शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

२९ गावांतील ग्रामस्थांचा कल मनपाकडे!; महापालिकेतून गावे वगळली जाण्याची शक्यता धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 12:31 AM

हरकती-सूचनांतील ९,१८५ अर्ज महानगरपालिकेसाठी, केवळ २३३ अर्ज ग्रामपंचायतींच्या बाजूने तर २० अर्ज तटस्थ

पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेतून २९ गावे वगळण्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी संबंधित २९ गावांतीलच नागरिकांशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर मागवण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा मोठ्या प्रमाणातील कल हा वसई-विरार महानगरपालिकेच्या बाजूने राहिला आहे. महापालिकेतून ही गावे न वगळता त्या ठिकाणी महापालिका प्रशासनच ठेवावे, अशी मागणी करणारे सदर २९ गावांतून सुमारे नऊ हजार १८५ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. तर, केवळ २३३ अर्जांद्वारे ग्रामपंचायत प्रशासन ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच २० अर्जदार तटस्थ राहिले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वसई-विरार क्षेत्रातून २९ गावे वगळण्यासाठी सर्व घटकांसोबत व्यापक सल्लामसलत करून यथोचित अंतिम निर्णय घेण्याचे आदेश शासनास दिले होते. त्या अनुषंगाने सद्य:स्थितीत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सुनावणी न घेता दि. १७ ते २४ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत प्रस्तुत क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याकडून लेखी हरकती व सूचना मागाविण्यात आल्या होत्या. त्यानुसार वसई-विरार शहर  महानगरपालिकेकडे एकूण ९४३८ अर्ज प्राप्त झाले. यापैकी २९ गावे महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्याच्या बाजूने २३३ अर्ज व महानगरपालिका क्षेत्रातून गावे न वगळण्याच्या बाजूने ९१८५ व २० तटस्थ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार या क्षेत्रामध्ये युनिट ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन काय असावे? म्हणजेच पुन्हा ग्रामपंचायत ठेवाव्या अथवा स्वतंत्र नगरपालिका स्थापन कराव्या, याबाबतदेखील दि. २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत लेखी हरकती, सूचना व निवेदने मागाविण्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातून निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार एकूण २७०८ अर्ज प्राप्त झाले. २९ गावे महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्याच्या बाजूने एकूण चार अर्ज तर महानगरपालिका क्षेत्रातून गावे न वगळण्याच्या बाजूने २७०४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

शक्यता झाली धूसर  २९ गावांतील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावरील कौल हा महापालिका प्रशासनाच्याच बाजूने असल्याने महापालिकेतून ही गावे यापुढे वगळली जाण्याची शक्यता धूसर झाली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार