शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

वसईत वीकेंड लाॅकडाऊनची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:30 PM

नागरिकांची ओसरली गर्दी : निर्बंधांबरोबरच उन्हाच्या प्रभावाने रस्ते सामसूम

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : मागील आठवड्यात घेतलेल्या 'वीकेंड' लॉकडाऊनसारखेच चित्र शनिवारीही वसई-विरारमधील रस्त्यांवर होते; मात्र या शांततेसाठी निर्बंधांपेक्षा उन्हाचा 'प्रभाव' कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच वसई-विरार शहरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मात्र, मागील आठवड्यापासून उन्हाची काहिली थोडी जास्तच वाढली आहे. परिणामी वसई-विरारवासीय सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर पडणे टाळत आहेत.

एकीकडे सरकारने १४ एप्रिलपासून कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन संचारबंदीसारखे कडक निर्बंध लादले आहेत, तर मागील आठवड्यात 'वीकेंड लॉकडाऊन' घेतला होता. सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वसई-विरारकरांनी 'वीकेंड लॉकडाऊन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर सोमवारी मात्र वसई-विरार शहरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातच कोरोना रुग्ण वाढल्याने १४ एप्रिलपासून पुन्हा १५ दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे; मात्र सरकारचा हा निर्णय जनतेच्या पचनी पडलेला नसल्याने या आदेशानंतरही वसई-विरारमध्ये नियमांची पायमल्ली होताना दिसली. या दिवसांच्या तुलनेत शनिवारी मात्र मागील 'वीकेंड'सारखेच चित्र होते. मात्र, या शांततेसाठी 'निर्बंधां'पेक्षा उन्हाचा 'प्रभाव' कारणीभूत मानला जात आहे. 

वसई-विरार पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्वेला मोठ्या प्रमाणात दाटीवाटीचा परिसर आहे. संपूर्ण दिवसभरातील गर्मी, सततचा खंडित वीजपुरवठा आणि वाढत्या गर्मीसोबतच वाढणारी पाणीटंचाई, त्यात लागलेली संचारबंदी यामुळे आलेला उबग झटकण्यासाठी वसई-विरार-नालासोपारा परिसरातील नागरिक संध्याकाळी मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडताना दिसतात. विशेष म्हणजे मागील वर्षीदेखील मार्च-एप्रिल व मे महिन्यात शहरात असेच चित्र आणि परिस्थिती होती.

लोकांचे समुपदेशन होणे गरजेचे nबऱ्याच वेळा कोवीड-१९ चा रुग्ण स्वॅब दिल्यानंतर रिपोर्ट यायचा आहे म्हणून गावभर फिरत असतो. त्याच्यापासून अनेकांना लागण होत असते. ज्यांना कोविडची लक्षणे आहेत, अशा लोकांनी विलगीकरणात राहणे गरजेचे आहे. तर, एकाच कुटुंबात सर्व सदस्य बाधित निघाल्यावर त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एकतरी सदस्य बाहेर पडतो. अशा वेळी गृह विलगीकरणात असलेली व्यक्ती बाहेर फिरू नये यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे हाच सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. nही साखळी तोडण्याची जबाबदारी असलेली आरोग्य यंत्रणा कार्यालयातून बाहेर पडताना दिसत नाही. कोरोना रुग्णांच्या घरापर्यंत फक्त आशा वर्कर जाऊन माहिती भरत आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग तर होतानाच दिसत नाही. प्रत्येक कोरोना रुग्णांची हिस्ट्री तयार होऊन कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या मनात कोरोनाबाबत प्रचंड भीती असून लोकांनी कोरोना चाचणीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. यासाठी लोकांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस