शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Video : बुडणाऱ्या तीन बालकांचे प्राण मित्रांनी वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 18:20 IST

आगवन खाडीत मासेमारी दरम्यानची घटना; अल्पवयीन दोघांची प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देसुदैवाने सोबतचे मित्र मदतीला धावल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आलेत्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अधिक उपचाराकरिता सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात पाठविल्याची माहिती, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रभाकर भोये यांनी लोकमतशी बोलताना दिली.

अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी - आगवन गावातील मोठापाडा या आदिवासी वस्तीतील आदित्य देवजी गोधाले (9वय), प्रीतम सुरेश महालुंगे (9वय) आणि त्याचा भाऊ सुयश सुरेश महालुंगे (6 वय) ही शाळकरी मुले मंगळवार, 9 एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नजीकच्या खाडीत खेकडे पकडायला गेली असताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. सुदैवाने सोबतचे मित्र मदतीला धावल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  

आगवनच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थी सकाळच्या सत्रातील शाळा संपवून घरी परतले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गावनजीकच्या खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेले होते. वरील तिघे खाडी पात्रातील गुढगाभर पाण्यात मासेमारी करण्यात गुंग असताना समुद्रात आलेल्या भरतीने खाडीतील पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेली. मात्र हे कळायच्या आत ते बुडाले, त्यांना पोहता येत नसल्याने ते गटांगळ्या खाऊ लागल्याचे जवळच असलेल्या भावेश गोविंद गहला, अमृत गोविंद गहला, आकाश देवाजी गोधाले यांनी पाहिल्यानंतर मदतीला धावून जात पहिल्यांदा सुयशला आणि त्यानंतर आदित्य व प्रीतमला काठावर काढले. प्रसंगावधान राखत उमेश, आशिष वेणू दळवी, आरुष वेणू दळवी तसेच अन्य मुले मदतीला धावून गेली. आदित्य व प्रीतम बेशुद्धावस्थेत होते. त्यांना ग्रामस्थ आणि पालकांच्या मदतीने पावणेसातच्या सुमारास आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर आदित्य व प्रीतम यांना आयसीयूची गरज असल्याने तासाभरानंतर अधिक उपचाराकरिता सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात पाठविल्याची माहिती, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रभाकर भोये यांनी लोकमतशी बोलताना दिली.

दरम्यान, या तिन्ही बालकांचे प्राण वाचविणारी मुले त्याच आगवनच्या आदिवासी पाड्यावरील असून त्यांचे वय दहा वर्षाच्या आतील आहे. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक पंचक्रोशीत होत आहे. सुयश हा आगरच्या रुग्णालयात दाखल असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याची आई रवू आणि नातेवाईक सोबत असून त्याने घडला प्रकार सांगितला.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेpalgharपालघर