शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

नादुरुस्त वीज मीटरमुळे विरारला बिले वाढली, सोसायट्या हैराण, सामान्य नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:47 IST

विरार पश्चिम येथे राहणाऱ्या सदस्यांना मार्च पासून वीज बिले दुप्पट तिप्पट वाढून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

विरार : विरार पश्चिम येथे राहणाऱ्या सदस्यांना मार्च पासून वीज बिले दुप्पट तिप्पट वाढून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सप्टेंबरपर्यंत नवीन मीटर बसवण्यात येतील असे आश्वासन वितरण विभागाकडून देण्यात आले होते, पण अद्यापही त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मार्चपासून वाढून येणाºया वीज बिलाचा नागरिकांना त्रास होत आहे. ही बिले कमी करवून घेण्याकरिता त्यांना वितरण विभागात चकरा माराव्या लागत आहेत. दर महिन्याला नागरिकांना हे कष्ट घ्यावे लागत असून, विरार पश्चिम या परिसरात जुलै महिन्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे पाणी भरल्यामुळे विजेच्या मीटरमध्ये बिघाड झाले होते. मार्चपासून विजेचे बिल वाढवून येत असल्यामुळे मीटर जुने झाले आहेत ते बदलायला हवे असे वितरण विभागाकडून नागरिकांना सांगण्यात आले. जुलैनंतर पाणी भरल्यामुळे मीटर खराब झाले आहे व ते बदलायला हवे अशी कारणे महावितरण विभागाकडून देऊन विषय टाळण्यात येत आहे. सप्टेंबरात मीटर बदलण्याचे आश्वासन देण्यात आले होते व त्यानंतर वीज बिलात वाढ होणार नाही अशी खात्री देखील महावितरणच्या अधिकाºयांनी दिली होती. पण आता दोन महिने झाले तरीही चाणक्य चौकातील रहिवाशांना दुप्पट तिप्पट वीज बिल येत आहे. शनिवारी बिल भरायला गेलेल्या नागरिकांनी वीज विभागाविरु द्ध तक्र ार केली व परत जर बिल वाढवून आले तर आम्ही मोर्चा काढू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.अनेकदा तक्रार करून देखील गेल्या ९ महिन्यांपासून दुप्पट तिप्पट बिल येत असल्याने नागरिक हैराण आहेत. महावितरणमध्ये चकरा मारून नागरिकांचे हाल पाहायला अधिकाºयांना काही मज्जा वाटते का? असा सवाल संतप्त नागरिकांतून होत आहे. नागरिकांच्या सेवेसाठी बसलेले अधिकारी त्यांच्या त्रासाचे कारण बनत आहेत. मीटर खराब असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे काम महावितरणचे आहे, पण, त्यात देखील टाळाटाळ होत असल्यामुळे आता मोर्चा काढण्याशिवाय पर्याय नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.महावितरण विभागातील अधिकारी कारंजेकर यांचे असे म्हणणे आहे की ‘मीटर बसवण्याचे काम लगेच पूर्ण होत नाही आज चार मिटर बसवले तर उद्या चार बसतात. त्यामुळे त्या प्रक्रियेला वेळ लागतो आहे. ज्याकाही तक्रारी आहेत त्याची नोंद आम्ही घेत आहोत त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी देखील आम्ही घेऊ. परंतु त्यावर विश्वास ठेवण्यास आता ग्राहक तयार नाहीत. कारण त्यांचा यापूर्वीचा अशा अश्वासनांचा अनुभव धड नाही.महावितरण अधिकाºयांची दादागिरी आम्ही आता चालू देणार नाही, क्रित्येक महिने आमची लूट होत आहे. तर ते दुरु स्त करण्याचे काम आमचे कि त्यांचे? असा देखील प्रश्न नागरिकांनी अधिकाºयांना केला आहे. प्रत्येक वेळी अधिकाºयांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का करून द्यावी लागते? त्यांनी काम सोडावं. असे पाटील यांनी सांगितले. तर या सर्वात आता महापालिकेने लक्ष घालावे अशी विनंती केली गेली आहे.

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरार