शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

खाडीपुलाच्या मार्गाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:01 IST

बाधित होण्याची भीती? : भाईंदर - नायगाव खाडी पुलाचा उताराचा मार्ग बदला

आशिष राणेवसई : नायगाव ते भाईंदरला अवघ्या १० ते १२ मिनिटांत जोडणाऱ्या भाईंदर-नायगाव खाडी पुलाच्या प्रस्तावित मार्गाला नायगाव कोळीवाडा येथील स्थानिक मच्छीमारांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यात नायगाव कोळीवाडा येथे राहणाºया स्थानिक मच्छीमार नागरिकांच्या मच्छी सुकविण्याच्या व इतर सार्वजनिक वापराच्या जागेतून हा खाडी पूल जाणार असल्याने गावांतील मच्छीमार यामुळे बाधित होणार आहेत. यामुळेच हा विरोध असून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी शनिवारी आयोजित एका सभेत चर्चा करण्यात आली.भार्इंदर-नायगाव दरम्यानचा ब्रिटिश कालीन पूल वापरासाठी देण्याची तेथील नागरिकांची जुनी मागणी होती. परंतु हा जुना खाडी पूल कमकुवत असल्याने त्याला पूर्वीच केंद्र सरकारने परवानगी नाकारली होती. मात्र याला पर्याय म्हणून भाईंदर खाडीवर रेल्वे पुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी मागणी समोर आली. हा पूल तयार झाला तर वसई-विरारकर हे भाईंदरला अवघ्या १० ते १२ मिनिटांत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे महामार्गावरून जाण्यासाठी लागणारा एक ते दीड तास वाचणार आहे. या पुलासाठी निविदा मागविण्यात आली असून अंतिम निविदा लवकरच मागविण्यात येईल.

सर्व्हे क्र. १२ मधून जातोय उतार ; त्यालाच होतोय विरोध?या पुलाचा उतार हा नायगाव येथील मच्छीमारांच्या सार्वजनिक वापराच्या जागेवर प्रस्तावित असल्याने स्थानिक मच्छीमार बाधीत होणार आहेत. मुख्य म्हणजे स्थानिकांना विश्वासात न घेता हा उतार येथे देण्यात येणार असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. ज्यावेळी सर्वेक्षणासाठी या भागात अधिकारी आले त्यावेळी ही पुलाच्या उताराची बाब समोर आल्याचे ही गावकºयांनी सांगितले. त्यानंतर तात्काळ येथील कोळी बांधवांनी स्थानिक स्तरावर सभा घेऊन एमएमआरडीएच्या अधिकाºयांना स्थानिकां सोबत चर्चेसाठी बोलावले. त्यानुसार शनिवारी सभा संपन्न झाली.

या सभेत स्थानिकांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. नायगाव या भागात सर्वे क्र मांक १२ ही मच्छीमार समाजासाठी सार्वजनिक वापराची जागा आहे. ही जागा नायगाव येथील मच्छीमार संस्थेच्या नावे आहे. या हक्काच्या जागेत मच्छीमार बांधवांच्या मार्फत मासळी सुकविणे, जाळ्याचे विणकाम करणे, बोटीची दुरु स्ती करणे व खेळण्यासाठी मैदान म्हणून या जागेचा वापर होतो. परंतु या जागेतून भार्इंदर नायगाव खाडीपूल जाणार असल्याने आता अन्य नागरिकांसाठी जरी हा मार्ग सोयीचा असला तरी येथील स्थानिक मच्छीमार बांधव यामध्ये बºयापैकी भरडला जाणार आहे, असेही संतप्त गावकºयांनी सांगितले,

पावसाळ्यात मासेमारी बंदी कालावधीमध्ये हे मच्छीमार सुक्या मासळीची विक्री मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे ही मासळी सुकविण्याचे काम मार्च ते मे दरम्यान होत असते. यासाठी हे मच्छीमार या जागेचा वापर करतात. तर, दुसरीकडे मच्छीमार येथे बोटीही ठेवतात. जर या जागेतून हा खाडी पूल गेला तर मच्छीमारांचे मोठे नुकसान होईल, असा दावाच गावकºयांनी केला आहे.