शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनावर विजय मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले स्वत:लाच कोंडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 02:03 IST

तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गाचा प्रभाव हळूहळू वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सातपाटी, नवापूर, सरावली या गावांतील ग्रामस्थांनी स्वत:ला ४ ते ५ दिवस कोंडून घेण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.वाढता प्रादुर्भाव रोखला जावा, यासाठी तहसीलदार शिंदे यांनी सफाळेसह उसरणी, दांडा-खटाळी, डोंगरी व उंबरपाडा, कर्दळ आदी सहा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. सध्या संबंधित गावांवर आपल्या आरोग्य टीमसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी लक्ष ठेवून आहेत.सातपाटी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर या संशयित रुग्णाच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पार्श्वभूमीवर सरपंच व ग्रामसेवकांनी २८ ते ३० एप्रिलपर्यंत सातपाटी गाव कडकडीत बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.यापूर्वी तालुक्यातील मासवणजवळील काटाळे येथील एका विटभट्टीवर डहाणूच्या गंजाडमधील कामावर असलेल्या कुटुंबातील एक तीन वर्षीय मुलगी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार शिंदे यांनी काटाळे, लोवरे, वसरोली, वांदिवली, खरशेत, निहे, मासवण, वाकडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. तर सफाळे (उसरणी) येथे तालुक्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीसह मुलगी, आई-वडील अन्य नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. यानंतर १५ एप्रिल रोजी सफाळ्याच्या कर्दळ जवळील एक तरुण, उसरणी येथून ११ वर्षीय मुलगी व ४० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.>तीन ते पाच दिवसांसाठी गावे बंदबोईसरमध्ये एका ३४ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने २७ एप्रिल ते १ मे पर्यंत बोईसर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने घोषित केले आहे. तहसीलदार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण बोईसर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर लगतच्या सरावली व नवापूर ग्रामपंचायतींनी आपली गावे तीन ते पाच दिवसांसाठी बंद घोषित करीत कोरोनाला हरविण्यासाठी स्वत:ला घरातच कोंडून घेण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस