शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

नादुरुस्त वीज मीटरमुळे विरारला बिले वाढली, सोसायट्या हैराण, सामान्य नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:47 IST

विरार पश्चिम येथे राहणाऱ्या सदस्यांना मार्च पासून वीज बिले दुप्पट तिप्पट वाढून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

विरार : विरार पश्चिम येथे राहणाऱ्या सदस्यांना मार्च पासून वीज बिले दुप्पट तिप्पट वाढून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सप्टेंबरपर्यंत नवीन मीटर बसवण्यात येतील असे आश्वासन वितरण विभागाकडून देण्यात आले होते, पण अद्यापही त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मार्चपासून वाढून येणाºया वीज बिलाचा नागरिकांना त्रास होत आहे. ही बिले कमी करवून घेण्याकरिता त्यांना वितरण विभागात चकरा माराव्या लागत आहेत. दर महिन्याला नागरिकांना हे कष्ट घ्यावे लागत असून, विरार पश्चिम या परिसरात जुलै महिन्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे पाणी भरल्यामुळे विजेच्या मीटरमध्ये बिघाड झाले होते. मार्चपासून विजेचे बिल वाढवून येत असल्यामुळे मीटर जुने झाले आहेत ते बदलायला हवे असे वितरण विभागाकडून नागरिकांना सांगण्यात आले. जुलैनंतर पाणी भरल्यामुळे मीटर खराब झाले आहे व ते बदलायला हवे अशी कारणे महावितरण विभागाकडून देऊन विषय टाळण्यात येत आहे. सप्टेंबरात मीटर बदलण्याचे आश्वासन देण्यात आले होते व त्यानंतर वीज बिलात वाढ होणार नाही अशी खात्री देखील महावितरणच्या अधिकाºयांनी दिली होती. पण आता दोन महिने झाले तरीही चाणक्य चौकातील रहिवाशांना दुप्पट तिप्पट वीज बिल येत आहे. शनिवारी बिल भरायला गेलेल्या नागरिकांनी वीज विभागाविरु द्ध तक्र ार केली व परत जर बिल वाढवून आले तर आम्ही मोर्चा काढू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.अनेकदा तक्रार करून देखील गेल्या ९ महिन्यांपासून दुप्पट तिप्पट बिल येत असल्याने नागरिक हैराण आहेत. महावितरणमध्ये चकरा मारून नागरिकांचे हाल पाहायला अधिकाºयांना काही मज्जा वाटते का? असा सवाल संतप्त नागरिकांतून होत आहे. नागरिकांच्या सेवेसाठी बसलेले अधिकारी त्यांच्या त्रासाचे कारण बनत आहेत. मीटर खराब असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे काम महावितरणचे आहे, पण, त्यात देखील टाळाटाळ होत असल्यामुळे आता मोर्चा काढण्याशिवाय पर्याय नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.महावितरण विभागातील अधिकारी कारंजेकर यांचे असे म्हणणे आहे की ‘मीटर बसवण्याचे काम लगेच पूर्ण होत नाही आज चार मिटर बसवले तर उद्या चार बसतात. त्यामुळे त्या प्रक्रियेला वेळ लागतो आहे. ज्याकाही तक्रारी आहेत त्याची नोंद आम्ही घेत आहोत त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी देखील आम्ही घेऊ. परंतु त्यावर विश्वास ठेवण्यास आता ग्राहक तयार नाहीत. कारण त्यांचा यापूर्वीचा अशा अश्वासनांचा अनुभव धड नाही.महावितरण अधिकाºयांची दादागिरी आम्ही आता चालू देणार नाही, क्रित्येक महिने आमची लूट होत आहे. तर ते दुरु स्त करण्याचे काम आमचे कि त्यांचे? असा देखील प्रश्न नागरिकांनी अधिकाºयांना केला आहे. प्रत्येक वेळी अधिकाºयांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का करून द्यावी लागते? त्यांनी काम सोडावं. असे पाटील यांनी सांगितले. तर या सर्वात आता महापालिकेने लक्ष घालावे अशी विनंती केली गेली आहे.

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरार