शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वावर, वांगणीतील रस्ते ७० टक्के पूर्ण

By admin | Updated: April 9, 2017 01:04 IST

१९९२ पासून गाजत असलेल्या व गुजरात व दादरा नगर हवेली यांच्या सीमेवर असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते आता चका चका होण्याच्या मार्गावर

- हुसेन मेमन,  जव्हार१९९२ पासून गाजत असलेल्या व गुजरात व दादरा नगर हवेली यांच्या सीमेवर असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते आता चका चका होण्याच्या मार्गावर असून नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.दऱ्या खोऱ्यात असलेल्या वावर-वांगणी या गावातील कुपोषणामुळेच जव्हार येथे अप्पर जिल्हाधिाकरी कार्यालयाची स्थापना तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केली होती, परंतु त्यानंतर या गावात काहीच झाले नाही. मात्र आता या परिसरातील रस्त्यांची ७० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याने रहिवाशांना चकाचक रस्ते वापरायला मिळणार आहेत. दर वर्षी पावसाळ्यात या गावांना जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नव्हता तसेच या परिसरात पाऊस प्रचंड पडत असल्याने हे मार्ग नेहमीच पुराच्या पाण्याखाली जात असतात. त्यामुळे पूर असतांना संपर्क तुटलेला आणि तो ओसरल्यावर मार्ग चिखलाने भरलेला अशी अवस्था असायची परंतु आता या रस्त्यांमुळे पूर ओसरताच रस्ते वापरायला मिळणार आहेत. तसेच बससेवा सुरू होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा भाग म्हणजे वावर वांगणी ग्रामपंचायत या ग्रामपंचायत हद्दीत १२ पाडे २ महसूल गावे असे १४ गाव-पाडे असून या त््यांची एकूण लोकसंख्या ३ हजार २०० आहे. हा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असल्याने या भागात गेल्या अनेक वषार्पासून रस्ते कच्चे आणि खड्डेमय होते. त्यामुळे काळी पिवळी सुद्धा या परिसरात येत नव्हती. दुचाकी अथवा अन्य वाहन वापरणेही अशक्य होते. परिवहनाची नेहमीच गैरसोय, त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य कर्मचारी अशा सगळ्यांचेच दुर्लक्ष अशा अनेक समस्यांनी हा परिसर ग्रस्त होता. त्याला आता विकासाची नवी पहाट दिसू लागणार आहे. तेरा कोटी खर्च, विकास होणार गतिमान- या भागात रस्त्याची सोय व्हावी म्हणून लोकमतने सातत्याने आवाज उठविला होता. त्यामुळे वावर वांगणी भागातील रस्त्याचे काम जलद गतीने चालू झाले आहे. वावर वांगणी भागात जाण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत १३ कोटी रुपये खर्च करून गेल्या दोन वषार्पासून सुरु असलेले रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून ते पावसाळ्यापूर्वी संपण्याची शक्यता आहे. या रस्त्याचे काम यावर्षी शंभर टक्के पूर्ण होणार आहे. त्यामुळे या भागातील परिवहनाची समस्या मार्गी लागणार आहे.