शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

वसईची शाळा केली नापास, बोर्डाचा गोंधळी कारभार, वेबसाइटवर चुकीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:12 IST

दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

पारोळ - दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. दहावीच्या परीक्षेत या शाळेतील मुलांना बार्डाने चक्क एटीकेटी लावल्याने पालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.या निकालात वसई तालुक्यातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याचे दिसून येत असताना जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेचा निकाल मात्र बोर्डाच्या चुकी मुळे ० टक्के लागल्याचे जाहीर झाल्याने पालकांना आणि शाळा व्यवस्थापनेला मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. या शाळेतील ४१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते ते सर्व नापास असल्याचे दाखिवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. ८२ टक्के गुण मिळालेला विद्यार्थीही बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे नापास दाखिवण्यात आला होता. मुळात शाळेत जो विषय शिकविला जात नाही त्या विषया बाबत हा घोळ झाल्याचे समोर आले आहे.या बाबत शाळा व्यवस्थापनाने परीक्षे पूर्वीच बोर्डाला पत्र लिहून कळविले होते. तसेच ही चूक दुरुस्त करण्यासाठी शुल्क ही भरले असताना बोर्डाच्या गलथान कारभारामुळे येथील मुलांना त्यांच्या पालकांना आणि शाळा व्यवस्थापनाला नाहक त्रास सहन करावा लागला. मुळात दहावीच्या मुलाला पास अथवा नापास असा रिझल्ट देण्यात येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्क लिस्टवर प्रमोटेड असे दाखविण्यात आले आहे. तसेच काहींना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एटीकेटी लावल्याने शिक्षण क्षेत्रातील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकाराबाबत शाळा व्यवस्थापनाने बोर्डाशी संपर्क केला असता ही तांत्रिक चूक असल्याचे बोर्डा कडून सांगण्यात आल्याचे समजते. मात्र, या बाबत तात्काळ खुलासा झाला नाही.शाळेतील परीक्षा दिलेल्या ४१ विद्यार्थ्यांपैकी फक्त एकच विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवू शकला नाही. शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. ८२ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी शाळेचा टॉपर आहे. केवळ ग्रेड सब्जेक्ट म्हणून असलेल्या शाळेच्या वर्कएज्युकेशन विषयाचे गुण न दिल्याने व तसे बोर्डाला कळवले असतांनाही निकाल बोर्डाच्या साईडवर शुन्य टक्के दिल्याने बोर्डाचा गलथानपणा दिसून येत आहे.बोर्डाच्या लेखी तांत्रिक चूकामुळात दहावीच्या मुलाला पास अथवा नापास असे निकालपत्र देण्यात येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर प्रमोटेड असे दाखिवण्यात आले आहेया बाबत शाळा व्यवस्थापनाने बोर्डाशी संपर्क केला असता ही तांत्रिक चूक असल्याचे बोर्डा कडून सांगण्यात आल्याचे समजते. मात्र त्यामुळे अनेकांना त्रास झाला.बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे आमच्या शाळेची बदनामी झाली असून त्याचा फटका आमच्या रेप्युटेशनला बसला आहे. आम्ही सर्व बाबीची पूर्तता केली असतानाही बोर्डाने त्या कडे लक्ष न दिल्याने शुन्य टक्के निकाल दिला आहे. आमची सर्व मुले पास असतानाही त्यांना नापास दाखविण्यात आल्याने आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. -जनार्दन म्हात्रे,संस्थापक अध्यक्ष गिरीजा म्हात्रे विद्यालय)

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या