शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

सांडपाण्याने जलस्त्रोत प्रदूषित;  तारापूरकर पितात विकतचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 08:10 IST

एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात

- पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) १९७०च्या दशकात तारापूर येथे औद्योगिक क्षेत्र उभे करण्यापूर्वी परिसरातील १३ गावांतील ग्रामस्थ हे विहिरी, कुपनलिकेच्या नैसर्गिक पाण्यावर तहान भागवत होते. परंतु, त्यानंतर उभारलेल्या एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतून प्रक्रियेविनाच अनधिकृतपणे नाल्यात सोडण्यात येणाऱ्या रासायनिक प्रदूषित सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणीही प्रदूषित झाले. परिणामी, या गावांना आता एमआयडीसीच्या विकतच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. 

एमआयडीसी परिसरातील सालवड, पास्थळ, सरावली, कोलवडे, पाम, टेंभी, कुंभवली, खैरापाडा आदी ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ  भूगर्भातील नैसर्गिक व शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरत होते. १९७० नंतर  एमआयडीसी परिसरातील गावांमधील नैसर्गिक पाणी प्रदूषित सांडपाण्यामुळे प्रदूषित झाले. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे पालघर जिल्हा परिषदेद्वारे २०२१ मध्ये केलेल्या परीक्षणात समोर आले. नंतर तारापूर व परिसरातील १३ ग्रामपंचायतींतर्गत १६ गावांमधील ८६ सार्वजनिक व ५३५ खासगी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाणी दूषित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे रसायनमिश्रित पाणी पिण्यास अयोग्य असल्याने या स्रोतांवर जिल्हा परिषदेने बंदी घातली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नाले-गटारात सोडत आहेत. त्यामुळे एमआयडीसीकडून विकत पाणी घेऊन नागरिकांना तहान भागवत आहेत.  

यांच्यामुळे पाणी केमिकलयुक्तमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी यांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना अमलात आणल्या नाहीत. तसेच राजरोसपणे केमिकल साेडणाऱ्यांविरोधातही ठोस भूमिका न घेतल्याने एमआयडीसी परिसरातील भूगर्भातील पाणी केमिकलयुक्त झाल्याचे आरोप केले जात आहेत.

‘सूर्या’चे पाणी उचलून केले जाते शुद्धीकरण  एमआयडीसी सूर्या नदीचे पाणी उचलून ते गुंदले येथील शुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून प्रतिदिन ३५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा तारापूर येथील १,२०० उद्योग,  ग्रामपंचायतींना पुरवठा करते. परंतु, प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील वाढत्या लोकवस्तीमुळे ग्रामपंचायती आपल्या क्षेत्रात पाणी पुरवठा करताना कसरत करतात. 

पाणीटंचाईबाबत सरपंच काय म्हणतात?वाढती लोकसंख्या व उपलब्ध पाण्याचा विचार करता ग्रामस्थांना पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागत आहे. आमच्या गावच्या भूगर्भातील पाणी जोपर्यंत रसायनमुक्त होत नाही तोपर्यंत आम्हाला एमआयडीसीने पुरेसे पाणी द्यावे, तसेच केमिकलयुक्त पाण्यामुळे शेतजमिनी नापीक झाल्याने शेतकऱ्यांनाही भरपाई द्यावी. संजय पाटील, सरपंच, सालवड ग्रामपंचायत 

सरावली ग्रामपंचायतीने मागणी केलेल्या अतिरिक्त पाणीपुरवठा लाइन लवकर मंजूर कराव्यात. रासायनिक पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित झाले, त्याचे नाहक परिणाम आम्हाला सहन करावे लागत असून, आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. आनंद धोडी, सरपंच, सरावली ग्रामपंचायत

पास्थळ गावात कूपनलिकेचे पाणी पेट्रोलसारखे रंगीत येते, त्यामुळे ते पिण्यायोग्य राहिले नसल्याने १०० टक्के एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. आम्हाला एमआयडीसीकडून २४ तास पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे, तसेच आमच्या ग्रामपंचायतीची थकबाकी रद्द करावी.अनंत सोमण, सरपंच, पास्थळ ग्रामपंचायत

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण