शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

वसईत ७२ एचआयव्ही रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:05 IST

वसई-विरार शहरात गेल्या ५ महिन्यात ७२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. बाधित रु ग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका धास्तावली आहे

नालासोपारा : वसई-विरार शहरात गेल्या ५ महिन्यात ७२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. बाधित रु ग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका धास्तावली आहे. त्यांच्या उपचारासाठी वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात एआरटीसी कक्ष आता सुरू केले जाणार आहे.या रोगाबाबत जनजागृती केली जात असतानाही शहरात बाधित रु ग्णांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब असून मागील ५ महिन्यात शहतात तब्बल ७२ रु ग्णांची नोंद पालिकेच्या रु ग्णालयात झालेली आहे. जिल्हा एडस नियंत्रण संस्थेने पालिकेला एचआयव्ही कक्षासाठी विनामूल्य औषधे देण्याचे मान्य केले आहेत. वसई पुर्वेच्या वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात यासाठी एआरटीसी कक्ष उभारण्यात येणार आहे. याबाबत पालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, आमच्या कडे आलेल्या क्षयरु ग्णांची तसेच गरोदर मातांची आम्ही तपासणी करत असतो. त्यात हे रु ग्ण आढळल्याची माहिती जानेवारीत १८, फेब्रूवारीत १२, मार्च मध्ये १४ एप्रिल मध्ये ९ आणि मे महिन्यात १९ एचआयव्ही बाधीत रु ग्णांची नोद करण्यात आली आहे.एआरटीसी म्हणजे अ‍ॅटी रॅट्रोव्हायरल थेरेपी सेंटरएआरटीसी म्हणजे अ‍ॅटी रॅट्रोव्हायरल थेरेपी सेंटर.या सेंटरमध्ये एचआयव्ही बाधीत रु ग्णांना विशिष्ट औषधे घ्यावी लागतात. ती औषधे घेतल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो हे पाहण्यासाठी नियमति तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या एआरटी सेंटर मध्ये होतात. याबाबच माहिती देताना एडस रोगावर काम करणाऱ्या कृपा फाऊंडेशनच्या अमित पटेल यांनी लोकमतला सविस्तर माहिती दिली.ते म्हणाले की, एचआयव्ही बाधीत रुग्णांसाठी लागणारी औषधे महाग असतात. साधारण रु ग्णाला २ ते ३ हजारांचा खर्च येतो. जी औषधे आयÞुष्यभर घ्यायची असतात. मीरा रोडच्या इंदिरा गांधी रु ग्णालयात ही औषधे मिळतात. मात्र गेल्या ८ महिन्यात वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे वसईच्या रु ग्णांना केईएम जेजे, नायर किंववा ठाण्याच्या सिव्हील रु ग्णालय. कृपा फाऊंडेशन मध्ये ही औषधे मिळतात. ही औषधे तपासणी करावी लागते.त्याचे परिणाम तपासण्यासाठी सीडी ४ आणि व्हायरल लोड या चाचण्या कराव्या लागतात. त्याने एचआयव्हीचं प्रमाण किती असते हे समजते. नियमित तपासणी या केंद्रात होते. वजन वाढलं, कमी झाले हे तपासण्यासाठी दर ६ महिन्यांनी सीडी ४ चाचणी करावी लागली त्यानुसार औषधांचे प्रमाण बदलावे लागते. कालांतराने व्हायर शरीरात बदल करतो. त्यामुळ औषधे बदलावी लागतात. वसईत केवळ कृपा फाऊंडेशन मध्ये हे केंद्र आहे.