शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

ग्रामस्थांनी सोडविला पाणीप्रश्न, इतरांसाठी निर्माण केला आगळावेगळा आादर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:22 IST

विक्रमगड तालुक्यात सध्या पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. तालुक्यात दर वर्षी त्याच त्याच गाव-पाड्याना पाणीटंचाई जाणवत आहे.

- राहुल वाडेकर तलवाडा : विक्रमगड तालुक्यात सध्या पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. तालुक्यात दर वर्षी त्याच त्याच गाव-पाड्याना पाणीटंचाई जाणवत आहे. शासनाकडून या पाणी टंचाईवर कायम स्वरूपाची उपययोजना करण्या ऐवजी टँकरने पाणीपुरवठा करून तात्पुरती मलम पट्टी केली जात आहे. तालुक्यातील खुडेद म्हसेपाडाची लोकसंख्या २०० ते ३०० च्या दरम्यान आहे. येथे एकच बोअरवेल आहे या बोअरवेल वरुनच म्हसेपाडा, घोडीचापाडा या दोन पाड्यातील नागरीकाना पाणी भरावे लागत असल्याने या पाडयांना दरवर्षी एप्रिल, मे, जून ह्या महिन्यांमध्ये पाणी टंचाईचा फटका बसत असतो. शासनाकडून या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांनी एकत्र येऊन सावली चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबईच्या मदतीने श्रमदानातून जुन्या विहिरीतील १५ ते २० फूट गाळ काढून ती पुनर्जीवित केली व पाड्यातील पाणी टंचाईवर कायम स्वरु पात मात केली आहे.गावाने ठरवले तर पाणी टंचाईवर कायम स्वरूपाची मात कशी होऊ शकते याचा व गाव करील ते राव काय करील? या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.या गाव शिवारात कुठलेही धरण, तलाव किवा बंधारा नाही. हा भाग डोंगर-दºयांत वसलेला आहे. यामुळे या भागाला दर वर्षी पाणी टंचाईचा फटका बसत असतो. पाणी टंचाई सुरु झाली की पायपीट करत महिलाना पाणी भरावे लागत होते या पाणी टंचाई वर मात करण्यासाठी पाड्यातील नागरिकांनी एकत्र येऊन पाड्यात एकमेव असलेली आणि गाळाने खचाखच भरलेल्या विहिरीतील १५ ते २० फूट गाळ ८ ते १० दिवसांच्या श्रमदानाने काढला.त्याना साथ दिली ती मुंबई येथील सावली चेरीटेबल ट्रस्टने.आमचा पाड्याला दरवर्षी पाणी टंचाई जाणवत होती. त्यामुळे मे महिन्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. असे असातांना आम्हला सावली चेरीटेबल ट्रस्ट, मुंबई याच्या सहकार्याने विहिरीतील गाळ काढण्यास मदत झाली. त्यामुळे पाड्याचा पाणी टंचाईचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. -पिंटी सुभाष गांगोडा, महिला, खुडेद पैकी म्हसेपाडाआमचा पाडा उंच भागात आहे. त्यामुळे पाणी टंचाई आहे. गावात एकमेव बोअरवेल असून ती वरूनच घोडिचापाडा व म्हसेपाडा या दोन पाड्यातील महिला पाणी भरतात. त्यामुळे पाणी टंचाई जाणवत होती. त्यातच एकमेव विहिरीत गाळ साचल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती. ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाळ काढल्याने पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटला आहे. -लहू नडगे, ग्रामस्थ, खुडेद>गावकरीही सोडवू शकतात प्रश्नया दोन पाडयातीत पाणी टंचाईमुळे होणारी महिलाची पायपीट कायम स्वरूपाची थांबणार असून या पाड्याने श्रमदानातून कायम स्वरूपाची पाणी टंचाईवर मात केली आहे.त्यामुळे ग्रामस्थांमधे आनंदाचे वातावरण आहे . यापुढे गावात पाणीटंचाई दूर होणार असून ग्रामस्थ व गुरेढोरे यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम सुटल्याने ग्रमस्थानी समाधान व्यक्त केले.आपल्या गावपाड्याचा प्रत्येक प्रश्न शासनानेच सोडवावा असे नाही.त्यासाठी आपणही पुढाकार घेऊन विधायक काम करू शकतो, याचा उत्तम आदर्श या गावाने इतरांसाठी निर्माण केला आहे.