शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वावर, वांगणीतील रस्ते ७० टक्के पूर्ण

By admin | Updated: April 9, 2017 01:04 IST

१९९२ पासून गाजत असलेल्या व गुजरात व दादरा नगर हवेली यांच्या सीमेवर असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते आता चका चका होण्याच्या मार्गावर

- हुसेन मेमन,  जव्हार१९९२ पासून गाजत असलेल्या व गुजरात व दादरा नगर हवेली यांच्या सीमेवर असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते आता चका चका होण्याच्या मार्गावर असून नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.दऱ्या खोऱ्यात असलेल्या वावर-वांगणी या गावातील कुपोषणामुळेच जव्हार येथे अप्पर जिल्हाधिाकरी कार्यालयाची स्थापना तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केली होती, परंतु त्यानंतर या गावात काहीच झाले नाही. मात्र आता या परिसरातील रस्त्यांची ७० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याने रहिवाशांना चकाचक रस्ते वापरायला मिळणार आहेत. दर वर्षी पावसाळ्यात या गावांना जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नव्हता तसेच या परिसरात पाऊस प्रचंड पडत असल्याने हे मार्ग नेहमीच पुराच्या पाण्याखाली जात असतात. त्यामुळे पूर असतांना संपर्क तुटलेला आणि तो ओसरल्यावर मार्ग चिखलाने भरलेला अशी अवस्था असायची परंतु आता या रस्त्यांमुळे पूर ओसरताच रस्ते वापरायला मिळणार आहेत. तसेच बससेवा सुरू होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा भाग म्हणजे वावर वांगणी ग्रामपंचायत या ग्रामपंचायत हद्दीत १२ पाडे २ महसूल गावे असे १४ गाव-पाडे असून या त््यांची एकूण लोकसंख्या ३ हजार २०० आहे. हा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असल्याने या भागात गेल्या अनेक वषार्पासून रस्ते कच्चे आणि खड्डेमय होते. त्यामुळे काळी पिवळी सुद्धा या परिसरात येत नव्हती. दुचाकी अथवा अन्य वाहन वापरणेही अशक्य होते. परिवहनाची नेहमीच गैरसोय, त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य कर्मचारी अशा सगळ्यांचेच दुर्लक्ष अशा अनेक समस्यांनी हा परिसर ग्रस्त होता. त्याला आता विकासाची नवी पहाट दिसू लागणार आहे. तेरा कोटी खर्च, विकास होणार गतिमान- या भागात रस्त्याची सोय व्हावी म्हणून लोकमतने सातत्याने आवाज उठविला होता. त्यामुळे वावर वांगणी भागातील रस्त्याचे काम जलद गतीने चालू झाले आहे. वावर वांगणी भागात जाण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत १३ कोटी रुपये खर्च करून गेल्या दोन वषार्पासून सुरु असलेले रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून ते पावसाळ्यापूर्वी संपण्याची शक्यता आहे. या रस्त्याचे काम यावर्षी शंभर टक्के पूर्ण होणार आहे. त्यामुळे या भागातील परिवहनाची समस्या मार्गी लागणार आहे.