शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

आता खायचे तरी काय? पालघरकरांचा सवाल

By admin | Updated: November 12, 2016 06:21 IST

केंद्र सरकारने चलनातून ५०० आणि १००० नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांना बसत असून आज नोटा बदलण्यास कालच्या

हितेन नाईक, पालघरकेंद्र सरकारने चलनातून ५०० आणि १००० नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांना बसत असून आज नोटा बदलण्यास कालच्या पेक्षा मोठमोठ्या रांगा बँका,पोस्ट कार्यालया समोर लागल्या होत्या. शुक्रवारी एटीएम बंद तर पोस्ट कार्यालयात दुपारीच पैसे संपल्याचे जाहीर केल्या नंतर आम्ही घरात अन्न शिजवायचे कसे?असा प्रश्न विचारीत या महिलां डोळ्यात पाणी आणून आपला राग मोदी सरकार विरोधात व्यक्त करीत होत्या.५०० आणि १०००च्या नोटा अचानक रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक निर्णय असल्याचे सोशल मीडिया वरून फिरत असले तरी या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचे दिसून येत असल्याने हा तर चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्या सारखे असल्याच्या भावनाही व्यक्त होत आहेत. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल भाग असल्याने रोजंदारीवर काम करून मिळालेल्या पैशातून आपली रोजचा दिवस पुढे कसा ढकलायचा या विवंचनेत असलेल्या सर्वसामान्या पुढे मात्र मोदी सरकारने अनेक यक्षप्रश्न निर्माण करून ठेवले आहेत.तर दुसरीकडे बिल्डर,जमीन खरेदीदार,मोठमोठे कारखानदार इ. ना या नोटा बंद करण्यात येणार असल्याची आधीच भनक लागली असावी का?अशा अविर्भावात आजही लाखो रुपयांच्या रक्कमा काही लोक स्वीकारीत असल्याचे दिसून आले आहे.कालच्या पेक्षा दुप्पट रांगा आजही बँका समोर लागल्याचे दिसून येत होत्या. पालघर पोस्ट कार्यालया समोरही काळ पासून ग्राहक,एजंट आणि सर्वसामान्यांनी मोठी गर्दी केली होती. नोटा बदलणे आणि सेविंग्स बँक गुंतवणूक योजना पोस्टा कडून राबविल्या जात होत्या. काल पोस्टा कडून पाचशेच्या ४८७ नोटा (२ लाख ४३ हजार ५०० रुपये) आणि एक हजाराच्या १४४ नोटा (१ लाख ४४ हजार) अश्या एकूण ३ लाख ८७ हजार ५०० रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. तर पोस्टाच्या खातेदाराकडून ३ लाख ६२ हजार ७०० तर एजंट लोका कडून एकूण १३ लाख १२ हजाराची गुंतवणूक करण्यात आल्याचे पोस्ट कार्यालया कडून सांगण्यात आले. रद्द केलेल्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी २० लाखाची रक्कम आज दुपारी १ वाजताच संपल्याने रांगेतल्या उरलेल्या लोकांनी संताप व्यक्त केला.दिवस रात्र मोलमजुरी करून जमवलेल्या पैशाचा वापर अन्न, औषधे व इतर गरजा साठी वापरता येत नसेल तर या ऐतिहासिक म्हणवल्या जाणाऱ्या निर्णयाचा काय फायदा?असा संतप्त सवाल एका महिलेने व्यक्त करीत घरातील सिलेंडर संपल्याने माझ्या लाहन मुलांना मी काय शिजवून घालू, असा सवाल उपस्थित केला.शेवटी हेड पोस्ट मास्तर वाय डी रावते यांनी उपस्थितांच्या आग्रहाखातर पैसे बदलण्याचे सर्व फॉर्म आज स्वीकारून उद्या पैसे आल्यास तात्काळ देण्याची प्रक्रिया राबवली जाईल असे सांगितले.असे असले तरी आदिवासी बहुल भागातील अनेक झोपडी,घरातील चुली मात्र आज विझलेल्याच असतील असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)