शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

वसईची शाळा केली नापास, बोर्डाचा गोंधळी कारभार, वेबसाइटवर चुकीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:12 IST

दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

पारोळ - दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. दहावीच्या परीक्षेत या शाळेतील मुलांना बार्डाने चक्क एटीकेटी लावल्याने पालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.या निकालात वसई तालुक्यातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याचे दिसून येत असताना जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेचा निकाल मात्र बोर्डाच्या चुकी मुळे ० टक्के लागल्याचे जाहीर झाल्याने पालकांना आणि शाळा व्यवस्थापनेला मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. या शाळेतील ४१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते ते सर्व नापास असल्याचे दाखिवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. ८२ टक्के गुण मिळालेला विद्यार्थीही बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे नापास दाखिवण्यात आला होता. मुळात शाळेत जो विषय शिकविला जात नाही त्या विषया बाबत हा घोळ झाल्याचे समोर आले आहे.या बाबत शाळा व्यवस्थापनाने परीक्षे पूर्वीच बोर्डाला पत्र लिहून कळविले होते. तसेच ही चूक दुरुस्त करण्यासाठी शुल्क ही भरले असताना बोर्डाच्या गलथान कारभारामुळे येथील मुलांना त्यांच्या पालकांना आणि शाळा व्यवस्थापनाला नाहक त्रास सहन करावा लागला. मुळात दहावीच्या मुलाला पास अथवा नापास असा रिझल्ट देण्यात येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्क लिस्टवर प्रमोटेड असे दाखविण्यात आले आहे. तसेच काहींना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एटीकेटी लावल्याने शिक्षण क्षेत्रातील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकाराबाबत शाळा व्यवस्थापनाने बोर्डाशी संपर्क केला असता ही तांत्रिक चूक असल्याचे बोर्डा कडून सांगण्यात आल्याचे समजते. मात्र, या बाबत तात्काळ खुलासा झाला नाही.शाळेतील परीक्षा दिलेल्या ४१ विद्यार्थ्यांपैकी फक्त एकच विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवू शकला नाही. शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. ८२ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी शाळेचा टॉपर आहे. केवळ ग्रेड सब्जेक्ट म्हणून असलेल्या शाळेच्या वर्कएज्युकेशन विषयाचे गुण न दिल्याने व तसे बोर्डाला कळवले असतांनाही निकाल बोर्डाच्या साईडवर शुन्य टक्के दिल्याने बोर्डाचा गलथानपणा दिसून येत आहे.बोर्डाच्या लेखी तांत्रिक चूकामुळात दहावीच्या मुलाला पास अथवा नापास असे निकालपत्र देण्यात येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर प्रमोटेड असे दाखिवण्यात आले आहेया बाबत शाळा व्यवस्थापनाने बोर्डाशी संपर्क केला असता ही तांत्रिक चूक असल्याचे बोर्डा कडून सांगण्यात आल्याचे समजते. मात्र त्यामुळे अनेकांना त्रास झाला.बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे आमच्या शाळेची बदनामी झाली असून त्याचा फटका आमच्या रेप्युटेशनला बसला आहे. आम्ही सर्व बाबीची पूर्तता केली असतानाही बोर्डाने त्या कडे लक्ष न दिल्याने शुन्य टक्के निकाल दिला आहे. आमची सर्व मुले पास असतानाही त्यांना नापास दाखविण्यात आल्याने आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. -जनार्दन म्हात्रे,संस्थापक अध्यक्ष गिरीजा म्हात्रे विद्यालय)

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या