शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

‘सूर्या’चे पाणीवाटप राज्यपाल नियुक्त समितीव्दारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:42 IST

रवींद्र फाटक यांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांचा खुलासा; पालघर जिल्हावासीयांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

पालघर : या जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या व अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या सूर्या धरणातील पाण्याचे वाटप हे महाराष्टÑाच्या राज्यपालांनी नियुक्त केलेल्या समिती व्दारेच होईल, असा खुलासा आमदार रवींद्र फाटक यांनी विधान परिषदेत मांडलेल्या लक्षवेधीचे उत्तर देतांना करून जलसंपदामंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला दिलासा दिला आहे.या जिल्ह्यातील पेयजलाची आणि सिंचनाची गरज भागविण्यासाठी सूर्या नदीवर धरण बांधण्यात आले. परंतु धरणातील पाणी सिंचन क्षेत्रापर्यंत पोहचविणाºया सुविधा नसल्याने ते पडून राहीले. तसेच ज्या क्षेत्रासाठी या धरणातील पिण्याचे पाणी आरक्षित होते. ते देखील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणाºया यंत्रणा नव्हत्या. त्यामुळे ते पाणीदेखील पडून होते. प्रभावशाली राजकारण्यांनी हे पाणी हळूहळू वळविण्यास आणि पळविण्यास प्रारंभ केला. त्यातूनच ते वसई, विरार, मीरा, भार्इंदर, नालासोपारा या नागरिकरण झालेल्या परिसराला पुरविण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याविरुद्ध सूर्या पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. तीव्र आंदोलन करण्यात आले. बंदही पाळण्यात आले. त्यामुळे सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. यामुळे ज्या आदिवासी परिसरातील सिंचन वाढविण्यासाठी व आदिवासी क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी हे धरण बांधले. इथल्या भूमिपुत्रांनी त्याग केला. त्यांना व त्यांच्याच शेती ला तृषार्त ठेवून हे पाणी अन्यत्र नेले जाणार असल्याने संघर्ष पेटला होता. त्यामुळे ही लक्षवेधी फाटक यांनी दाखल केली होती. या धरणातील बिगर सिंचन पाणी आरक्षणामुळे पालघर जिल्ह्यातील या धरणाच्या कक्षेत असलेल्या सिंचनासाठीच्या क्षेत्रात कपात केली गेली आहे. त्यामुळे शेतकरीही संतप्त होते. १८ सप्टेंबर २०१७ ला या विरोधात पाळल्या गेलेल्या बंदची पार्श्वभूमीही या लक्षवेधीला होती. यावर जलसंपदामंत्र्यांनी असे सांगितले की, सूर्या प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात कमीत कमी कपात घडविण्यासाठी वितरणप्रणाली सुधारण्यासह बंदिस्त नलिकेद्वारे जलवितरण, ठिंबक सिंचन, पर्यायी जलस्त्रोत निर्माण करणे याबाबत ५ /५/२०१८ रोजी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीमध्ये आदिवासी विकास, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास विभागाचे सचिव सदस्य असलेली समिती स्थापन करण्यात आली व कोकण विकास प्रदेशचे मुख्य अभियंता यांना तिचे समन्वयक नेमण्यात आले असून तिने सखोल अभ्यास करून सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे याबाबत शिफारशी द्याव्यात व सिंचन क्षेत्रात कपात होऊ न देता सूर्या धरणातील पाण्याचे आरक्षण करणे, पेयजलाचे आरक्षण करणे, याबाबतच्या उपाययोजना करायच्या आहेत.त्यानुसारच सूर्याच्या जलआरक्षण आणि पाणीवाटपाबाबतचे निर्णय घेतले जातील. या निसंदिग्ध आश्वासनामुळे सूर्या धरणातील मनमानी पाणी वाटपाला तसेच आरक्षणाला पायबंद बसणार असून पालघरवासीयांवर होऊ घातलेला अन्याय दूर होईल.सूर्या धरणातील पाणी वाटपाचा प्रश्न हा जिल्हावासीयांसाठी अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा होता. ज्यांनी या धरणासाठी आपल्या पिढीजात जमिनी दिल्या त्यांनाच पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण होणार होती.हे घडू नये अशी लोकप्रतिनिधी म्हणून आणि जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून माझी भूमिका होती. त्यामुळे मी ही लक्षवेधी दाखल केली होती. तिच्यामुळे पालघरवासीयांना विशेषत: आदिवासींना न्याय मिळाला आहे. - आमदार रवींद्र फाटक

टॅग्स :Damधरणpalgharपालघर