शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:44 IST

जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत.

- पंकज राऊतबोईसर  - जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत.एप्रिल व मे महिन्यात शेतकरी मान्सूनपूर्व शेतीकामात व्यस्त होता दोन महिन्यात त्याने भातबी पेरणी नंतर भात बियांना पोषक अशी भुसभुशीत शेतजमीन मिळावी म्हणून शेतात राब पेटवून पेरणीपूर्वी व पेरणी नंतर लागणार्या सर्व साधन सामग्रीची जमवा जमव केली. त्यानंतर शेतकरी पावसाची वाट बघत आहे पालघर तालुक्यात चार महिन्यामध्ये साधारणपणे अडीच ते तीन हजार मि मी सरासरी पाऊस पडतो परंतु कधी वारेमाप, कधी टप्याटप्याने तर कधी दीर्घ विश्रांती घेऊन तो पडत असल्याने भातशेती म्हणजे आतबट्याचा व्यवहार होत आहे. त्यामुळे भात शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे.२०१६ साली बोईसर मंडळ क्षेत्रात २१ जूनला पावसाचे आगमन झाले होते त्या दिवशी १३ मि. मी . पाऊस झाला होता एवढा पाऊस उशिरा सुरू झाला त्या नंतर २४ जून पाऊस सुरू झाला होता संतत धार सुरूच राहून ६ जुलै पर्यंत १००० मि .मी. पाऊस झाला एकदम पाऊस कोसळलाल्या मुळे पेरण्या ही जुलै पर्यंत खोळंबून राहिल्या होत्या तर मागील वर्षी मागील वर्षी १० जूनपर्यंत बोईसर मंडळ क्षेत्रात ४०६.२ मि.मी. पाऊसाची नोंद झाली होती परंतु आज पर्यंत बोईसरला निरंक (0 मी. मि.) पाऊस म्हणजे सुरूच झाला नसल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.पावसाअभावी शेतीची कामे रेंगाळलीविक्रमगड : जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी या तालुक्यात पावसाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे शेतातील नागरणीची कामे झाली असली तरी पाऊस असता तर पेरणी करता आली असती असे मत शेतकरी रणधीर पाटील यांनी व्यक्त केले जसा पाऊस लाबणीवर जाईल तशी पेरणी व इतर शेतीची कामे लाबणीवर जाणार आहे तालुक्यात ८८५६ हेक्टर वर भात शेती केली जाते.यात मोठ्या प्रमाणात सुधारित बियाणांचा वापर शेतकरी करीत आहेत. त्यामध्ये सुवर्ण, राशी पूनम, महाबीज, जया, सुरती कोलम, गुजरात ११, इ भात बियाण्याची लागवड करतात , परंतु पावसाअभावी पेरणी लांबणीवर जाणार आहे. तालुक्यात पावसाळी पाण्यावर करण्यात येण्याऱ्या भातशेतीचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकरी पावसाची वाट पाहत आहे . दरवर्षी पाऊस शेतकºयांना चकवा देतो. यंदा ही त्याने चकवा दिला आहे.वेधशाळेचा अंदाज हि त्याने फोल ठरविला आहे. मागील वर्षी पावसाने हजेरी जूनच्या पहिल्याच आठवडयात लावली होती. त्यामुळे पेरणी सुरू होती. यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. एकदा का पाऊस सुरू झाला की सर्व सुरळीत होईल. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असले तरी पाऊस चांगल्या प्रकारे पडेल असे मत तालुका कृषी अधिकारी दिलिप ढेंबरे यांनी सांगितले. पंचायत समिती मार्फत ५० टक्के अनुदानातून भात बियाणे दिले जाते. या वर्षी ही ते मिळावे अशी अपेक्षा आहे.तलासरीतील शेतकºयाचे पावसाकडे डोळेजिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरु वात झाली असली तरी तलासरी तालुक्यात पावसाने साधा शिडकावाही दिलेला नसल्याने येथील शेतकºयांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने पेरण्यास सुरु वातही झाली आहे मात्र तलासरी भागात आभाळ भरून येते पावसाला सुरु वात होणारअसे वाटू लागताच ढग गायब होऊन कडक ऊन पडते , पावसाला सुरु वात होणार म्हणून शेतकºयांनी खते बी बियाणे खरेदी करु न ठेवले आहेत शेतकरी पेरणी साठी जय्यत तयारीत आहे पण पाऊस चकवा देतो आहे.तर जिल्ह्यातील भातशेती येईल संपुष्टात1,17,824 हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळ पालघर तालुक्याचे असून त्या पैकी सुमारे १५ ते १६ हजार क्षेत्राफळा वर भात लागवड केली जात असून त्या मध्ये हळवे, गरवे व निमगरवे क्षेत्राचा समावेश असला तरी भातशेतीचे झपाट्याने घटणारे क्षेत्र हाचिंतेचा विषय असून शेतकºयांना प्रोत्साहन व बी बी-बियाणांपासून परवडणारे कर्ज उपलब्ध करून न दिल्यास भात शेती इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही .मृग बरसल्याने बळीराजाची भात पेरणीसाठी लगबगपारोळ : वरुण राजा बरसल्याने वसईतील शेतकरी राबलेल्या शेतात पावसाच्या उबेवर तयार होणाºया पेरणीसाठी लगबग करू लागला आहे. यामुळे बळीराजा पेरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर, बी, बियाणे, बीजकरणासाठी लागणारी औषधे, संकरित बियाणे यांची जुळवाजुळव करून घेत असून भागातील कृषी केंद्रांवर शेतकºयांची गर्दी दिसत आहे. चालू वर्षी बी बियाणे, खते, औषधे, औजारे यांच्या वाढलेल्या किमतीसह शेत नांगरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर यांचे भाडे पॉवर टिलरला ताशी ३५० रु . तर मोठ्या ट्रॅक्टरचे ताशी भाडे ७५० रु इतके आहे.असे असले तरी वसईतील शेतकरी सुरवातीच्या पावसातील पेरण्या लवकर आटोपण्यासाठी लगबग करीत आहेत. कारण राबावरील पेरण्या पावसाच्या सुरवातीला उरकल्याने भात रोपात अनावश्यक उगवणाºया गवताचे प्रमाण अत्यंत कमी असते किंवा ते तयार होणाºया भात रोपपेक्षा खुजे असते . तसेच महिनाभर ऊन खाऊन तापलेल्या जमिनीची उब मिळून पेरलेल्या जास्तीत जास्त दाण्याची रोपे उगवतात व सशक्त होतात. तसेच योग्य वेळी लावणीसाठी तयार होतात.डहाणूत पेरण्यांचा पत्ताच नाहीबोर्डी : जूनचा दुसरा आठवडा उलटूनही तालुक्यात पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे अद्याप शेतकºयांनी भात आणि खरिपातील अन्य पिकांची पेरणी केलेली नसल्याने पेरणीचा तक्ता कोरा असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास लावणीचा हंगाम लांबून, त्याचा परिणाम १२५ ते १४५ दिवसात तयार होणाºया भात पिकाच्या उत्पादनावर होईल अशी चिंता काही शेतकºयांनी व्यक्त केली. दरम्यान बोर्डी प्रमाणेच तालुक्यात दुबार पिके घेणाºया भागात धुळपेरणी करण्यात आली आहे. मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीmonsoon 2018मान्सून 2018Vasai Virarवसई विरार