शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:44 IST

जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत.

- पंकज राऊतबोईसर  - जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत.एप्रिल व मे महिन्यात शेतकरी मान्सूनपूर्व शेतीकामात व्यस्त होता दोन महिन्यात त्याने भातबी पेरणी नंतर भात बियांना पोषक अशी भुसभुशीत शेतजमीन मिळावी म्हणून शेतात राब पेटवून पेरणीपूर्वी व पेरणी नंतर लागणार्या सर्व साधन सामग्रीची जमवा जमव केली. त्यानंतर शेतकरी पावसाची वाट बघत आहे पालघर तालुक्यात चार महिन्यामध्ये साधारणपणे अडीच ते तीन हजार मि मी सरासरी पाऊस पडतो परंतु कधी वारेमाप, कधी टप्याटप्याने तर कधी दीर्घ विश्रांती घेऊन तो पडत असल्याने भातशेती म्हणजे आतबट्याचा व्यवहार होत आहे. त्यामुळे भात शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे.२०१६ साली बोईसर मंडळ क्षेत्रात २१ जूनला पावसाचे आगमन झाले होते त्या दिवशी १३ मि. मी . पाऊस झाला होता एवढा पाऊस उशिरा सुरू झाला त्या नंतर २४ जून पाऊस सुरू झाला होता संतत धार सुरूच राहून ६ जुलै पर्यंत १००० मि .मी. पाऊस झाला एकदम पाऊस कोसळलाल्या मुळे पेरण्या ही जुलै पर्यंत खोळंबून राहिल्या होत्या तर मागील वर्षी मागील वर्षी १० जूनपर्यंत बोईसर मंडळ क्षेत्रात ४०६.२ मि.मी. पाऊसाची नोंद झाली होती परंतु आज पर्यंत बोईसरला निरंक (0 मी. मि.) पाऊस म्हणजे सुरूच झाला नसल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.पावसाअभावी शेतीची कामे रेंगाळलीविक्रमगड : जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी या तालुक्यात पावसाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे शेतातील नागरणीची कामे झाली असली तरी पाऊस असता तर पेरणी करता आली असती असे मत शेतकरी रणधीर पाटील यांनी व्यक्त केले जसा पाऊस लाबणीवर जाईल तशी पेरणी व इतर शेतीची कामे लाबणीवर जाणार आहे तालुक्यात ८८५६ हेक्टर वर भात शेती केली जाते.यात मोठ्या प्रमाणात सुधारित बियाणांचा वापर शेतकरी करीत आहेत. त्यामध्ये सुवर्ण, राशी पूनम, महाबीज, जया, सुरती कोलम, गुजरात ११, इ भात बियाण्याची लागवड करतात , परंतु पावसाअभावी पेरणी लांबणीवर जाणार आहे. तालुक्यात पावसाळी पाण्यावर करण्यात येण्याऱ्या भातशेतीचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकरी पावसाची वाट पाहत आहे . दरवर्षी पाऊस शेतकºयांना चकवा देतो. यंदा ही त्याने चकवा दिला आहे.वेधशाळेचा अंदाज हि त्याने फोल ठरविला आहे. मागील वर्षी पावसाने हजेरी जूनच्या पहिल्याच आठवडयात लावली होती. त्यामुळे पेरणी सुरू होती. यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. एकदा का पाऊस सुरू झाला की सर्व सुरळीत होईल. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असले तरी पाऊस चांगल्या प्रकारे पडेल असे मत तालुका कृषी अधिकारी दिलिप ढेंबरे यांनी सांगितले. पंचायत समिती मार्फत ५० टक्के अनुदानातून भात बियाणे दिले जाते. या वर्षी ही ते मिळावे अशी अपेक्षा आहे.तलासरीतील शेतकºयाचे पावसाकडे डोळेजिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरु वात झाली असली तरी तलासरी तालुक्यात पावसाने साधा शिडकावाही दिलेला नसल्याने येथील शेतकºयांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने पेरण्यास सुरु वातही झाली आहे मात्र तलासरी भागात आभाळ भरून येते पावसाला सुरु वात होणारअसे वाटू लागताच ढग गायब होऊन कडक ऊन पडते , पावसाला सुरु वात होणार म्हणून शेतकºयांनी खते बी बियाणे खरेदी करु न ठेवले आहेत शेतकरी पेरणी साठी जय्यत तयारीत आहे पण पाऊस चकवा देतो आहे.तर जिल्ह्यातील भातशेती येईल संपुष्टात1,17,824 हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळ पालघर तालुक्याचे असून त्या पैकी सुमारे १५ ते १६ हजार क्षेत्राफळा वर भात लागवड केली जात असून त्या मध्ये हळवे, गरवे व निमगरवे क्षेत्राचा समावेश असला तरी भातशेतीचे झपाट्याने घटणारे क्षेत्र हाचिंतेचा विषय असून शेतकºयांना प्रोत्साहन व बी बी-बियाणांपासून परवडणारे कर्ज उपलब्ध करून न दिल्यास भात शेती इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही .मृग बरसल्याने बळीराजाची भात पेरणीसाठी लगबगपारोळ : वरुण राजा बरसल्याने वसईतील शेतकरी राबलेल्या शेतात पावसाच्या उबेवर तयार होणाºया पेरणीसाठी लगबग करू लागला आहे. यामुळे बळीराजा पेरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर, बी, बियाणे, बीजकरणासाठी लागणारी औषधे, संकरित बियाणे यांची जुळवाजुळव करून घेत असून भागातील कृषी केंद्रांवर शेतकºयांची गर्दी दिसत आहे. चालू वर्षी बी बियाणे, खते, औषधे, औजारे यांच्या वाढलेल्या किमतीसह शेत नांगरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर यांचे भाडे पॉवर टिलरला ताशी ३५० रु . तर मोठ्या ट्रॅक्टरचे ताशी भाडे ७५० रु इतके आहे.असे असले तरी वसईतील शेतकरी सुरवातीच्या पावसातील पेरण्या लवकर आटोपण्यासाठी लगबग करीत आहेत. कारण राबावरील पेरण्या पावसाच्या सुरवातीला उरकल्याने भात रोपात अनावश्यक उगवणाºया गवताचे प्रमाण अत्यंत कमी असते किंवा ते तयार होणाºया भात रोपपेक्षा खुजे असते . तसेच महिनाभर ऊन खाऊन तापलेल्या जमिनीची उब मिळून पेरलेल्या जास्तीत जास्त दाण्याची रोपे उगवतात व सशक्त होतात. तसेच योग्य वेळी लावणीसाठी तयार होतात.डहाणूत पेरण्यांचा पत्ताच नाहीबोर्डी : जूनचा दुसरा आठवडा उलटूनही तालुक्यात पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे अद्याप शेतकºयांनी भात आणि खरिपातील अन्य पिकांची पेरणी केलेली नसल्याने पेरणीचा तक्ता कोरा असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास लावणीचा हंगाम लांबून, त्याचा परिणाम १२५ ते १४५ दिवसात तयार होणाºया भात पिकाच्या उत्पादनावर होईल अशी चिंता काही शेतकºयांनी व्यक्त केली. दरम्यान बोर्डी प्रमाणेच तालुक्यात दुबार पिके घेणाºया भागात धुळपेरणी करण्यात आली आहे. मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीmonsoon 2018मान्सून 2018Vasai Virarवसई विरार