शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

वसईतील भाज्यांचे भाव गगनाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:21 IST

अवकाळी पावसाने वसई तालुक्यामध्ये हजेरी लावल्याने याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे.

नालासोपारा : अवकाळी पावसाने वसई तालुक्यामध्ये हजेरी लावल्याने याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे. पावसामुळे वसईत बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या भाज्यांसह वसई - विरारमध्ये पिकविण्यात येणाºया भाज्यांचे नुकसान झाल्याने भाज्यांच्या किंमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.नोव्हेंबर उजाडला तरीही पाऊस सुरु असल्याने शेतीचे आणि मच्छीमारांचे यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र, याचा फटका भाज्यांच्या किंमतींना बसला आहे. वसईच्या बाजारात अनेक भाज्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. वसई - विरारला टोमॅटो, कोबी, सिमला मिरची, वाटाणा, काकडी या भाज्यांचा पुरवठा नाशिकहून होतो. तर भेंडी, गवार, पालक, मेथी, तांदुळका, शिराळे, शेवग्याच्या शेंगा, दुधी, कारले, वांगी या सर्व भाज्या आगाशी, अर्नाळा, निर्मळ, कळंब, वसई या पश्चिम पट्ट्यात पिकवल्या जातात. मात्र, सर्वत्र पाऊस झाल्याने या भाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वसई - विरारमध्ये या भाज्यांची आवक घटली आहे.कांदा महाग झाल्याने त्याची जागा सध्या मुळ्याने घेतली आहे. अवकाळी पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने त्याला सोन्याचा भाव आला आहे. एक किलोला ७० ते ८० रुपये भाव आल्याने हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांना पार्सल आणि टेबलावर देण्यात येणारा कांदा बंद केला असून आता त्यासाठी काकडी आणि मुळ्याचा आधार घेतला आहे.।छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका....कांदा, टोमॅटो, मिरची यांच्या भाववाढीने छोटे खाद्यपदार्थ विक्रेते अडचणीत सापडले आहेत. अंडा भुर्जी, कांदा भजी, मिसळ यासारख्या कांदा, टोमॅटो, मिरची प्रमुख घटक असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर कांद्याच्या भाववाढीने परिणाम झाला आहे. कांदा, टोमॅटो, मिरची परवडत नसल्याने अनेक छोटे धंदेवाल्यांनी आपल्या गाड्या बंद ठेवल्या आहेत.। भाज्यांचे भाव आधीचे भाव सध्याचे भावभेंडी ६० १०० रु. किलोपालक भाजी १० २० रु. जुडीमेथी १० २० रु. जुडीकोबी ५० ८० रु. किलोकाकडी ४० ७० रु. किलोमिरची ८० १२० रु. किलोवालाच्या शेंगा १०० १५० रु किलोवांगी ४० ७० किलोकोथिंबीर ४० ८० रु. जुडीकांदा ४० ८० किलो