शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर विजय मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले स्वत:लाच कोंडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 02:03 IST

तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गाचा प्रभाव हळूहळू वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सातपाटी, नवापूर, सरावली या गावांतील ग्रामस्थांनी स्वत:ला ४ ते ५ दिवस कोंडून घेण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.वाढता प्रादुर्भाव रोखला जावा, यासाठी तहसीलदार शिंदे यांनी सफाळेसह उसरणी, दांडा-खटाळी, डोंगरी व उंबरपाडा, कर्दळ आदी सहा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. सध्या संबंधित गावांवर आपल्या आरोग्य टीमसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी लक्ष ठेवून आहेत.सातपाटी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर या संशयित रुग्णाच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पार्श्वभूमीवर सरपंच व ग्रामसेवकांनी २८ ते ३० एप्रिलपर्यंत सातपाटी गाव कडकडीत बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.यापूर्वी तालुक्यातील मासवणजवळील काटाळे येथील एका विटभट्टीवर डहाणूच्या गंजाडमधील कामावर असलेल्या कुटुंबातील एक तीन वर्षीय मुलगी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार शिंदे यांनी काटाळे, लोवरे, वसरोली, वांदिवली, खरशेत, निहे, मासवण, वाकडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. तर सफाळे (उसरणी) येथे तालुक्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीसह मुलगी, आई-वडील अन्य नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. यानंतर १५ एप्रिल रोजी सफाळ्याच्या कर्दळ जवळील एक तरुण, उसरणी येथून ११ वर्षीय मुलगी व ४० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.>तीन ते पाच दिवसांसाठी गावे बंदबोईसरमध्ये एका ३४ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने २७ एप्रिल ते १ मे पर्यंत बोईसर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने घोषित केले आहे. तहसीलदार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण बोईसर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर लगतच्या सरावली व नवापूर ग्रामपंचायतींनी आपली गावे तीन ते पाच दिवसांसाठी बंद घोषित करीत कोरोनाला हरविण्यासाठी स्वत:ला घरातच कोंडून घेण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस