शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कोरोनावर विजय मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले स्वत:लाच कोंडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 02:03 IST

तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गाचा प्रभाव हळूहळू वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सातपाटी, नवापूर, सरावली या गावांतील ग्रामस्थांनी स्वत:ला ४ ते ५ दिवस कोंडून घेण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.वाढता प्रादुर्भाव रोखला जावा, यासाठी तहसीलदार शिंदे यांनी सफाळेसह उसरणी, दांडा-खटाळी, डोंगरी व उंबरपाडा, कर्दळ आदी सहा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. सध्या संबंधित गावांवर आपल्या आरोग्य टीमसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी लक्ष ठेवून आहेत.सातपाटी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर या संशयित रुग्णाच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पार्श्वभूमीवर सरपंच व ग्रामसेवकांनी २८ ते ३० एप्रिलपर्यंत सातपाटी गाव कडकडीत बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.यापूर्वी तालुक्यातील मासवणजवळील काटाळे येथील एका विटभट्टीवर डहाणूच्या गंजाडमधील कामावर असलेल्या कुटुंबातील एक तीन वर्षीय मुलगी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार शिंदे यांनी काटाळे, लोवरे, वसरोली, वांदिवली, खरशेत, निहे, मासवण, वाकडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. तर सफाळे (उसरणी) येथे तालुक्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीसह मुलगी, आई-वडील अन्य नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. यानंतर १५ एप्रिल रोजी सफाळ्याच्या कर्दळ जवळील एक तरुण, उसरणी येथून ११ वर्षीय मुलगी व ४० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.>तीन ते पाच दिवसांसाठी गावे बंदबोईसरमध्ये एका ३४ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने २७ एप्रिल ते १ मे पर्यंत बोईसर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने घोषित केले आहे. तहसीलदार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण बोईसर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर लगतच्या सरावली व नवापूर ग्रामपंचायतींनी आपली गावे तीन ते पाच दिवसांसाठी बंद घोषित करीत कोरोनाला हरविण्यासाठी स्वत:ला घरातच कोंडून घेण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस