शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ग्रामीण भागातूनही रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:42 IST

आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न : जंगल तोड, वणवे यामुळे रानभाज्या होताहेत दुर्मिळ

शशिकांत ठाकूरकासा : पावसाळा आला की पूर्वी ग्रामीण भागात सर्रास रानभाज्याचा वापर होत असे. मात्र आता रानभाज्या दुर्मिळ झाल्याने त्याचा वापरही कमी होऊ लागला आहे. पावसाळ्यात पूर्वी खेड्यापाड्यातील गरीब कुटुंबे तर पावसाळाभर आहारात रानभाज्याचाच वापर करत असत. काहीजण जंगलात जाऊन रानभाज्या शोधून त्या शहरीभागात विकून काही लोकांना रोजगार ही मिळत असे.

रानभाज्यामध्ये शेवली, कोळीभाजी, लोत, माठभाजी, टाकले, तेर, चाईचे देठ, बाफली, कोहरेल, धोधडी, अळू या पालेभाज्या तर बांबूचे देठ, कंद, कडूकंद या कंदभाज्या पेंढार, अळू, काकड, भोकर, कर्टुले, करडू, टेटवी, आळीम या फळभाज्यांचा आहारात वापर केला जात असे. यामध्ये शेवली या भाजीला विशेष मागणी असून त्यांच्यातील खाजटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये काकड टाकली जातात. तर उंच डोंगर उतारावर आढळणाऱ्या बाफली रानभाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे त्यांची फळेही साठवून ठेवली जातात.कोवळ्या बांबूचा देठ त्यास ग्रामीण भाषेत ‘वास्ता’ असे संबोधले जात असून त्यापासून त्याला काप देऊन शिंद ही भाजी मिळविली जाते. त्याचा ग्रामीण भागात आजही बºयाच ठिकाणी वापर केला जातो.

परंतु आता बांबूची झाडे कमी झाल्याने शिंद बनविण्यासाठी जंगलातून लोक आता कोवळे बांबूचे देठ शोधून आणतात. कर्टुले या फळभाजीला ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही मोठी मागणी आहे. तर कडूकंदापासून वली बनवतात त्या कडू असल्याने त्यांच्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये राखाडी टाकून त्या शिजविल्या जातात.