शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Virar Covid Hospital Fire: ‘ती’ कोरोनातून बरी झाली; पण आगीत होरपळून मरण पावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 06:43 IST

अग्निकांड : काळही आला अन् वेळही आली

विजय वल्लभवसई : शुक्रवारी पहाटे विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या १५ रुग्णांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला. याच दुर्घटनेत वसईतील कळंब गावच्या क्षमा अरुण म्हात्रे या महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान, क्षमा म्हात्रेवर गेल्या एक महिन्यापासून कोरोनावर उपचार सुरू होते. ती अलीकडे बरीही झाली होती आणि शुक्रवारी सकाळी तिला घरी सोडण्यात येणार होते; परंतु शुक्रवारीच पहाटे अग्निकांडात तिचा करुण अंत झाला.

वसई तालुक्यातील मच्छीमारांचे गाव म्हणून कळंब हे गाव ओळखले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या गावातील क्षमा म्हात्रे ही पहिली रुग्ण ठरली होती. तिच्यावर विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात गेल्या एक महिन्यापासून उपचार सुरू होते. कोरोनामधून ती बरीही झाली होती आणि घटनेच्या सकाळी तिला रुग्णालयातून सोडण्यात येणार होते; परंतु दुर्दैवाने पहाटे रुग्णालयाला लागलेल्या आगीत होरपळून तिने या जगाचाच निरोप घेतला. क्षमा म्हात्रे ही ४५ वर्षांची होती. तिला दोन मुली असून, त्यांचे मातृछत्र हरपले आहे. या घटनेने कळंब गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, कळंब गाव हे रेड झोनमध्ये येत असून, याठिकाणी दिवसाआड १/२ मृत्यू होत आहेत. गेल्या आठवडाभरात ७ ते ८ जण मृत्युमुखी पडले असतानाही याठिकाणी कुठेही सामाजिक अंतर पाळण्यात येत नाही. दुकानेही उघडी असून, मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावर जिल्हा व पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही मत व्यक्त होत आहे. या घटनेने कळंब गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :VirarविरारfireआगVasai Virarवसई विरार