांचा संपर्क तुटतो. दोन तीन दिवस या पुलावर पाणी असल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल होतात. मुलांना शाळेतही जाता येत नाही.

एवढेच नव्हे तर पूल पाण्याखाली गेल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेता न आल्याने अनेकांचे जीवही गेले आहेत. यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली. पण या पुलाची उंची वाढवण्याऐवजी येथे नवीन पूल मंजूर करण्यात आला. गेल्या सरकारमधील पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा नारळ वाढवण्यात आला. पण, काम सुरू झालेले नाही.

पूल पाण्याखाली जात असल्याने पावसाळ्यात आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतो. पण, येथे आता नवीन पूल होणार आणि आमची समस्या सुटणार असे वाटत असतानाच अजूनही कामाचा शुभारंभ होत नसल्याने पुलाच्या कामाबाबत शंका निर्माण झाली आहे.- प्रसाद पाटील, नागरीकतानसा नदीवरील नवीन पूल मंजूर झाला असून पुलाचा आराखडा तयार होत असल्याने कामाला उशीर होत आहे. पण पुढील महिन्यात पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यंदा पुलाचे खांब उभे करण्याचा प्रयत्न करू.- पी. चव्हाण, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र