शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

ग्रामस्थांनी सोडविला पाणीप्रश्न, इतरांसाठी निर्माण केला आगळावेगळा आादर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:22 IST

विक्रमगड तालुक्यात सध्या पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. तालुक्यात दर वर्षी त्याच त्याच गाव-पाड्याना पाणीटंचाई जाणवत आहे.

- राहुल वाडेकर तलवाडा : विक्रमगड तालुक्यात सध्या पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. तालुक्यात दर वर्षी त्याच त्याच गाव-पाड्याना पाणीटंचाई जाणवत आहे. शासनाकडून या पाणी टंचाईवर कायम स्वरूपाची उपययोजना करण्या ऐवजी टँकरने पाणीपुरवठा करून तात्पुरती मलम पट्टी केली जात आहे. तालुक्यातील खुडेद म्हसेपाडाची लोकसंख्या २०० ते ३०० च्या दरम्यान आहे. येथे एकच बोअरवेल आहे या बोअरवेल वरुनच म्हसेपाडा, घोडीचापाडा या दोन पाड्यातील नागरीकाना पाणी भरावे लागत असल्याने या पाडयांना दरवर्षी एप्रिल, मे, जून ह्या महिन्यांमध्ये पाणी टंचाईचा फटका बसत असतो. शासनाकडून या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांनी एकत्र येऊन सावली चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबईच्या मदतीने श्रमदानातून जुन्या विहिरीतील १५ ते २० फूट गाळ काढून ती पुनर्जीवित केली व पाड्यातील पाणी टंचाईवर कायम स्वरु पात मात केली आहे.गावाने ठरवले तर पाणी टंचाईवर कायम स्वरूपाची मात कशी होऊ शकते याचा व गाव करील ते राव काय करील? या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.या गाव शिवारात कुठलेही धरण, तलाव किवा बंधारा नाही. हा भाग डोंगर-दºयांत वसलेला आहे. यामुळे या भागाला दर वर्षी पाणी टंचाईचा फटका बसत असतो. पाणी टंचाई सुरु झाली की पायपीट करत महिलाना पाणी भरावे लागत होते या पाणी टंचाई वर मात करण्यासाठी पाड्यातील नागरिकांनी एकत्र येऊन पाड्यात एकमेव असलेली आणि गाळाने खचाखच भरलेल्या विहिरीतील १५ ते २० फूट गाळ ८ ते १० दिवसांच्या श्रमदानाने काढला.त्याना साथ दिली ती मुंबई येथील सावली चेरीटेबल ट्रस्टने.आमचा पाड्याला दरवर्षी पाणी टंचाई जाणवत होती. त्यामुळे मे महिन्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. असे असातांना आम्हला सावली चेरीटेबल ट्रस्ट, मुंबई याच्या सहकार्याने विहिरीतील गाळ काढण्यास मदत झाली. त्यामुळे पाड्याचा पाणी टंचाईचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. -पिंटी सुभाष गांगोडा, महिला, खुडेद पैकी म्हसेपाडाआमचा पाडा उंच भागात आहे. त्यामुळे पाणी टंचाई आहे. गावात एकमेव बोअरवेल असून ती वरूनच घोडिचापाडा व म्हसेपाडा या दोन पाड्यातील महिला पाणी भरतात. त्यामुळे पाणी टंचाई जाणवत होती. त्यातच एकमेव विहिरीत गाळ साचल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती. ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाळ काढल्याने पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटला आहे. -लहू नडगे, ग्रामस्थ, खुडेद>गावकरीही सोडवू शकतात प्रश्नया दोन पाडयातीत पाणी टंचाईमुळे होणारी महिलाची पायपीट कायम स्वरूपाची थांबणार असून या पाड्याने श्रमदानातून कायम स्वरूपाची पाणी टंचाईवर मात केली आहे.त्यामुळे ग्रामस्थांमधे आनंदाचे वातावरण आहे . यापुढे गावात पाणीटंचाई दूर होणार असून ग्रामस्थ व गुरेढोरे यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम सुटल्याने ग्रमस्थानी समाधान व्यक्त केले.आपल्या गावपाड्याचा प्रत्येक प्रश्न शासनानेच सोडवावा असे नाही.त्यासाठी आपणही पुढाकार घेऊन विधायक काम करू शकतो, याचा उत्तम आदर्श या गावाने इतरांसाठी निर्माण केला आहे.