शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात नियोजनाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 08:29 IST

जिल्ह्यात सूर्या, वैतरणा, तानसा या बारमाही वाहणाऱ्या नद्या, पाणी साठवणारे धामणी, कवडास, वांद्री प्रकल्प धरणे तसेच ६ लघु पाटबंधाऱ्यात ओव्हरफ्लो होतील इतका पाणीसाठा असतो.

- हितेन नाईकपालघर समन्वयकपालघर जिल्ह्यात नद्या, धरणे आणि लघुपाटबंधारे योजनेतून मोठा पाणीसाठा उपलब्ध असतानाही गेल्या ४० वर्षांपासून मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाड्यासह जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांतील गावपाड्यांत पाणीटंचाईची भीषण दाहकता आहे. पाण्याचे शाश्वत स्रोत उपलब्ध असतानाही पाणीपुरवठ्याच्या नियोजनाच्या अभावामुळे एक भांडे पाण्यासाठीही महिलांना तळ गाठलेल्या विहिरीत धोका पत्करून उतरावे लागते, असे भीषण चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात सूर्या, वैतरणा, तानसा या बारमाही वाहणाऱ्या नद्या, पाणी साठवणारे धामणी, कवडास, वांद्री प्रकल्प धरणे तसेच ६ लघु पाटबंधाऱ्यात ओव्हरफ्लो होतील इतका पाणीसाठा असतो. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २,३६७ मिलिमीटर इतका पाऊस होतो, तरीही मार्च सुरू होताच इथल्या महिला पाण्यासाठी खाचखळग्याची वाट तुडवत, डोक्यावर हंडा घेऊन आजही वणवण फिरत असतील तर त्यांच्या एक एक पाण्याच्या थेंबाची व्यथा सरकारला कळत कशी नाही? हा खरा प्रश्न आहे.

योग्य नियोजनाच्या अभावाने ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. स्थानिकांच्या नजरेसमोर इथले पाणी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई- विरार येथे मोठ्या पाइपलाइनद्वारे नेले जाते. मात्र उपलब्ध असणाऱ्या धरण आणि लघुपाटबंधारे योजनेच्या जवळच्या गावांतील लोकांना पाइपलाइनद्वारे घराघरांत पाणी देणे का शक्य होत नाही? हा प्रश्न अनुत्तरितच आहे; परंतु सहजसोपा मार्ग अवलंबण्याऐवजी जलजीवन मिशनच्या ‘हर घर नल से जल’द्वारे कोट्यवधींचा निधी खर्च करूनही मागील चार-पाच वर्षांपासून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण व्हायला अजून दोन वर्षे स्थानिकांना ताटकळत राहावे लागणार. याची जबाबदारी निश्चित केली जात नाही. 

संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने ही योजना आरोप-प्रत्यारोप करत कासवाला लाजवेल इतक्या धीम्या गतीने सुरू आहे.  सूर्या नदीतून डहाणू तालुक्यातून वेती येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला असून, ते पाणी मीरा-भाईंदर, वसई-विरार येथे नेले जात असताना त्याच योजनेतून डहाणू तालुक्यातील ४ गावे आणि पालघर तालुक्यातील ११ गावे अशा १५ गावांना पाणी देणे सहज शक्य असल्याचे कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी सांगितले. मात्र, तेथील स्थानिकांच्या डोळ्यादेखत त्यांचे पाणी इतरत्र वळवताना त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अंतर्गत डहाणू तालुक्यातील १७४ गावांसाठी १२ योजना, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ६० गावांसाठी ९ योजना कार्यान्वित करण्यात केली तरी या जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ झाल्याने महिलांना आजही भरदुपारी पाण्यासाठी डोंगरमाथ्यावर वणवण फिरावे लागते. एमएमआरडीएच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा व्हावा अशा १५ गावांतील लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती स्थानिकांची आहे. स्थानिकांच्या घशाला पडलेली ही कोरड दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी एकत्र येत नसल्याची खंत मात्र नागरिक बोलून दाखवतात. 

जिल्ह्यामध्ये एकूण ८ तालुक्यांत ४७३ ग्रामपंचायती आणि ८९९ गावे आहेत, तसेच ४,७१० वाड्या असून एकूण लोकसंख्या १७,४९,२१० इतकी आहे. एकूण ग्रामीण कुटुंबांची संख्या ४,५२,०४३ इतकी आहे. ३,०७,९९५ कुटुंबांना नळजोडणी पुरवली आहे. जिल्ह्यातील एकूण ८९९ गावांपैकी ६१४ गावांना ५६२ योजनांद्वारे जिल्हा परिषद पालघरअंतर्गत तर २६ योजनांद्वारे २८२ गावे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत जलजीवन मिशन योजनेतून पाणी देण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Waterपाणी