शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

वसई विरार शहरात हॉटेल, बार, उपहारगृह राहणार रात्री 9 वाजेपर्यंतच उघडी राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 23:00 IST

महापालिका प्रशासक तथा आयुक्त गंगाथरन डी यांचा आदेश जारी !

-आशिष राणे

वसई  - केंद्र सरकारने अनलोक -5 मध्ये शहरातील बंद असलेली सर्व बार,हॉटेल, रेस्टॉरंट व सर्व प्रकारची खाद्य उपहार गृह यांना मार्गदर्शक नियमावली पाळून उघडण्यास दि.5 ऑक्टोबर पासून मान्यता दिली होती.

त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मार्फत त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था,ग्रामीण जिल्हा प्रशासन किंवा महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल बार यांना राज्य उत्पादक शुल्क आयुक्तांनी मान्यता ही दिली गेली. परंतु वसई विरार शहरांतील सर्व बार हॉटेल्स यांच्या वेळेबाबत काहीही स्पष्ट आदेश नव्हते. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता.

दरम्यान वसई विरार महापालिका प्रशासक तथा आयुक्त गंगाथरन डी यांना हॉटेल व बार यांच्या वेळे बाबत काय नियमावली असेल असे लोकमत" ने विचारले असता त्यांनी लागलीच या संभ्रमाबाबत तात्काळ बुधवारी संध्याकाळी वेळेबाबतचा आदेशच काढून हॉटेल व बार आदींना दे धक्का दिला आहे.

दरम्यान पालिका आयुक्त गंगाथरन यांनी आदेशात म्हंटल्यानुसार वसई विरार शहरातील सर्व बार रेस्टॉरंट व हॉटेल्सना दि. 8 आॅक्टोबर पासून 50 टक्के क्षमतेने बार, हॉटेल, फूड दुकाने व उपहारगृह सुरू ठेवण्याला मान्यता दिली असल्याचे स्पष्ट लिहिलं आहे. आणि आता "लोकमत"नी विचारलेल्या प्रश्नांनंतर जागे झालेल्या आयुक्त प्रशासनाने तसे लेखी आदेश  काढले असून येथील शहरातील सर्व दुकानें रात्री 10 वाजे पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी होत असताना आयुक्तांनी फक्त रात्री 9 पर्यँतच वेळ निश्चित केली असल्याने आधीच  नाराजी पसरली आहे.

काय आहे आयुक्ताच्या आदेशात  

वसई विरार शहरातील बार, हॉटेल, उपहारगृह व फूड कोर्ट 50 टक्के क्षमतेने,सॅनिटाईज, योग्य सुरक्षित अंतर,आदी नियम पाळून  सकाळी 7 ते रात्री 9  वाजे पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त गंगाथरन  यांनी काढला आहे. 

आयुक्तांच्या आदेशाचे सर्वत्र स्वागत होते असले तरी हॉटेल संघटना मात्र आयुक्तांच्या या निर्णयामुळे थोडी शी नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर शहरातील हॉटेल, बार, उपहारगृह आदी प्रमाणे दुकानें रात्री किमान 10 वाजे पर्यंत सुरू ठेवण्याला मान्यता द्यावी अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीनं यापूर्वी ही केली गेली मात्र ती नाही मिळाली,

निदान हॉटेल बार उपहार गृह नातरी वेळ वाढवून देण्याची हॉटेल संघटनेची मागणी !

तरीही हॉटेल बार आदींना वेळ वाढवून दिली आणि तशी मान्यता मिळाल्यास मागील 7 महिन्यापासून बंद असलेल्या वसई विरार शहरातील हॉटेल इंडस्ट्री तील व्यापारी ,चालक -मालक  कर्मचारी आदींना चालना मिळून हजारो नागरिकांच्या हाताला काम मिळणार असल्याचे वसई तालुका हॉटेल असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाश हेगडे यांनी लोकमत ला सांगितले.

मागील दोन दिवस झाले शहरांतील हॉटेल बार हे रात्री पर्यँत सुरू असल्याचे समजले, मात्र अजून आपल्या शहरात  कोरोना संक्रमण आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे कोरोना संबंधित सर्व नियम आणि त्यात वेळ ही महत्त्वाची आहे व ती पाळण्यात यावी  आणि  आम्ही तसे आदेश काढतोय, तसेच हॉटेल व्यावसायिकांनी बार, हॉटेल व उपहारगृहाचे नियम पाळावे, काही अडचण असल्यास हॉटेल संघटनानी अवश्य प्रशासनाची भेट घ्यावी 

 - गंगाथरन.डीआयुक्त तथा प्रशासकवसई विरार शहर महापालिका, मुख्यालय  

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकVasai Virarवसई विरार