शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

किनाऱ्यावरील डांबरगोळ्यांमुळे जलप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:12 PM

मत्स्य उत्पादनावर परिणाम : किनाऱ्यांचीही मोठी धूप, तिवरांची जंगले नष्ट होण्याची भीती

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : प्रदूषणाच्या विळख्याने जिल्हा होरपळू लागला असताना वायू प्रदूषणाने स्थानिकांचे आयुष्यमान घटू लागले आहे. त्यातच आता समुद्रातून मोठ्या प्रमाणात किनाºयावर आलेल्या तेल-तवंगामुळे (डांबरगोळे) जल प्रदूषण वाढत असून मत्स्य संपदेसह किनाºयावरील तिवरांची (कांदळवन) जंगले नष्ट करायला सुरुवात केली आहे.

प्रदूषणात जिल्ह्याने एक नंबर गाठल्यानंतर इथले नदी, नाले, खाडी, खाजणे, शेती-बागायती तारापूर एमआयडीसीमधून सोडल्या जाणाºया प्रदूषित पाण्याने नापीक बनल्या आहेत. त्यातच हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार किनारपट्टीवरील अनेक गावांत कॅन्सर, त्वचेचे आजार व श्वसनाच्या आजाराची मोठी संख्या असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे माणसाचे सरासरी आयुष्यमान घटत असताना उपाययोजनेबाबत शासन व प्रशासन संवेदनशील नसल्याचे दिसून आले आहे. तारापूर एमआयडीसी, पालघर बिडको, पिडको औद्योगिक वसाहतीमधूनही निघणाºया प्रदूषणाविरोधात इथले स्थानिक लढत असताना आता समुद्री मार्गाने येणाºया तेल-तवंगांची मात्रा वाढू लागली आहे. पावसाळ्यात काही कालावधीत किनाºयावर दिसणारे डांबरगोळे आता वर्षभर दिसून किनारे विद्रूप करू लागले आहेत. शिरगावच्या किनारपट्टीवर उत्तरेस विस्तारलेल्या तिवरांचे (कांदळवने) क्षेत्र प्लास्टिक कचरा व डांबर गोळ्याच्या आक्रमणाने धोक्यात सापडले आहे. समुद्राच्या पाण्याद्वारे वाहून आलेले क्रूड आॅइल तिवरांच्या पानांवर साचून राहिल्याने ती पाने करपून जात संपूर्ण झाडे सुकून गेली आहेत. त्याचबरोबर या करपून खाली गळलेल्या पानांचा कचरा आणि तेलाच्या डांबरगोळ्यांपासून बनलेले टार बॉल्स किनाºयावर मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. या भागातील सुमारे अडीच एकर क्षेत्रावरील तिवरांची झाडे नष्ट होत असल्याचे धक्कादायक वास्तव पर्यावरणप्रेमी प्राध्यापक भूषण भोईर यांनी समोर आणले आहे. ही तिवरांची जंगले हळूहळू नष्ट झाल्यास मत्स्यप्रजनन आणि माश्यांच्या अधिवासांची मोठी गंभीर समस्या निर्माण होत त्याचा परिणाम मत्स्य संपदेवर झाला आहे.

ज्या ठिकाणी ही कांदळवने मेलेली आहेत, बरोबर त्याच्यासमोरील बाजूस समुद्रकिनाºयाची धूप सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर कांदळवने नष्ट झाल्यास त्याचा विपरीत परिणाम ऊसबाव आणि वडराई येथील किनारपट्टीवर होऊ शकतो.- प्रा. भूषण विलास भोईर,प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर.