शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपुलाच्या मार्गाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:01 IST

बाधित होण्याची भीती? : भाईंदर - नायगाव खाडी पुलाचा उताराचा मार्ग बदला

आशिष राणेवसई : नायगाव ते भाईंदरला अवघ्या १० ते १२ मिनिटांत जोडणाऱ्या भाईंदर-नायगाव खाडी पुलाच्या प्रस्तावित मार्गाला नायगाव कोळीवाडा येथील स्थानिक मच्छीमारांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यात नायगाव कोळीवाडा येथे राहणाºया स्थानिक मच्छीमार नागरिकांच्या मच्छी सुकविण्याच्या व इतर सार्वजनिक वापराच्या जागेतून हा खाडी पूल जाणार असल्याने गावांतील मच्छीमार यामुळे बाधित होणार आहेत. यामुळेच हा विरोध असून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी शनिवारी आयोजित एका सभेत चर्चा करण्यात आली.भार्इंदर-नायगाव दरम्यानचा ब्रिटिश कालीन पूल वापरासाठी देण्याची तेथील नागरिकांची जुनी मागणी होती. परंतु हा जुना खाडी पूल कमकुवत असल्याने त्याला पूर्वीच केंद्र सरकारने परवानगी नाकारली होती. मात्र याला पर्याय म्हणून भाईंदर खाडीवर रेल्वे पुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी मागणी समोर आली. हा पूल तयार झाला तर वसई-विरारकर हे भाईंदरला अवघ्या १० ते १२ मिनिटांत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे महामार्गावरून जाण्यासाठी लागणारा एक ते दीड तास वाचणार आहे. या पुलासाठी निविदा मागविण्यात आली असून अंतिम निविदा लवकरच मागविण्यात येईल.

सर्व्हे क्र. १२ मधून जातोय उतार ; त्यालाच होतोय विरोध?या पुलाचा उतार हा नायगाव येथील मच्छीमारांच्या सार्वजनिक वापराच्या जागेवर प्रस्तावित असल्याने स्थानिक मच्छीमार बाधीत होणार आहेत. मुख्य म्हणजे स्थानिकांना विश्वासात न घेता हा उतार येथे देण्यात येणार असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. ज्यावेळी सर्वेक्षणासाठी या भागात अधिकारी आले त्यावेळी ही पुलाच्या उताराची बाब समोर आल्याचे ही गावकºयांनी सांगितले. त्यानंतर तात्काळ येथील कोळी बांधवांनी स्थानिक स्तरावर सभा घेऊन एमएमआरडीएच्या अधिकाºयांना स्थानिकां सोबत चर्चेसाठी बोलावले. त्यानुसार शनिवारी सभा संपन्न झाली.

या सभेत स्थानिकांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. नायगाव या भागात सर्वे क्र मांक १२ ही मच्छीमार समाजासाठी सार्वजनिक वापराची जागा आहे. ही जागा नायगाव येथील मच्छीमार संस्थेच्या नावे आहे. या हक्काच्या जागेत मच्छीमार बांधवांच्या मार्फत मासळी सुकविणे, जाळ्याचे विणकाम करणे, बोटीची दुरु स्ती करणे व खेळण्यासाठी मैदान म्हणून या जागेचा वापर होतो. परंतु या जागेतून भार्इंदर नायगाव खाडीपूल जाणार असल्याने आता अन्य नागरिकांसाठी जरी हा मार्ग सोयीचा असला तरी येथील स्थानिक मच्छीमार बांधव यामध्ये बºयापैकी भरडला जाणार आहे, असेही संतप्त गावकºयांनी सांगितले,

पावसाळ्यात मासेमारी बंदी कालावधीमध्ये हे मच्छीमार सुक्या मासळीची विक्री मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे ही मासळी सुकविण्याचे काम मार्च ते मे दरम्यान होत असते. यासाठी हे मच्छीमार या जागेचा वापर करतात. तर, दुसरीकडे मच्छीमार येथे बोटीही ठेवतात. जर या जागेतून हा खाडी पूल गेला तर मच्छीमारांचे मोठे नुकसान होईल, असा दावाच गावकºयांनी केला आहे.