शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

जव्हारमध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, बळीराजा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 00:05 IST

जून महिना संपायला आला तरीही पावसाचा लपंडाव सुुरु असल्याने तालुक्यातील शेतकरी हताश

जव्हार : जून महिना संपायला आला तरीही पावसाचा लपंडाव सुुरु असल्याने तालुक्यातील शेतकरी हताश झाले असून, मंगळवारी जव्हारमध्ये कडक उन्ह पडल्याने पाऊस कधी येईल यासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.दोन दिवसापूर्वी पावसाचे ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचे चिन्ह दिसत होते. त्यातच सोमवारचा पाऊस काही भागात पालघर, वाडा, मोखाडा, विक्र मगड या भागात पाऊस झाला. मात्र जव्हारला पाऊस झालाच नाही. गडगडात व ढगाळ वातावरणामुळे पाऊस येऊन सर्वांना दिलासा मिळणार, असे चित्र दिसत होते. मात्र मंगळवारी तर कडक उन्ह पडले होते. त्यामुळे पाऊस कधी सुरु होईल, याची सर्वच नागरिक आतुरतेने वाट पहात आहेत.या आठवड्यात पाऊस येईल म्हणून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली असून, जमेल तशी करवड करून ट्रॅक्टरने नांगरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मंगळवारी कडक उन्ह पडल्याने सर्वच नागरिक, शेतकरी चिंतेत आले असून, नागली, भात, वरई ही केलेली पेरणी करपून वाया जाते की काय? दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही अशीही शेतकऱ्यांना चिंता वाटायला लागली आहे. या बाबत हवामान खात्याकडून होणाºया पावसाच्या घोषणा सध्या गमतीचा विषय बनला असून शेती व शेतकºयांसाठी हा काळ परीक्षेचा ठरणार आहे.टंचाईचे चटके तीव्र तालुक्यातील महिला पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. दुचाकी, जीप, ट्रॅक्स आदी वाहनातुन ते पाणी आणत आहेत. त्यातच या ग्रामीण भागातील गाय, बैल, शेळी, म्हैस, या प्राण्यांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईVasai Virarवसई विरार